शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

‘संविधान बदलणाऱ्यांना दलित जनताच बदलेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:14 IST

औरंगाबाद : ‘नरेंद्र मोदी यांचे सरकार संविधान बदलणार नाही. जर संविधान बदलण्याचा कुणीही प्रयत्न केला तर त्यांना बदलण्याची ताकद या देशातील दलित जनतेत आहे,’

औरंगाबाद : ‘नरेंद्र मोदी यांचे सरकार संविधान बदलणार नाही. जर संविधान बदलण्याचा कुणीही प्रयत्न केला तर त्यांना बदलण्याची ताकद या देशातील दलित जनतेत आहे,’ असा इशारा स्पष्ट शब्दांत एका पत्रपरिषदेत रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी दिला. त्यांनी सांगितले की, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. इतकेच नव्हे तर संविधानावर विशेष अधिवेशन बोलवून चर्चा केली व त्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान संपूर्ण जगासमोर त्यांनी अधोरेखित केले. इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाच्या कामाला गती देण्यात यावी, यासाठी आजच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. १४ एप्रिलपासून या कामाला सुरुवात व्हावी, असा आमचा आग्रह आहे. आम्हाला दिलेली आश्वासने मोदी व फडणवीस सरकार पाळील, असा आमचा विश्वास आहे. रिपाइंला सत्तेत वाटा देण्याचे एका कराराद्वारे कबूल करण्यात आले आहे. बाबूराव कदम, मिलिंद शेळके, अनिल गोंडाणे, गौतम भालेराव, ब्रह्मानंद चव्हाण, दौलत खरात, आर. डी. इंगळे गुरुजी, श्रावण गायकवाड, प्रशांत शेगावकर, सुंदर साळवे, किशोर थोरात, संजय ठोकळ, अरविंद अवसरमोल, रमेश मकासरे आदींची उपस्थिती होती.