शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रोज दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

औरंगाबाद : हवामानातील बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आलेला कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

औरंगाबाद : हवामानातील बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आलेला कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असून, २४ मेपर्यंत ३४६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. १ जानेवारी ते २४ मे २०१५ पर्यंतच्या १४४ दिवसांत रोज दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रमाण येत आहे. यावरून दिसते की, विभागात दुष्काळ आणि नापिकीचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २०० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने १ कोटी ७१ लाख रुपयांची मदत केल्याचा दावा केला आहे. विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा साप्ताहिक अहवाल पाठविला आहे. जानेवारीपासून आजवर विभागातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळाचा सामना करावा लागला. रबीचे पीक या अस्मानी संकटामुळे हातातून गेले. दुष्काळामुळे पशुधनालाही फटका बसला. विभागाला मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे त्याचा आर्थिक, सामाजिक परिणाम होतो आहे. विभागातील ३४६ आत्महत्या प्रकरणांपैकी प्रशासनाने ४८ प्रकरणांत मदत नाकारली आहे. ९८ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. २०० प्रकरणांत प्रशासनाने मदत केली आहे. १ कोटी ७१ लाख रुपयांची ती मदत आहे. ४८ प्रकरणांत मदत नाकारण्यामागे प्रशासनाने स्पष्ट मत नोंदविलेले नाही. उस्मानाबादला १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. रबी हंगामात झालेल्या गारपिटीच्या नुकसानभरपाईसाठी तो निधी आला आहे. ४तो निधी मिळाला नसल्याने प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. सोमवारी तो निधी विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.