शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

रोज दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

औरंगाबाद : हवामानातील बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आलेला कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

औरंगाबाद : हवामानातील बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आलेला कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असून, २४ मेपर्यंत ३४६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. १ जानेवारी ते २४ मे २०१५ पर्यंतच्या १४४ दिवसांत रोज दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रमाण येत आहे. यावरून दिसते की, विभागात दुष्काळ आणि नापिकीचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २०० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने १ कोटी ७१ लाख रुपयांची मदत केल्याचा दावा केला आहे. विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा साप्ताहिक अहवाल पाठविला आहे. जानेवारीपासून आजवर विभागातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळाचा सामना करावा लागला. रबीचे पीक या अस्मानी संकटामुळे हातातून गेले. दुष्काळामुळे पशुधनालाही फटका बसला. विभागाला मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे त्याचा आर्थिक, सामाजिक परिणाम होतो आहे. विभागातील ३४६ आत्महत्या प्रकरणांपैकी प्रशासनाने ४८ प्रकरणांत मदत नाकारली आहे. ९८ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. २०० प्रकरणांत प्रशासनाने मदत केली आहे. १ कोटी ७१ लाख रुपयांची ती मदत आहे. ४८ प्रकरणांत मदत नाकारण्यामागे प्रशासनाने स्पष्ट मत नोंदविलेले नाही. उस्मानाबादला १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. रबी हंगामात झालेल्या गारपिटीच्या नुकसानभरपाईसाठी तो निधी आला आहे. ४तो निधी मिळाला नसल्याने प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. सोमवारी तो निधी विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.