शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

रोज दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST

औरंगाबाद : हवामानातील बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आलेला कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

औरंगाबाद : हवामानातील बदल, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आलेला कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असून, २४ मेपर्यंत ३४६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. १ जानेवारी ते २४ मे २०१५ पर्यंतच्या १४४ दिवसांत रोज दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रमाण येत आहे. यावरून दिसते की, विभागात दुष्काळ आणि नापिकीचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २०० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने १ कोटी ७१ लाख रुपयांची मदत केल्याचा दावा केला आहे. विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा साप्ताहिक अहवाल पाठविला आहे. जानेवारीपासून आजवर विभागातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळाचा सामना करावा लागला. रबीचे पीक या अस्मानी संकटामुळे हातातून गेले. दुष्काळामुळे पशुधनालाही फटका बसला. विभागाला मागील तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यामुळे त्याचा आर्थिक, सामाजिक परिणाम होतो आहे. विभागातील ३४६ आत्महत्या प्रकरणांपैकी प्रशासनाने ४८ प्रकरणांत मदत नाकारली आहे. ९८ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. २०० प्रकरणांत प्रशासनाने मदत केली आहे. १ कोटी ७१ लाख रुपयांची ती मदत आहे. ४८ प्रकरणांत मदत नाकारण्यामागे प्रशासनाने स्पष्ट मत नोंदविलेले नाही. उस्मानाबादला १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. रबी हंगामात झालेल्या गारपिटीच्या नुकसानभरपाईसाठी तो निधी आला आहे. ४तो निधी मिळाला नसल्याने प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. सोमवारी तो निधी विभागीय आयुक्तालयाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.