शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

सायबर गुन्हेगारीत औरंगाबाद शहर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

By admin | Updated: April 28, 2016 00:16 IST

औरंगाबाद : आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. परंतु याबरोबरच गुन्हेगारीही या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

औरंगाबाद : आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. परंतु याबरोबरच गुन्हेगारीही या शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार औरंगाबाद शहर हे सायबर क्राईममध्ये राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१५ मध्ये शहरात १४८ सायबर गुन्हे घडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे कार्ड फ्रॉडचे असल्याची माहिती सायबर क्राईम विभागाने दिली. तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पोलिसांकडून जनजागृती करून कोणतीही घट त्यामध्ये होण्यास तयार नाही. यासंदर्भात सीआयडीने जानेवारी महिन्यात एक अहवाल जाहीर केला. त्यामध्ये मुंबई शहर प्रथम क्रमांकावर तर औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार, झारखंड, प. बंगाल, ओरिसा, दिल्ली येथील काही जिल्ह्यांतून यासंबंधीचे फोन येतात. बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगतात. तुमचे क ार्ड ब्लॉक किंवा नवीन कार्ड द्यावयाचे आहे, असे बोलून सर्व माहिती विचारून घेतली जाते. ही माहिती घेतल्यानंतर काही वेळातच आॅनलाईन फसवणूक होते. तसेच एखादी महिला किंवा तरुणीच्या नावाने फेसबुकचे फेक अकाऊंट तयार करून, बदनामी केले जाते. क्रेडिट, डेबिट कार्ड फसवणुकीचे प्रमाणही खूप मोठे आहे. इंडस्ट्रीला मोठा आर्थिक फटका कॉर्पोरेट कंपन्यांचे अकाऊंट हॅक करून, ई-मेल फिशिंग अटॅक केला जातो. त्यामुळे इंडस्ट्रीला मोठा आर्थिक फटका बसतो. औरंगाबाद शहरात असे विविध सायबर गुन्हे वाढत आहेत. ते असे-२०११ मध्ये २४, २०१२ -३१, २०१३-४७, २०१४ -६६ अशा सायबर गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे आहे.तर २०१५ मध्ये यामध्ये मोठी वाढ होऊन १४८ गुन्हे घडले. त्यामध्ये ८८ हे कार्ड फ्रॉडचे गुन्हे आहेत. वैयक्तिकमाहिती देऊ नयेकोणतीही बँक फोनवर किंवा ई-मेलवर कधीच माहिती मागवीत नाही. त्याकरिता नागरिकांनी आपल्या कार्डची माहिती फोनवर देणे टाळावे. तरुणांना आॅनलाईन नोकरीची आॅर्डर पाठविली जाते. त्याची खात्री केल्याशिवाय कोणताच आर्थिक व्यवहार करू नये. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. -राहुल खटावकर, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम