शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खसखसचे भाव ऐकून ग्राहकांचे डोळे पांढरे; दर ५०० रुपये किलोवरून पोहचले २५०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 17:47 IST

केंद्र सरकारने देशात होणारी खसखसची आयात मागील २ वर्षांपासून बंद केली आहे. यामुळे देशात खसखसचा तुटवडा जाणवत आहे.

ठळक मुद्देअबब... खसखस २५०० रुपये किलो...८ टनाने विक्री घटली

औरंगाबाद : मसाल्यातील प्रमुख पदार्थ असलेली खसखस ६०० रुपये पावशेर म्हटल्यावर ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी ५०० रुपये किलो दराने मिळणारी खसखस एकदम २५०० रुपये किलो दरावर जाऊन पोहोचली आहे.

केंद्र सरकारने देशात होणारी खसखसची आयात मागील २ वर्षांपासून बंद केली आहे. यामुळे देशात खसखसचा तुटवडा जाणवत आहे. खसखसचे उत्पादन सहजासहजी घेता येत नाही. त्यासाठी सरकारकडून परवानाधारक उत्पादकांना पट्टे वाटप केले जातात. देशात मध्य प्रदेश, राजस्थान राज्यात खसखसचे उत्पादन सेंट्रल ब्यूरो ऑफ नार्कोटिक्सच्या परवानगीने घेतले जाते. या राज्यातील खसखसचे उत्पादन ३ हजार टनापर्यंत जाते. हे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडत असल्याने विदेशातून आयात करावी लागते. 

जगातील १५ देशांत खसखसचे उत्पादन घेतले जाते. देशातील उत्पादकांना जास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे खसखसची आयात बंद करण्यात आली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जर आयात पुन्हा सुरू झाली तर खसखसचे भाव ५०० रुपयांपर्यंत खाली येतील, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

८ टनाने विक्री घटलीखसखसमध्ये प्रचंड भाववाढ झाल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. शहरात खसखसची महिन्याकाठची विक्री १० टनावरून अवघ्या २ टनावर खाली येऊन पोहोचली आहे. भाव ऐकूनच ग्राहक खसखस नको म्हणत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :MarketबाजारAurangabadऔरंगाबाद