शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खसखसचे भाव ऐकून ग्राहकांचे डोळे पांढरे; दर ५०० रुपये किलोवरून पोहचले २५०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 17:47 IST

केंद्र सरकारने देशात होणारी खसखसची आयात मागील २ वर्षांपासून बंद केली आहे. यामुळे देशात खसखसचा तुटवडा जाणवत आहे.

ठळक मुद्देअबब... खसखस २५०० रुपये किलो...८ टनाने विक्री घटली

औरंगाबाद : मसाल्यातील प्रमुख पदार्थ असलेली खसखस ६०० रुपये पावशेर म्हटल्यावर ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी ५०० रुपये किलो दराने मिळणारी खसखस एकदम २५०० रुपये किलो दरावर जाऊन पोहोचली आहे.

केंद्र सरकारने देशात होणारी खसखसची आयात मागील २ वर्षांपासून बंद केली आहे. यामुळे देशात खसखसचा तुटवडा जाणवत आहे. खसखसचे उत्पादन सहजासहजी घेता येत नाही. त्यासाठी सरकारकडून परवानाधारक उत्पादकांना पट्टे वाटप केले जातात. देशात मध्य प्रदेश, राजस्थान राज्यात खसखसचे उत्पादन सेंट्रल ब्यूरो ऑफ नार्कोटिक्सच्या परवानगीने घेतले जाते. या राज्यातील खसखसचे उत्पादन ३ हजार टनापर्यंत जाते. हे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडत असल्याने विदेशातून आयात करावी लागते. 

जगातील १५ देशांत खसखसचे उत्पादन घेतले जाते. देशातील उत्पादकांना जास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे खसखसची आयात बंद करण्यात आली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जर आयात पुन्हा सुरू झाली तर खसखसचे भाव ५०० रुपयांपर्यंत खाली येतील, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

८ टनाने विक्री घटलीखसखसमध्ये प्रचंड भाववाढ झाल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. शहरात खसखसची महिन्याकाठची विक्री १० टनावरून अवघ्या २ टनावर खाली येऊन पोहोचली आहे. भाव ऐकूनच ग्राहक खसखस नको म्हणत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :MarketबाजारAurangabadऔरंगाबाद