शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

खसखसचे भाव ऐकून ग्राहकांचे डोळे पांढरे; दर ५०० रुपये किलोवरून पोहचले २५०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 17:47 IST

केंद्र सरकारने देशात होणारी खसखसची आयात मागील २ वर्षांपासून बंद केली आहे. यामुळे देशात खसखसचा तुटवडा जाणवत आहे.

ठळक मुद्देअबब... खसखस २५०० रुपये किलो...८ टनाने विक्री घटली

औरंगाबाद : मसाल्यातील प्रमुख पदार्थ असलेली खसखस ६०० रुपये पावशेर म्हटल्यावर ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी ५०० रुपये किलो दराने मिळणारी खसखस एकदम २५०० रुपये किलो दरावर जाऊन पोहोचली आहे.

केंद्र सरकारने देशात होणारी खसखसची आयात मागील २ वर्षांपासून बंद केली आहे. यामुळे देशात खसखसचा तुटवडा जाणवत आहे. खसखसचे उत्पादन सहजासहजी घेता येत नाही. त्यासाठी सरकारकडून परवानाधारक उत्पादकांना पट्टे वाटप केले जातात. देशात मध्य प्रदेश, राजस्थान राज्यात खसखसचे उत्पादन सेंट्रल ब्यूरो ऑफ नार्कोटिक्सच्या परवानगीने घेतले जाते. या राज्यातील खसखसचे उत्पादन ३ हजार टनापर्यंत जाते. हे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडत असल्याने विदेशातून आयात करावी लागते. 

जगातील १५ देशांत खसखसचे उत्पादन घेतले जाते. देशातील उत्पादकांना जास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे खसखसची आयात बंद करण्यात आली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जर आयात पुन्हा सुरू झाली तर खसखसचे भाव ५०० रुपयांपर्यंत खाली येतील, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

८ टनाने विक्री घटलीखसखसमध्ये प्रचंड भाववाढ झाल्याने त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. शहरात खसखसची महिन्याकाठची विक्री १० टनावरून अवघ्या २ टनावर खाली येऊन पोहोचली आहे. भाव ऐकूनच ग्राहक खसखस नको म्हणत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :MarketबाजारAurangabadऔरंगाबाद