शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या गलथान कारभाराला ग्राहक वैतागले

By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST

सेलू : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील ग्राहक वैतागले असून वेळेवर वीज बिले वाटप न होणे तसेच अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकाच्या माथी मारल्या जात असल्यामुळे

सेलू : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील ग्राहक वैतागले असून वेळेवर वीज बिले वाटप न होणे तसेच अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकाच्या माथी मारल्या जात असल्यामुळे ग्राहकात संताप व्यक्त होत आहे़ शहरात वीज वितरण कंपनीचे मोठया प्रमाणावर ग्राहक असून इतर तालुक्याच्या तुलनेत वेळेवर वीज बिले अदा करणारे ग्राहक आहेत़ वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा फ टका ग्राहकांना बसत आहे़ सहा महिन्यापुर्वी शहरात वीज वितरण कंपनीकडून नवीन मीटर बसविण्यात आले होते़ त्यानंतर आॅगस्ट महिन्यात काही ग्राहकांना त्यावेळच्या रिडींगचे बिले देण्यात आली आहेत़ त्यामुळे ग्राहकही वीज बिल पाहून चक्रावले आहेत़ वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वेळेवर बिले मिळत नाहीत़ त्यामुळे पुढच्या महिन्यात आलेल्या बिलात मागील बिलाचा आकडा येत आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडत आहे़ तर काही ठिकाणी चुकीच्या रिडींग आधारे बिले आली असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. संबंधित यंत्रणेकडून वीज बिल वितरण व रिडींग घेण्याचे काम गांभिंर्याने व वेळेवर होत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे़ मागील पाच महिन्यापासून वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळलेला आहे़ सहाय्यक अभियंता म्हणून सेलू येथे पाच महिन्या पासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या़ त्यामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे़ शहरात दररोज तीन तासाचे भारनियमन सुरू आहे़ त्यातच बिल वितरण व बिलांमध्ये चुका होत असल्यामुळे ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहे़ याबाबत कुठलीही सविस्तर माहिती ग्राहकांना दिली जात नसल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत़ कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फ टका ग्राहकांना बसत आहे़ (प्रतिनिधी)मागील वर्षी भारनियमनमुक्त सेलू शहर पुन्हा भारनियमनाच्या कचाटयात सापडले आहे़ तत्कालीन सहाय्यक अभियंता सतीश बाहेती यांच्या पुढाकारातून वीज बिल वसुलीत सेलू पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे वर्षभरापुर्वी शहर भारनियमनमुक्त झाले होते़ परंतू सतीश बाहेती यांची फेब्रुवारी महिन्यात देगलूर येथे बदली झाल्यामुळे पाच महिन्यांपासून प्रभारी अधिकारी नेमण्यात आले़ त्यामुळे क ार्यालयीन कामावर कुठलेही नियंत्रण राहिले नाही़ चुकीची वीज बिले, बिले वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले़ बाहेती यांच्या बदलीनंतर राऊत यांच्याकडे काही महिने अतिरिक्त पदभार तर जिंतूरच्या अधिकाऱ्यांकडे काही दिवस कारभार देण्यात आला होता़ सात दिवसांपूर्वी घनबहादुर हे सहाय्यक अभियंता म्हणून रूजू झाले आहेत़ यानंतर तरी वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे़