शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

महावितरणच्या गलथान कारभाराला ग्राहक वैतागले

By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST

सेलू : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील ग्राहक वैतागले असून वेळेवर वीज बिले वाटप न होणे तसेच अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकाच्या माथी मारल्या जात असल्यामुळे

सेलू : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील ग्राहक वैतागले असून वेळेवर वीज बिले वाटप न होणे तसेच अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकाच्या माथी मारल्या जात असल्यामुळे ग्राहकात संताप व्यक्त होत आहे़ शहरात वीज वितरण कंपनीचे मोठया प्रमाणावर ग्राहक असून इतर तालुक्याच्या तुलनेत वेळेवर वीज बिले अदा करणारे ग्राहक आहेत़ वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा फ टका ग्राहकांना बसत आहे़ सहा महिन्यापुर्वी शहरात वीज वितरण कंपनीकडून नवीन मीटर बसविण्यात आले होते़ त्यानंतर आॅगस्ट महिन्यात काही ग्राहकांना त्यावेळच्या रिडींगचे बिले देण्यात आली आहेत़ त्यामुळे ग्राहकही वीज बिल पाहून चक्रावले आहेत़ वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वेळेवर बिले मिळत नाहीत़ त्यामुळे पुढच्या महिन्यात आलेल्या बिलात मागील बिलाचा आकडा येत आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडत आहे़ तर काही ठिकाणी चुकीच्या रिडींग आधारे बिले आली असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. संबंधित यंत्रणेकडून वीज बिल वितरण व रिडींग घेण्याचे काम गांभिंर्याने व वेळेवर होत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे़ मागील पाच महिन्यापासून वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळलेला आहे़ सहाय्यक अभियंता म्हणून सेलू येथे पाच महिन्या पासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या़ त्यामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे़ शहरात दररोज तीन तासाचे भारनियमन सुरू आहे़ त्यातच बिल वितरण व बिलांमध्ये चुका होत असल्यामुळे ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहे़ याबाबत कुठलीही सविस्तर माहिती ग्राहकांना दिली जात नसल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत़ कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फ टका ग्राहकांना बसत आहे़ (प्रतिनिधी)मागील वर्षी भारनियमनमुक्त सेलू शहर पुन्हा भारनियमनाच्या कचाटयात सापडले आहे़ तत्कालीन सहाय्यक अभियंता सतीश बाहेती यांच्या पुढाकारातून वीज बिल वसुलीत सेलू पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे वर्षभरापुर्वी शहर भारनियमनमुक्त झाले होते़ परंतू सतीश बाहेती यांची फेब्रुवारी महिन्यात देगलूर येथे बदली झाल्यामुळे पाच महिन्यांपासून प्रभारी अधिकारी नेमण्यात आले़ त्यामुळे क ार्यालयीन कामावर कुठलेही नियंत्रण राहिले नाही़ चुकीची वीज बिले, बिले वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले़ बाहेती यांच्या बदलीनंतर राऊत यांच्याकडे काही महिने अतिरिक्त पदभार तर जिंतूरच्या अधिकाऱ्यांकडे काही दिवस कारभार देण्यात आला होता़ सात दिवसांपूर्वी घनबहादुर हे सहाय्यक अभियंता म्हणून रूजू झाले आहेत़ यानंतर तरी वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे़