शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

महावितरणच्या गलथान कारभाराला ग्राहक वैतागले

By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST

सेलू : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील ग्राहक वैतागले असून वेळेवर वीज बिले वाटप न होणे तसेच अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकाच्या माथी मारल्या जात असल्यामुळे

सेलू : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शहरातील ग्राहक वैतागले असून वेळेवर वीज बिले वाटप न होणे तसेच अव्वाच्या सव्वा बिले ग्राहकाच्या माथी मारल्या जात असल्यामुळे ग्राहकात संताप व्यक्त होत आहे़ शहरात वीज वितरण कंपनीचे मोठया प्रमाणावर ग्राहक असून इतर तालुक्याच्या तुलनेत वेळेवर वीज बिले अदा करणारे ग्राहक आहेत़ वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा फ टका ग्राहकांना बसत आहे़ सहा महिन्यापुर्वी शहरात वीज वितरण कंपनीकडून नवीन मीटर बसविण्यात आले होते़ त्यानंतर आॅगस्ट महिन्यात काही ग्राहकांना त्यावेळच्या रिडींगचे बिले देण्यात आली आहेत़ त्यामुळे ग्राहकही वीज बिल पाहून चक्रावले आहेत़ वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वेळेवर बिले मिळत नाहीत़ त्यामुळे पुढच्या महिन्यात आलेल्या बिलात मागील बिलाचा आकडा येत आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडत आहे़ तर काही ठिकाणी चुकीच्या रिडींग आधारे बिले आली असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. संबंधित यंत्रणेकडून वीज बिल वितरण व रिडींग घेण्याचे काम गांभिंर्याने व वेळेवर होत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे़ मागील पाच महिन्यापासून वीज वितरण कंपनीचा कारभार ढेपाळलेला आहे़ सहाय्यक अभियंता म्हणून सेलू येथे पाच महिन्या पासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या़ त्यामुळे वीज वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे़ शहरात दररोज तीन तासाचे भारनियमन सुरू आहे़ त्यातच बिल वितरण व बिलांमध्ये चुका होत असल्यामुळे ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात खेटे मारावे लागत आहे़ याबाबत कुठलीही सविस्तर माहिती ग्राहकांना दिली जात नसल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत़ कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फ टका ग्राहकांना बसत आहे़ (प्रतिनिधी)मागील वर्षी भारनियमनमुक्त सेलू शहर पुन्हा भारनियमनाच्या कचाटयात सापडले आहे़ तत्कालीन सहाय्यक अभियंता सतीश बाहेती यांच्या पुढाकारातून वीज बिल वसुलीत सेलू पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे वर्षभरापुर्वी शहर भारनियमनमुक्त झाले होते़ परंतू सतीश बाहेती यांची फेब्रुवारी महिन्यात देगलूर येथे बदली झाल्यामुळे पाच महिन्यांपासून प्रभारी अधिकारी नेमण्यात आले़ त्यामुळे क ार्यालयीन कामावर कुठलेही नियंत्रण राहिले नाही़ चुकीची वीज बिले, बिले वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले़ बाहेती यांच्या बदलीनंतर राऊत यांच्याकडे काही महिने अतिरिक्त पदभार तर जिंतूरच्या अधिकाऱ्यांकडे काही दिवस कारभार देण्यात आला होता़ सात दिवसांपूर्वी घनबहादुर हे सहाय्यक अभियंता म्हणून रूजू झाले आहेत़ यानंतर तरी वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे़