शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वीज ग्राहक त्रस्त; लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:33 IST

महावितरण सरासरी वीज बिल बंद करणार का ?

ठळक मुद्देघरे बंद असल्यानंतर त्यांना सरासरी बिले दिले जाते.ही ग्राहकांचे मीटर हे फॉल्टी आहे. ही मिटर बदलेपर्यंत सरासरी बिले दिले जात

औरंगाबाद : महावितरणला लॉकडाऊनच्या कालावधीत वीजग्राहकांकडील मीटर रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिले देण्यात आली. परंतु लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक दिला जात आहे. त्यामुळे शहरात महावितरण सरासरी

वीजबिल देणे बंद करणार का, असा सवाल वीज ग्राहकांकडून केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे  महावितरणकडून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. या कालावधीत वीज ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले. ही बिले पाहून नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. या तक्रारींचे निवारण करता करता महावितरणची मोठी दमछाक झाली. अनेक ग्राहकांचा लॉकडाऊनमधील वीज बिलांचा  प्रश्न अजून सुटलेला नसताना अद्यापही सरासरी बिले येणे  सुरूच आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. त्यात भरमसाठ वीज बिले पाहून नागरिकांकडून महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. 

सरासरी बिलांचे प्रमाण अत्यल्प बंद घरात मिटर असणे अथवा फाल्टी मिटर असणे, यामुळेच ग्राहकांना सरासरी बिल दिले जाते. मात्र, सरासरी वीजबिल देण्याचे प्रमाण कमी आहे. बहुतांश ग्राहकांना रिडिंगनुसारच बिल दिले जाते. घर बंद नसेल आणि फॉल्टी मिटर नसल्यास सरासरी बिल देणे बंदच होईल. योग्य बिल न आल्यास ग्राहक तक्रार करू शकतात. त्याचे तात्काळ निवारण केले जाते.- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण

महावितरण सांगते ही कारणे...महावितरणने ग्राहकांचे वीज मिटर घराबाहेर बसवली आहेत. परंतु अद्यापही काही मिटर घरांत आहेत आणि घरे बंद असल्यानंतर त्यांना सरासरी बिले दिले जाते. तर काही ग्राहकांचे मीटर हे फॉल्टी आहे. ही मिटर बदलेपर्यंत सरासरी बिले दिले जात असल्याचे कारण महावितरण पुढे करत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण