शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

वीज ग्राहक त्रस्त; लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:33 IST

महावितरण सरासरी वीज बिल बंद करणार का ?

ठळक मुद्देघरे बंद असल्यानंतर त्यांना सरासरी बिले दिले जाते.ही ग्राहकांचे मीटर हे फॉल्टी आहे. ही मिटर बदलेपर्यंत सरासरी बिले दिले जात

औरंगाबाद : महावितरणला लॉकडाऊनच्या कालावधीत वीजग्राहकांकडील मीटर रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिले देण्यात आली. परंतु लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक दिला जात आहे. त्यामुळे शहरात महावितरण सरासरी

वीजबिल देणे बंद करणार का, असा सवाल वीज ग्राहकांकडून केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे  महावितरणकडून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. या कालावधीत वीज ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले. ही बिले पाहून नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. या तक्रारींचे निवारण करता करता महावितरणची मोठी दमछाक झाली. अनेक ग्राहकांचा लॉकडाऊनमधील वीज बिलांचा  प्रश्न अजून सुटलेला नसताना अद्यापही सरासरी बिले येणे  सुरूच आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. त्यात भरमसाठ वीज बिले पाहून नागरिकांकडून महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. 

सरासरी बिलांचे प्रमाण अत्यल्प बंद घरात मिटर असणे अथवा फाल्टी मिटर असणे, यामुळेच ग्राहकांना सरासरी बिल दिले जाते. मात्र, सरासरी वीजबिल देण्याचे प्रमाण कमी आहे. बहुतांश ग्राहकांना रिडिंगनुसारच बिल दिले जाते. घर बंद नसेल आणि फॉल्टी मिटर नसल्यास सरासरी बिल देणे बंदच होईल. योग्य बिल न आल्यास ग्राहक तक्रार करू शकतात. त्याचे तात्काळ निवारण केले जाते.- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण

महावितरण सांगते ही कारणे...महावितरणने ग्राहकांचे वीज मिटर घराबाहेर बसवली आहेत. परंतु अद्यापही काही मिटर घरांत आहेत आणि घरे बंद असल्यानंतर त्यांना सरासरी बिले दिले जाते. तर काही ग्राहकांचे मीटर हे फॉल्टी आहे. ही मिटर बदलेपर्यंत सरासरी बिले दिले जात असल्याचे कारण महावितरण पुढे करत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण