शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींचा चुराडा

By admin | Updated: March 19, 2015 00:18 IST

बीड : पाणी पुरवठ्याचे नियम डावलून मागील तीन वर्षात टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी (जि. प. पाणीपुरवठा विभागाचा पाण्यावरील खर्च वगळून) ८७ कोटी ६ लाख

बीड : पाणी पुरवठ्याचे नियम डावलून मागील तीन वर्षात टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी (जि. प. पाणीपुरवठा विभागाचा पाण्यावरील खर्च वगळून) ८७ कोटी ६ लाख ११ हजार रूपयांचा खर्च झालेला असून फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात केवळ टँकरवर १५ कोटी २५ लाख रुपयांचा चुराडा झालेला आहे. अजून उन्हाळ्याचे दोन ते तीन महिने शिल्लक आहेत. एवढा मोठा खर्च होऊनही नियोजना अभावी जिल्हा तहानलेलाच आहे.मागील तीन वर्षात बीड जिल्ह्यात केवळ टँकरवर टंचाई विभागातून ८७ कोटी ६ लाख ११ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. खर्च कसला अक्षरश: चुराडाच झालेला आहे. २०१४ दरम्यान शासनाने ज्या ठेकेदारांच्या टँकरला जीपीआरएस सिस्टीम बसवलेली नाही अशा पाण्याच्या टँकरचे बील काढू नये अशा सूचना दिल्या होत्या. यावरून बीड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सात कोटी रूपयांच्या जवळपास टँकरची बिले रोखून धरली होती. मात्र तत्कालीन मंत्र्यांच्या कृपाशिर्वादाने ठेकेदारांनी मंत्रालयातून पूर्वीचा जीआर बदलून आणल्याने जि. प. ला जीपीआरएस सिस्टिम नसलेल्या ठेकेदारांचे देखील टँकरची बिले द्यावे लागले होते.पाणी जीवन नव्हे संघर्ष बनतोय...नागरिकांना पिण्याचे पाणी पाजण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करूनही जिल्ह्यातल्या सर्व सामान्य माणसाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)