शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

 अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:14 IST

सुट्यांमुळे संख्या वाढली : एस.टी. महामंडळाच्या मनमानीमुळे पर्यटकांचे हाल

फर्दापूर : वर्षअखेर व नाताळच्या सुट्यांमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे; परंतु नेहमीप्रमाणे एस.टी. महामंडळाने प्रदूषणमुक्त बसेसची संख्या न वाढविल्याने रविवारी पर्यटकांचे प्रचंड हाल झाले.नाताळाची चाहूल लागताच लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली खरी; पण एस.टी. महामंडळाच्या मनमानीमुळे पर्यटकांना उन्हात रांगेत उभे राहून बसची वाट पाहावी लागली. ‘सदा मरे, त्याला कोण रडे’ असा कारभार एस.टी. महामंडळाचा झाल्याने गर्दी वाढताच पर्यटकांची गैरसोय होणे, हे जणू गणितच बनले आहे.रविवारी सकाळी पर्यटकांची संख्या वाढली तेव्हा फक्त सहा बसेस धावत होत्या. त्या अपुऱ्या पडत होत्या. त्यानंतर २ वाजता तीन बसेस मागविण्यात आल्या. त्यात एक मिनी बस खराब असल्याने ती बंद होती. एसटी महामंडळाला लाखोंचे उत्पन्न मिळत असूनही पर्यटकांचे हाल होतात, ही खरी शोकांतिका आहे. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी येथे होत असताना प्रत्यक्षात पर्यटकांसाठी कुठलीही सुविधा नीट नसल्याने पर्यटक नाराज होऊनच परतत असतात. कोट्यवधीचे अभ्यागत केंद्र फक्त वाहनतळ बनले आहे.आगारप्रमुखांना कळवूनही दुर्लक्षपर्यटकांची हेळसांड होऊ नये म्हणून येथील पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक क्षीरसागर यांनी सोयगाव आगारप्रमुखांना बसेस, चालक व वाहक वाढविण्यासाठी पत्र देऊनही उपयोग झाला नाही. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन