शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा निधी जि.प.त अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:35 IST

जिल्हा परिषदेत अधिकारी-पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नियोजन रखडलेले आहे. जि.प. उपकरातील ३६ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीपैकी आठ महिन्यांमध्ये अवघ्या ९ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन झाले आहे. त्यामुळे याही आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत अधिकारी-पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नियोजन रखडलेले आहे. जि.प. उपकरातील ३६ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीपैकी आठ महिन्यांमध्ये अवघ्या ९ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन झाले आहे. त्यामुळे याही आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची चिन्हे दिसत आहेत.यंदा जि.प. उपकराचा ३६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी असून, जिल्हा नियोजन समितीने ९३ कोटी रुपयांचे नियत्वे मंजूर केलेले आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचा जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी आहे. उपकराचा निधी चालू आर्थिक वर्षातच खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आठ महिन्यांमध्ये अवघा ९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे, तर जिल्हा नियोजन समितीचे १८ कोटी रुपयांचे नियोजन झाले आहे. आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघे तीन महिने राहिले आहेत. असे असताना अजून सिंचन, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि समाजकल्याण विभागामार्फत विकास कामांचे नियोजन झालेले नाही, त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विद्यमान पदाधिकाºयांनी अधिकाºयांवर दबाव टाकून जवळपास ३ कोटी रुपयांची नाला खोलीकरण व सरळीकरणाची कामे रद्द केली. ही कामे तत्कालीन पदाधिकाºयांनी मंजूर केलेली होती. विशेष म्हणजे, या कामांना प्रशासनाने प्रशासकीय मंजुरी व कार्यारंभ आदेशही दिलेले होते. केवळ दुटप्पी भूमिकेतून ही कामे रद्द केली आहेत, अशी टीका तत्कालीन शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी केली आहे. विद्यमान पदाधिकाºयांना अधिकाºयांनी नियम सांगितला, तर त्यांना धारेवर धरले जाते.एकीकडे अधिकाºयांना केवळ तोंडी आदेश देत प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे रद्द करण्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे प्राप्त निधीतून कामांचेही नियोजन केले जात नाही.अधिकारी-पदाधिकाºयांमध्ये ताळमेळ नाहीमागील आर्थिक वर्षातील जवळपास १० ते १२ कोटी रुपयांचा निधी शासनाला परत द्यावा लागला. सिंचन विभागाने ३१ मार्च रोजी अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघु सिंचन स्थानिक स्तर विभागाला दिला. या विभागाने तो निधी चालू आर्थिक वर्षात खर्च केला. नियमानुसार शासनाचा निधी दोन वर्षांच्या आत खर्च करणे बंधनकारक असते. ३१ मार्च रोजीच दोन वर्षांची मुदत संपली असेल, तर लघु सिंचन विभागाने तो निधी कसा खर्च केला. तो निधी देण्याऐवजी आपल्याच खात्यात ठेव म्हणून जमा करता आला असता; परंतु पदाधिकारी-अधिकाºयांमधील विसंवादामुळे कोणताही अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाही. परिणामी, जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमुळे सर्वसामान्य सदस्यांना विकासकामांपासून वंचित राहावे लागत आहे.