शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कोट्यवधींचा निधी जि.प.त अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:35 IST

जिल्हा परिषदेत अधिकारी-पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नियोजन रखडलेले आहे. जि.प. उपकरातील ३६ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीपैकी आठ महिन्यांमध्ये अवघ्या ९ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन झाले आहे. त्यामुळे याही आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेत अधिकारी-पदाधिका-यांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नियोजन रखडलेले आहे. जि.प. उपकरातील ३६ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीपैकी आठ महिन्यांमध्ये अवघ्या ९ कोटी रुपयांच्या कामांचे नियोजन झाले आहे. त्यामुळे याही आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची चिन्हे दिसत आहेत.यंदा जि.प. उपकराचा ३६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी असून, जिल्हा नियोजन समितीने ९३ कोटी रुपयांचे नियत्वे मंजूर केलेले आहेत. दलित वस्ती सुधार योजनेचा जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी आहे. उपकराचा निधी चालू आर्थिक वर्षातच खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आठ महिन्यांमध्ये अवघा ९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे, तर जिल्हा नियोजन समितीचे १८ कोटी रुपयांचे नियोजन झाले आहे. आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघे तीन महिने राहिले आहेत. असे असताना अजून सिंचन, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि समाजकल्याण विभागामार्फत विकास कामांचे नियोजन झालेले नाही, त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विद्यमान पदाधिकाºयांनी अधिकाºयांवर दबाव टाकून जवळपास ३ कोटी रुपयांची नाला खोलीकरण व सरळीकरणाची कामे रद्द केली. ही कामे तत्कालीन पदाधिकाºयांनी मंजूर केलेली होती. विशेष म्हणजे, या कामांना प्रशासनाने प्रशासकीय मंजुरी व कार्यारंभ आदेशही दिलेले होते. केवळ दुटप्पी भूमिकेतून ही कामे रद्द केली आहेत, अशी टीका तत्कालीन शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी केली आहे. विद्यमान पदाधिकाºयांना अधिकाºयांनी नियम सांगितला, तर त्यांना धारेवर धरले जाते.एकीकडे अधिकाºयांना केवळ तोंडी आदेश देत प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे रद्द करण्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे प्राप्त निधीतून कामांचेही नियोजन केले जात नाही.अधिकारी-पदाधिकाºयांमध्ये ताळमेळ नाहीमागील आर्थिक वर्षातील जवळपास १० ते १२ कोटी रुपयांचा निधी शासनाला परत द्यावा लागला. सिंचन विभागाने ३१ मार्च रोजी अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघु सिंचन स्थानिक स्तर विभागाला दिला. या विभागाने तो निधी चालू आर्थिक वर्षात खर्च केला. नियमानुसार शासनाचा निधी दोन वर्षांच्या आत खर्च करणे बंधनकारक असते. ३१ मार्च रोजीच दोन वर्षांची मुदत संपली असेल, तर लघु सिंचन विभागाने तो निधी कसा खर्च केला. तो निधी देण्याऐवजी आपल्याच खात्यात ठेव म्हणून जमा करता आला असता; परंतु पदाधिकारी-अधिकाºयांमधील विसंवादामुळे कोणताही अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाही. परिणामी, जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमुळे सर्वसामान्य सदस्यांना विकासकामांपासून वंचित राहावे लागत आहे.