शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

औद्योगिक वसाहतींमुळे ग्रामपंचायती झाल्या करोडपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 12:23 PM

औरंगाबाद, बीड आणि जालना या जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींमुळे अनेक ग्रामपंचायती करोडपती बनल्या आहेत.

ठळक मुद्दे औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत २१ औद्योगिक क्षेत्रे आहेत. तीन जिल्ह्यांत मिळून १९ कोटी ७१ लाख ६७ हजार ३८८ रुपयांचा कर एमआयडीतून गोळा झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद, बीड आणि जालना या जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींमुळे अनेक ग्रामपंचायती करोडपती बनल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातून करापोटी कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत; परंतु तुलनेत औद्योगिक वसाहतींत सुविधा मिळत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत २१ औद्योगिक क्षेत्रे आहेत. औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात जालना टप्पा-१, टप्पा-२, टप्पा-३ हे क्षेत्र आहेत.  बीड जिल्ह्यात बीड, माजलगाव हे क्षेत्र येतात. 

औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामपंचायतींकडून स्वायत्ततेमुळे वेगवेगळी कर आकारणी होत असल्याच्या तक्रारी उद्योजकांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ‘एमआयडीसी’ने औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामपंचायतींकडून होणारी कर आकारणीची आकडेवारी संकलित केली. यातून समोर आलेली आकडेवारी डोळे फिरवणारी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती १ कोटीपेक्षा अधिक कर वसूल करीत असल्याचे समोर आले आहे. औद्योगिक क्षेत्रात रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, साफसफाई, अशा मूलभूत सुविधा ग्रामपंचायतींकडून पुरविल्या जात नाहीत; परंतु प्राधान्याने कर आकारला जातो. 

औद्योगिक वसाहतींमध्ये सोयी-सुविधांच्या नावाखाली उद्योगांकडून प्रत्येक ग्रामपंचायती वेगवेगळे कर आकारणी करीत असल्याने उद्योगांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. जीएसटी लागू झाल्याने ग्रामपंचायत कर रद्द करावा, एमआयडीसी सेवा पुरविते, आम्हाला तिथेच कर भरण्याची मुभा असावी, संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत करात सुसूत्रता असावी, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे. 

कर वसुलीची परिस्थिती- गेल्या वर्षभरात औरंगाबादेतील चिकलठाणा, रेल्वेस्टेशन एमआयडीसीतून मनपाला ३ कोटी ४१ लाख ३६ हजार ५८९ रुपयांचा कर मिळाला. - वाळूज महानगरातील वाळूज, रांजणगाव, नायगाव, घाणेगाव-विटावा, वळदगाव, पंढरपूर, वडगाव (को.) ग्रामपंचायतींकडून औद्योगिक वसाहतींमधून एकूण १३ कोटी ६३ लाख ११ हजार ८११ रुपयांचा कर वसूल झाला. यात पाच ग्रामपंचायतींची कर वसुली कोटीच्या घरात आहे. - शेंद्रा, पैठणमधील ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींतून तब्बल १८ कोटी ८३ लाख ६७ हजार ९५० रुपयांचा कर आकारणी झाली. - जालना औद्योगिक क्षेत्रातील जुना जालना, जालना टप्पा-१, टप्पा-२ अणि टप्पा-३ येथून नगरपालिकेला ८७ लाख ९३ हजार २०३, तर बीड जिल्ह्यातील एमआयडीसीतून केवळ ६ हजार २३५ रुपयांचा कर वसूल झाला. - तीन जिल्ह्यांत मिळून १९ कोटी ७१ लाख ६७ हजार ३८८ रुपयांचा कर एमआयडीतून गोळा झाला.

सुविधांचा अभावअधिकार आहे म्हणून करवसुली केली जाते; परंतु ग्रामपंचायतींकडून औद्योगिक वसाहतींमध्ये कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. करवसुली कायद्यात असल्याने उद्योजकांना काही बोलता येत नाही. ग्रामपंचायतींमध्ये किमान एक समान करवसुली केली पाहिजे. - सुनील किर्दक, उद्योजक

शासनाने माहिती मागितलीऔद्योगिक वसाहतींमधून ग्रामपंचायतींना करापोटी किती महसूल मिळतो, याबाबत शासनाने माहिती मागवली आहे. त्यानुसार ही माहिती गोळा करण्यात आली. यात प्रादेशिक कार्यालयांतर्गत सुमारे तीन जिल्ह्यांतून सुमारे १९ कोटींची करवसुली केली जात आहे. ही माहिती शासानाला सादर केली जाणार आहे.- सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

टॅग्स :MIDCएमआयडीसीTaxकरgram panchayatग्राम पंचायतWaluj MIDCवाळूज एमआयडीसीChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर