शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 17, 2017 00:25 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांची गावस्तरावर समिती गठित करण्यात आली असून, या समितीमार्फत पंचनाम्याला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण ८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.लातूर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान गारपिटीमुळे झाले असून, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार संजय वारकड तसेच तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व गावातील शेतकऱ्यांनी ढोकी-येळी, चिंचोली बल्लाळनाथ, पिंपरी आंबा आदी गावांतील शिवारामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच औसा तालुक्यात औसा, रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी पाहणी केली असून, औसा तालुक्यात जवळपास २५ द्राक्षबागा असून, या बागा गारपिटीने अक्षरश: आडव्या झाल्या आहेत. द्राक्ष पिकांची मोठी हानी गारपिटीमुळे झाली असून, त्याची पाहणी या अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी केली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीने लातूर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची आठवण कालच्या वादळ-वाऱ्याने करून दिली असून, या वादळात आंब्याची झाडे, द्राक्ष बागा, फळबागा नष्ट झाल्या आहेत. तसेच गहू, हरभरा, ज्वारी या पिकांवरही अक्षरश: पाणी पडले आहे. त्याचा पंचनामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांची समिती गठित केली असून, या समितीमार्फत गावातील प्रत्येक शेतातील पिकांचा पंचनामा केला जाणार आहे. येत्या आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या समित्यांना दिले आहेत. शेत, गाव आणि पीकनिहाय याद्या तयार करून पंचनामे केले जाणार आहेत. त्यानंतर अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. (प्रतिनिधी)