शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 17, 2017 00:25 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, उदगीर, देवणी, रेणापूर तालुक्यांतील अनेक गावांत बुधवारी झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांची गावस्तरावर समिती गठित करण्यात आली असून, या समितीमार्फत पंचनाम्याला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण ८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.लातूर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान गारपिटीमुळे झाले असून, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार संजय वारकड तसेच तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व गावातील शेतकऱ्यांनी ढोकी-येळी, चिंचोली बल्लाळनाथ, पिंपरी आंबा आदी गावांतील शिवारामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच औसा तालुक्यात औसा, रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी पाहणी केली असून, औसा तालुक्यात जवळपास २५ द्राक्षबागा असून, या बागा गारपिटीने अक्षरश: आडव्या झाल्या आहेत. द्राक्ष पिकांची मोठी हानी गारपिटीमुळे झाली असून, त्याची पाहणी या अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी केली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीने लातूर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची आठवण कालच्या वादळ-वाऱ्याने करून दिली असून, या वादळात आंब्याची झाडे, द्राक्ष बागा, फळबागा नष्ट झाल्या आहेत. तसेच गहू, हरभरा, ज्वारी या पिकांवरही अक्षरश: पाणी पडले आहे. त्याचा पंचनामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांची समिती गठित केली असून, या समितीमार्फत गावातील प्रत्येक शेतातील पिकांचा पंचनामा केला जाणार आहे. येत्या आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या समित्यांना दिले आहेत. शेत, गाव आणि पीकनिहाय याद्या तयार करून पंचनामे केले जाणार आहेत. त्यानंतर अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. (प्रतिनिधी)