शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

..गंभीर रुग्णांच्या खाटा अडविल्या; रुग्णालयांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:42 IST

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचार सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे.

ठळक मुद्देरुग्ण विश्लेषणासाठी चार सदस्यीय समिती रुग्णसंख्येचा दररोज स्फोट होत असल्याने प्रशासन हतबल

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्यावाढीचा स्फोट होत असून, उपलब्ध आरोग्य सुविधा तोकडी पडू लागली आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना खाटा अडवून ठेवल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने चार सदस्य समिती सर्व रुग्णालयातील रुग्णांचा आढावा घेणार आहे. सौम्य लक्षणांच्या रुग्णांनी गंभीर रुग्णांच्या खाटा अडविल्या असतील तर संबंधित खासगी रुग्णालयांवर दंडात्मक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी बैठकीत दिला.

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचार सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालये तसेच इतर उपचार सुविधांमध्ये दाखल रुग्णांची पाहणी करून त्यांची भरती नियमावलीनुसार (रुग्ण दाखल करण्याच्या एसओपीप्रमाणे) झालेली आहे का? याची शहानिशा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस विभाग, मनपा, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश असलेले तपासणी पथक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला. या पथकामार्फत केलेल्या तपासणीत ज्या रुग्णालयांनी सौम्य स्वरूपाची किंवा लक्षणे नसलेले सीसीसीमध्ये दाखल होऊ शकणारे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून गंभीर रुग्णांसाठीच्या खाटा अडविलेल्या आहेत, अशा रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश चव्हाण यांनी दिले.

मनपाकडून किट पुरविणारवाढीव चाचण्यांसाठी लागणाऱ्या किट महानगरपालिकेकडुन मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील. उपलब्ध मनुष्यबळ आणि उपचार सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून वाढता संसर्ग रोखण्याच्या सूचना मनपा प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी संबंधितांना बैठकीत दिल्या.

हॉस्पिटलनिहाय उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूकसर्व खासगी रुग्णालये, इतर उपचार सुविधा केंद्रात दाखल केलेल्या रुग्णांची पाहणी करून त्यांची भरती नियमावलीनुसार झाली आहे का ? याची शहानिशा करण्यासाठी हॉस्पिटलनिहाय नोडल उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत आरोग्य, पोलीस, महसूल अधिकारी असतील. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, रुग्णालयात खाटा अडवून बसलेले आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद