शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

..गंभीर रुग्णांच्या खाटा अडविल्या; रुग्णालयांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:42 IST

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचार सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे.

ठळक मुद्देरुग्ण विश्लेषणासाठी चार सदस्यीय समिती रुग्णसंख्येचा दररोज स्फोट होत असल्याने प्रशासन हतबल

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्यावाढीचा स्फोट होत असून, उपलब्ध आरोग्य सुविधा तोकडी पडू लागली आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना खाटा अडवून ठेवल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने चार सदस्य समिती सर्व रुग्णालयातील रुग्णांचा आढावा घेणार आहे. सौम्य लक्षणांच्या रुग्णांनी गंभीर रुग्णांच्या खाटा अडविल्या असतील तर संबंधित खासगी रुग्णालयांवर दंडात्मक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी बैठकीत दिला.

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचार सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीने सर्व खासगी रुग्णालये तसेच इतर उपचार सुविधांमध्ये दाखल रुग्णांची पाहणी करून त्यांची भरती नियमावलीनुसार (रुग्ण दाखल करण्याच्या एसओपीप्रमाणे) झालेली आहे का? याची शहानिशा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस विभाग, मनपा, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश असलेले तपासणी पथक नियुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला. या पथकामार्फत केलेल्या तपासणीत ज्या रुग्णालयांनी सौम्य स्वरूपाची किंवा लक्षणे नसलेले सीसीसीमध्ये दाखल होऊ शकणारे रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून गंभीर रुग्णांसाठीच्या खाटा अडविलेल्या आहेत, अशा रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश चव्हाण यांनी दिले.

मनपाकडून किट पुरविणारवाढीव चाचण्यांसाठी लागणाऱ्या किट महानगरपालिकेकडुन मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जातील. उपलब्ध मनुष्यबळ आणि उपचार सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून वाढता संसर्ग रोखण्याच्या सूचना मनपा प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी संबंधितांना बैठकीत दिल्या.

हॉस्पिटलनिहाय उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूकसर्व खासगी रुग्णालये, इतर उपचार सुविधा केंद्रात दाखल केलेल्या रुग्णांची पाहणी करून त्यांची भरती नियमावलीनुसार झाली आहे का ? याची शहानिशा करण्यासाठी हॉस्पिटलनिहाय नोडल उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत आरोग्य, पोलीस, महसूल अधिकारी असतील. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, रुग्णालयात खाटा अडवून बसलेले आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद