शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अधिकाराचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:18 IST

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या काही शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी एका पत्राद्वारे जि.प. शिक्षण विभागाला दिले आहेत

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या काही शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी एका पत्राद्वारे जि.प. शिक्षण विभागाला दिले आहेत. तथापि, यासंदर्भात ग्रामविकास विभागाच्या सचिवांना अगोदर विचारावे लागेल, अशी भूमिका ‘सीईओ’ आर्दड यांनी घेतल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाºयांची पाचावर धारण बसली आहे.आंतरजिल्हा बदलीने आलेल्या जवळपास २५९ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी १८ जुलै रोजी समुपदेशन पद्धतीद्वारे पदस्थापना दिली; मात्र दूरच्या तालुक्यात व दुर्गम भागातील शाळांवर पदस्थापना मिळाल्यामुळे १० ते १५ शिक्षक अद्यापही रुजू झालेले नाहीत. यापैकी काही शिक्षकांनी शिक्षण आयुक्तांना पदस्थापना बदलून मिळण्यासाठी विनंती केली. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी सदरील शिक्षकांची पदस्थापना बदलून देण्याचे आदेश एका पत्राद्वारे शिक्षण विभागाला दिले. सदरील पत्र काल शनिवारी शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले. तथापि, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना शासनाने शुक्रवारीच बडतर्फ केले. त्यामुळे शिक्षण विभागातील कर्मचाºयांनी ते पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांना सादर केले. तेव्हा आर्दड यांनी सदरील शिक्षकांची पदस्थापना बदलून मिळणार नाही. यासंबंधी ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत अगोदर चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी घेतली आहे. तथापि, सदरील पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून परत शिक्षण विभागाकडे आले. त्या पत्राला तात्काळ उत्तर देण्याची सूचना शिक्षण आयुक्तांची होती. एक तर जि.प.मध्ये सध्या शिक्षणाधिकारी कार्यरत नाहीत.