शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीने शहरवासीय त्रस्त

By admin | Updated: May 6, 2017 00:09 IST

बीड : देशातील ४३४ स्वच्छ शहराच्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांपैकी बीड हे एक शहर असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले अन् बीडकरांच्या भुवया उंचावल्या

व्यंकटेश वैष्णव ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : देशातील ४३४ स्वच्छ शहराच्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांपैकी बीड हे एक शहर असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले अन् बीडकरांच्या भुवया उंचावल्या. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरात बोटावर मोजण्याइतकीच सार्वजनिक शौचालये असली तरी त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशा पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षणात भारतात बीडचा ३०२ क्रमांक आला कसा, हा प्रश्न बीडकरांना पडला आहे.स्वच्छता सर्वेक्षण-२०१७ मध्ये भारतातून ४३४ शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ शहरे आहेत. यात बीडचा ३०२ क्रमांक असल्याचे दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जाहीर झाले. बीड शहरातील स्वच्छतेची वस्तुस्थिती अत्यंत गंभीर आहे. बीड नगरपालिकेचा कारभार सध्या उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे आहे. याबाबत त्यांना संपर्क केला असता त्यांनी स्वच्छता सर्वेक्षणमध्ये बीडला मिळालेल्या क्रमांकाबाबत माहिती नसल्याचे सांगितले.आजघडीला बीड शहरातील स्वच्छतेचा पूर्णत: बोजवारा उडालेला आहे. चक्क टेंडर संपल्यामुळे काही महिन्यांपासून घंटागाड्या बंद आहेत. परिणामी ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बीड शहरातील भाजी मंडई, बशीरगंज, मोमीनपुरा, सहयोगनगर, कटकटपुरा, स्वराज्यनगर आदी भागांत कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. हद्दवाढ भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. वस्तुस्थिती लक्षात घेतली तर स्वच्छता सर्वेक्षण-२०१७ मध्ये बीडचा क्रमांक कसा आला, याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.