शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

कोटींची इमारत बेकायदेशीरच

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौकालगत कोट्यवधी रूपये खर्चून टोलेजंग इमारत उभारत गाळ्यांची विक्री केली होती. ही इमारत महसूल प्रशासनाच्या जागेत असून

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौकालगत कोट्यवधी रूपये खर्चून टोलेजंग इमारत उभारत गाळ्यांची विक्री केली होती. ही इमारत महसूल प्रशासनाच्या जागेत असून तिचे बांधकाम नियमबाह्य असल्याचा निर्वाळा सोमवारी उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. बांधकाम पाडून फौजदारी दाखल का करण्यात येऊ नये ? अशी नोटीस सूर्यवंशी यांनी बांधकाम करणाऱ्यांना दिली आहे.सर्व्हे क्रमांक ६१२ ब ही १८ आर जागा शासनाच्या मालकीची असून सातबारावर सरकार कस्टोडीयन अशी नोंद असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. ही जमीन शामसुंदर रामकिशनजी पुनपाळे (रा. रेणापूर, जि. लातूर), नंदकिशोर रघुनाथजी करवा (रा. लातूर), शेख शफी शेख चाँद (रा. बाराभाई गल्ली) यांनी या जागेवर बांधकाम केले. हे बांधकाम करतांना जागेचे मूळ अधिकार अभिलेख तसेच अकृषि व कोणतेही सबळ पुरावे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी करूनही सादर केले नाहीत. या ठिकाणी दुकान, गाळे व इतर बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच सदर जमीन ही सर्व्हे ६१२ ब ची असून त्यावर सरकारी कस्टोडीयन अशी नोंद असून त्याबाबत कोणतेही अभिलेख नगरपरिषदेकडे दिले नाहीत. नगर परिषदेकडे केलेल्या नोंदी या वस्तूस्थिती लपवून केलेल्या आहेत, असा ठपका ठेवण्यात आला.नगर परिषदेकडे मालमत्ता कराच्या नोंदी या मालमत्ता कर वसुलीसाठी असतात. त्या मालकी हक्काच्या नोंदी नाहीत त्यामुळे हा प्रकार दिशाभूल करणारा आहे. बेकादेशीररित्या सरकारी जमीनीवर बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम करून ते वापरात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० प्रमाणे अतिक्रमण काढण्याची कारवाई का करण्यात येऊ नये? तसेच बेकायदेशीर कृत्याबाबत फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस संबंधित अतिक्रमणधारकांना बजावली आहे. (वार्ताहर)मध्यवर्ती ठिकाणी राजधानी प्लाझा नावाची टोलेजंग इमारत बांधण्यात आली. या इमारतीतील गाळे लाखो रुपये किंमतीला विकण्यात आले. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणचे गाळे खरेदी करून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही जागा शासनाच्या मालकीची असल्याचा निर्वाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.राजधानी प्लाझाचे बांधकाम बेकायदेशीर व अवैध असून या संदर्भात प्रशासकीय पातळीवर कारवाई सुरू आहे. या बांधकामाबाबत अतिक्रमणे काढून फौजदारी कारवाई करण्याबाबत संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. २६ मे पर्यंत या संदर्भात कागदपत्रंची पूर्तता न झाल्यास ठोस कारवाई करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी लोकमतशी बोलतांना म्हणाले.