शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

कोटींची इमारत बेकायदेशीरच

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौकालगत कोट्यवधी रूपये खर्चून टोलेजंग इमारत उभारत गाळ्यांची विक्री केली होती. ही इमारत महसूल प्रशासनाच्या जागेत असून

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौकालगत कोट्यवधी रूपये खर्चून टोलेजंग इमारत उभारत गाळ्यांची विक्री केली होती. ही इमारत महसूल प्रशासनाच्या जागेत असून तिचे बांधकाम नियमबाह्य असल्याचा निर्वाळा सोमवारी उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. बांधकाम पाडून फौजदारी दाखल का करण्यात येऊ नये ? अशी नोटीस सूर्यवंशी यांनी बांधकाम करणाऱ्यांना दिली आहे.सर्व्हे क्रमांक ६१२ ब ही १८ आर जागा शासनाच्या मालकीची असून सातबारावर सरकार कस्टोडीयन अशी नोंद असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. ही जमीन शामसुंदर रामकिशनजी पुनपाळे (रा. रेणापूर, जि. लातूर), नंदकिशोर रघुनाथजी करवा (रा. लातूर), शेख शफी शेख चाँद (रा. बाराभाई गल्ली) यांनी या जागेवर बांधकाम केले. हे बांधकाम करतांना जागेचे मूळ अधिकार अभिलेख तसेच अकृषि व कोणतेही सबळ पुरावे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी करूनही सादर केले नाहीत. या ठिकाणी दुकान, गाळे व इतर बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच सदर जमीन ही सर्व्हे ६१२ ब ची असून त्यावर सरकारी कस्टोडीयन अशी नोंद असून त्याबाबत कोणतेही अभिलेख नगरपरिषदेकडे दिले नाहीत. नगर परिषदेकडे केलेल्या नोंदी या वस्तूस्थिती लपवून केलेल्या आहेत, असा ठपका ठेवण्यात आला.नगर परिषदेकडे मालमत्ता कराच्या नोंदी या मालमत्ता कर वसुलीसाठी असतात. त्या मालकी हक्काच्या नोंदी नाहीत त्यामुळे हा प्रकार दिशाभूल करणारा आहे. बेकादेशीररित्या सरकारी जमीनीवर बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम करून ते वापरात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० प्रमाणे अतिक्रमण काढण्याची कारवाई का करण्यात येऊ नये? तसेच बेकायदेशीर कृत्याबाबत फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस संबंधित अतिक्रमणधारकांना बजावली आहे. (वार्ताहर)मध्यवर्ती ठिकाणी राजधानी प्लाझा नावाची टोलेजंग इमारत बांधण्यात आली. या इमारतीतील गाळे लाखो रुपये किंमतीला विकण्यात आले. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणचे गाळे खरेदी करून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही जागा शासनाच्या मालकीची असल्याचा निर्वाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.राजधानी प्लाझाचे बांधकाम बेकायदेशीर व अवैध असून या संदर्भात प्रशासकीय पातळीवर कारवाई सुरू आहे. या बांधकामाबाबत अतिक्रमणे काढून फौजदारी कारवाई करण्याबाबत संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. २६ मे पर्यंत या संदर्भात कागदपत्रंची पूर्तता न झाल्यास ठोस कारवाई करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी लोकमतशी बोलतांना म्हणाले.