शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पोलिसात दिलेली तक्रारच ठरली आशिषच्या खुनाला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:36 IST

राहुल जाधवने १० एप्रिल रोजी कुणाल जाधव विरोधात उस्मानपुरा ठाण्यात दिलेली तक्रारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत झालेल्या खुनाच्या घटनेला कारणीभूत ठरल्याचे समोर आले.

ठळक मुद्दे ९ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याप्रकरणी राहुलने कुणाल आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविला होता.

औरंगाबाद : राहुल जाधवने १० एप्रिल रोजी कुणाल जाधव विरोधात उस्मानपुरा ठाण्यात दिलेली तक्रारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत झालेल्या खुनाच्या घटनेला कारणीभूत ठरल्याचे समोर आले. मृत आशिष साळवे विरोधी गटासोबत राहत असल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली.  

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रमानगरातील रहिवासी अविनाश जाधव आणि कुणाल जाधव यांचा रमानगरातीलच राहुल जाधवसोबत जुना वाद आहे. या वादातून सहा महिन्यांपूर्वी राहुलने आरोपींविरोधात उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तसेच ९ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याप्रकरणी राहुलने कुणाल आणि त्याच्या साथीदारांविरोधात उस्मानपुरा ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून आरोपींचा राहुल जाधवविरुद्ध वाद वाढला आणि ही तक्रारच आशिषच्या खुनाला कारणीभूत ठरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत आशिष हा राहुलसोबत राहत होता. ही बाब आरोपींना खटकत होती. शिवाय १४ एप्रिल रोजी आरोपींनी राहुलला व्यासपीठावर येऊन मारण्याची खुली धमकी दिली होती.

त्यानुसार आरोपी १४ रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास  क्रांतीचौकाजवळील रविराज मित्रमंडळाच्या व्यासपीठावर गेले. यावेळी राहुल जाधव, आशिष साळवे आणि अन्य लोक मंचावर बसलेले होते. आरोपींनी राहुल जाधवचा फेटा ओढला. आरोपी भांडण करण्याच्या उद्देशानेच आल्याचे दिसताच आशिषने त्यांना खाली ढकलले. याचा राग आरोपींना आला. आशिष त्यांना तेथून जाण्याचे सांगत असताना आरोपी कुणालने धारदार चाकू आशिषच्या पोटात खुपसला आणि बाहेर ओढला. त्यानंतर ते तेथून पळून गेले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आशिषचा तासाभरात रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा राग राहुल जाधववर होता, मात्र आशिषने आपल्याला ढकलून हाकलल्याने चिडून त्याला मारले. 

आरोपींना दहा दिवस पोलीस कोठडीआशिष संजय साळवे (२५, रा.रमानगर) या तरुणाचा खून करणारे आरोपी अविनाश गौतम जाधव (२२) व आरोपी कुणाल गौतम जाधव (२०, दोघेही रा.रमानगर) यांना  २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी सोमवारी (दि.१६) दिले.१४ एप्रिलला रात्री उपरोक्त आरोपी भावांनी आशिष साळवेचा खून केला होता. त्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षाने न्यायालयास विनंती केली की, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करावयाचे आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. मयतावरील हल्ल्यामागील नेमक्या कारणाचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.