शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

पोलिसात दिलेली तक्रारच ठरली आशिषच्या खुनाला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:36 IST

राहुल जाधवने १० एप्रिल रोजी कुणाल जाधव विरोधात उस्मानपुरा ठाण्यात दिलेली तक्रारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत झालेल्या खुनाच्या घटनेला कारणीभूत ठरल्याचे समोर आले.

ठळक मुद्दे ९ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याप्रकरणी राहुलने कुणाल आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविला होता.

औरंगाबाद : राहुल जाधवने १० एप्रिल रोजी कुणाल जाधव विरोधात उस्मानपुरा ठाण्यात दिलेली तक्रारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत झालेल्या खुनाच्या घटनेला कारणीभूत ठरल्याचे समोर आले. मृत आशिष साळवे विरोधी गटासोबत राहत असल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली.  

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रमानगरातील रहिवासी अविनाश जाधव आणि कुणाल जाधव यांचा रमानगरातीलच राहुल जाधवसोबत जुना वाद आहे. या वादातून सहा महिन्यांपूर्वी राहुलने आरोपींविरोधात उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तसेच ९ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याप्रकरणी राहुलने कुणाल आणि त्याच्या साथीदारांविरोधात उस्मानपुरा ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून आरोपींचा राहुल जाधवविरुद्ध वाद वाढला आणि ही तक्रारच आशिषच्या खुनाला कारणीभूत ठरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत आशिष हा राहुलसोबत राहत होता. ही बाब आरोपींना खटकत होती. शिवाय १४ एप्रिल रोजी आरोपींनी राहुलला व्यासपीठावर येऊन मारण्याची खुली धमकी दिली होती.

त्यानुसार आरोपी १४ रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास  क्रांतीचौकाजवळील रविराज मित्रमंडळाच्या व्यासपीठावर गेले. यावेळी राहुल जाधव, आशिष साळवे आणि अन्य लोक मंचावर बसलेले होते. आरोपींनी राहुल जाधवचा फेटा ओढला. आरोपी भांडण करण्याच्या उद्देशानेच आल्याचे दिसताच आशिषने त्यांना खाली ढकलले. याचा राग आरोपींना आला. आशिष त्यांना तेथून जाण्याचे सांगत असताना आरोपी कुणालने धारदार चाकू आशिषच्या पोटात खुपसला आणि बाहेर ओढला. त्यानंतर ते तेथून पळून गेले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आशिषचा तासाभरात रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा राग राहुल जाधववर होता, मात्र आशिषने आपल्याला ढकलून हाकलल्याने चिडून त्याला मारले. 

आरोपींना दहा दिवस पोलीस कोठडीआशिष संजय साळवे (२५, रा.रमानगर) या तरुणाचा खून करणारे आरोपी अविनाश गौतम जाधव (२२) व आरोपी कुणाल गौतम जाधव (२०, दोघेही रा.रमानगर) यांना  २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी सोमवारी (दि.१६) दिले.१४ एप्रिलला रात्री उपरोक्त आरोपी भावांनी आशिष साळवेचा खून केला होता. त्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षाने न्यायालयास विनंती केली की, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करावयाचे आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. मयतावरील हल्ल्यामागील नेमक्या कारणाचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.