शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार कोटींचा पतपुरवठा आराखडा

By admin | Updated: April 4, 2016 00:23 IST

हिंगोली : जिल्हाभरातील राष्ट्रीयीकृत, खाजगी व सहकारी बँकाकडून २०१६- १७ या वर्षात १ हजार ४६१ कोटी ३८ लाख ८९ हजारांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्हाभरातील राष्ट्रीयीकृत, खाजगी व सहकारी बँकाकडून २०१६- १७ या वर्षात १ हजार ४६१ कोटी ३८ लाख ८९ हजारांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३८ कोटी ८९ लाख ७६ हजाराचे पीककर्ज वाटप करण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा बँकांच्या वार्षिक पतपुरवठा कृती आराखड्याचे विमोचन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा अग्रणी बँक अधिकारी महेश मदान, नाबार्डचे डीडीएम एस. एस. गोर्डे, अ‍ॅक्सीस बँकेचे कृषी व्ही. एम. करंदीकर, सुनील कुमार, एम. एल. पाटील, एन. पी. दीक्षित, ए. एन. गटाणी, व्ही. एम. कावरखे, सी. एस. डाके आदी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाभरातील बँकांना सन २०१६- १७ च्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याप्रमाणे नागरिकांना पतपुरवठा वेळेत उपलब्ध करुन द्यावा. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्जाचे वाटप नियमाप्रमाणे व वेळेत होईल, हे बँकानी काटेकोरपणे पहाण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कासार यांनी दिल्या. मदान यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांनी जिल्ह्यात यावर्षी करण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याची माहिती दिली. यामध्ये वर्षिक पतपुरवठा आराखडा १४६१ कोटीचा असून यातील १ हजार ३८ कोटी खरीप (९६८ कोटी ५० लाख) व रब्बी (७० कोटी ३९ लाख १७) हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच कृषी पायाभूत सुविधा, शिक्षण, ऊर्जा, सामाजिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आदि साठी पतपुरवठा बँकाकडून करण्याचे नियोजन असल्याचे मदान यांनी सांगितले. यावेळी नाबार्डचे गोर्डे यांनी ही सर्व बँकांनी पीककर्ज वाटपामध्ये सुसूत्रता ठेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)