शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

‘मलईदार’ ठाण्याला ‘डिमांड’; शहर पोलीस दलात बदल्यांचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:30 IST

शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले  आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देआवडत्या ठाण्यात आणि विभागात बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत.  एकाच ठाण्यात आणि विभागात पाच वर्षे सेवा करणाऱ्या २०० पोलिसांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले  आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले. आवडत्या ठाण्यात आणि विभागात बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत.  

याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहर पोलीस दलात सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. एकाच ठाण्यात आणि विभागात पाच वर्षे सेवा करणाऱ्या २०० पोलिसांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यासोबतच मालदार पोलीस ठाण्यात आणि आवडत्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज केल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले. बदलीसाठी विनंती करणाऱ्यांपैैकी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बदली मिळावी, अशी विनंती केली. एमआयडीसी वाळूज ठाण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मागणी गुन्हे शाखेला तर तिसऱ्या क्रमांकाची मागणी वाहतूक शाखेला आहे. यासोबतच दीड पट वेतन मिळणाऱ्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकालाही (बीडीडीएस) चौथ्या क्रमांकाची पसंती आहे.

बॉम्बशोधक आणि नाशक पथकापाठोपाठ एमआयडीसी सिडको, सातारा ठाणे आणि विशेष शाखा आणि पोलीस मुख्यालय असा बदलीसाठी पसंती क्रमांक आहे. सतत बंदोबस्त आणि दाखल होणाऱ्या सर्वाधिक गुन्ह्यांमुळे धावपळीचे ठाणे म्हणून सिटीचौक, क्रांतीचौक आणि मुकुंदवाडी ठाण्याचा उल्लेख होतो, या ठाण्यांत बदलीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.

वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे...बदलीसाठी विनंती अर्ज करताना पोलिसांनी विविध कारणे नमूद केले आहेत. शहरातून एमआयडीसी वाळूज ठाण्यात बदली मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ठाण्यापासून घर जवळ आहे अथवा वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे, अशी कारणे दिली आहेत. विशेषत: आंतरजिल्हा बदलींसाठी प्राप्त अर्जांमध्ये अशी कारणे नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२१ रोजी उडणार बदल्यांचा बारआयुक्तालय प्रशासनाकडे बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जानंतर तो बदलीसाठी प्राप्त आहे अथवा नाही, याबाबतची खात्री केली जात आहे. शिवाय त्याने अर्जात केलेल्या विनंती आणि उपलब्ध रिक्त जागांचा ताळमेळ बसविण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. २१ एप्रिल रोजी बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या करताना कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादTransferबदली