शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

‘मलईदार’ ठाण्याला ‘डिमांड’; शहर पोलीस दलात बदल्यांचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:30 IST

शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले  आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देआवडत्या ठाण्यात आणि विभागात बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत.  एकाच ठाण्यात आणि विभागात पाच वर्षे सेवा करणाऱ्या २०० पोलिसांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले  आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले. आवडत्या ठाण्यात आणि विभागात बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत.  

याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहर पोलीस दलात सुमारे साडेतीन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. एकाच ठाण्यात आणि विभागात पाच वर्षे सेवा करणाऱ्या २०० पोलिसांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यासोबतच मालदार पोलीस ठाण्यात आणि आवडत्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी सुमारे ४०० पोलिसांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज केल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजले. बदलीसाठी विनंती करणाऱ्यांपैैकी दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बदली मिळावी, अशी विनंती केली. एमआयडीसी वाळूज ठाण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मागणी गुन्हे शाखेला तर तिसऱ्या क्रमांकाची मागणी वाहतूक शाखेला आहे. यासोबतच दीड पट वेतन मिळणाऱ्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकालाही (बीडीडीएस) चौथ्या क्रमांकाची पसंती आहे.

बॉम्बशोधक आणि नाशक पथकापाठोपाठ एमआयडीसी सिडको, सातारा ठाणे आणि विशेष शाखा आणि पोलीस मुख्यालय असा बदलीसाठी पसंती क्रमांक आहे. सतत बंदोबस्त आणि दाखल होणाऱ्या सर्वाधिक गुन्ह्यांमुळे धावपळीचे ठाणे म्हणून सिटीचौक, क्रांतीचौक आणि मुकुंदवाडी ठाण्याचा उल्लेख होतो, या ठाण्यांत बदलीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.

वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे...बदलीसाठी विनंती अर्ज करताना पोलिसांनी विविध कारणे नमूद केले आहेत. शहरातून एमआयडीसी वाळूज ठाण्यात बदली मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ठाण्यापासून घर जवळ आहे अथवा वृद्ध आई-वडिलांची सेवा करायची आहे, अशी कारणे दिली आहेत. विशेषत: आंतरजिल्हा बदलींसाठी प्राप्त अर्जांमध्ये अशी कारणे नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२१ रोजी उडणार बदल्यांचा बारआयुक्तालय प्रशासनाकडे बदल्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जानंतर तो बदलीसाठी प्राप्त आहे अथवा नाही, याबाबतची खात्री केली जात आहे. शिवाय त्याने अर्जात केलेल्या विनंती आणि उपलब्ध रिक्त जागांचा ताळमेळ बसविण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. २१ एप्रिल रोजी बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या करताना कर्मचाऱ्यांचे समुपदेशनही केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादTransferबदली