शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

"संस्कृत शिकता आले नाही, ही आयुष्यात राहून गेलेेली गोष्ट..."

By शांतीलाल गायकवाड | Updated: August 10, 2024 12:45 IST

‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ साकारणारे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे ९१ व्या वर्षात पदार्पण; ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद

शांतीलाल गायकवाड -छत्रपती संभाजीनगर : हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी डॉ. सुधीर रसाळ हे शनिवारी (दि. १० ऑगस्ट) वयाची नव्वदी पूर्ण करीत आहेत. कठोर परिश्रम व सचोटीने क्षेत्रात आपले आगळेवेगळे ‘प्रतिष्ठान’ निर्माण करणाऱ्या शेकडो मानसन्मान प्राप्त सरांना आपण संस्कृत शिकू शकलो नाही याची आजही खंत वाटते. 

रसाळ सरांचा नव्वदीतही तोच जोम व जोश हा सळसळत्या तारुण्यालाही लाजविणाराच. आजही नित्यनेमाने त्यांचे वाचन, लेखन सुरू आहे. शतकी वाटचालीकडे निघालेल्या रसाळ सरांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या १६ व्या पुस्तकाचे प्रकाशन आणि सत्कार सोहळा शुक्रवारी झाला.   

सरांना नेमकी खंत काय असेल? असे विचारले असता ते सांगतात, मला  संस्कृत शिकता आले नाही, ही आयुष्यात राहून गेलेली गोष्ट व त्याची आजही खंत वाटते. संस्कृत भाषेत भरत मुनी, आनंद वर्धन, अभिनव गुप्त व मंमट यांनी ज्या प्रकारे समीक्षेची भर घातली ती मला मुळापासून समजून घेता आली नाही. मूलभूत विचार समजून घेणे व भाषांतर वाचून समजून घेणे यात फरक असतो व तो कायम राहिला आहे. भाषांतरित वाचल्यामुळे वरील विभूतींच्या कलाकृतीची सत्यता तपासता आली नाही. 

समीक्षेवर कुणाचा प्रभाव?  रसाळ सर म्हणाले, गंगाधर गाडगीळ, बा. सी. मर्ढेकर व वा. ल. कुलकर्णी यांच्या समीक्षेने मला भुरळ पाडली. तार्किकदृष्ट्या त्यांच्या व माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत मला साम्य आढळले. त्यांच्या समीक्षेचा माझ्यावर निश्चितच प्रभाव आहे. 

पाश्चात्त्य समीक्षेच्या कुबड्या नको  लेखकाचे पुस्तक वाचल्यावर त्यातील गुण-दोष जेव्हा मी दाखवितो, त्या वेळेस मी कटाक्षाने त्यांच्या भूमिकेबद्दल, दोषाबद्दल लिहितो. व्यक्तिगत टीका केली नाही व करत नाही. माझ्या लेखनामुळे काही लेखक दुखावले; पण मी कधी आकस धरला नाही.

पाश्चात्त्य समीक्षेच्या कुबड्या टाकून स्वतंत्रपणे विचार करायला हवा. जोपर्यंत स्वतंत्र विचाराने एखाद्या कलाकृतीकडे पाहणार नाही, तोपर्यंत त्याची गुणग्राहकता दाखविता येणार नाही, असा सल्लाही ते उदयोन्मुख समीक्षकांना देतात. 

गांधेलीच्या सुपुत्राची गरुडझेपरसाळ कुटुंब मूळचे गांधेलीचे. (ता. जि. छत्रपती संभाजीनगर). त्यांच्या वडिलांकडे या गावची पाटीलकी व कुळकर्णीकी होती. सुधीर रसाळ यांचा जन्म १० ऑगस्ट १९३४ रोजी वैजापुरात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा योगही त्यांना आला. शासकीय कला महाविद्यालय व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यापन त्यांनी केले.