शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीचे भाव कोसळले; शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 20:41 IST

परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे.

लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे. यामुळे ऐन लग्नसराईत मुला-मुलींचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

लाडसावंगी परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला आहे. यामुळे खरीप पिकावर शेतक-यांनी केलेला खर्चही निघाला नाही. पुरेसा पाऊस नसल्याने २०१२ नंतर पुन्हा यंदा दुष्काळाचे तोंड शेतक-यांना पाहावे लागत आहे. त्यातच रबीचे पीक ही पाण्याअभावी शेतक-यांना घेता आले नाही. जेमतेम झालेल्या पावसावर आलेल्या कापसाला शेतक-याने मकर संक्रांतीनंतर विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शेतक-यांनी आतापर्यंत कापूस जपून ठेवला होता. मात्र, संक्रांत होऊन पाच दिवस झाले तरी कापसाचे भाव वाढले नाहीत, उलट सहाशे ते आठशे रुपयांने कमी झाले आहेत. यामुळे बळीराजा पार संकटात सापडला असून, यंदाच्या वर्षी पकडलेली मुला-मुलींची लग्न पुढे ढकलण्याची वेळ बळीराजावर आली आहे. 

व्यापा-यांकडून शेतक-यांची लूटशासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केलेली नसल्याने व्यापारी संगनमत करून शेतक-यांना लुटत आहेत. व्यापारी कापूस खराब असल्याचे सांगत शेतक-यांकडून कमी दराने कापसाची खरेदी करीत आहेत. त्यातच शेतमालासाठी उसने घेतलेले पैसे परत वसुलीसाठी दुकानदार, सावकार तगादा लावत आहेत. यामुळे बळीराजाला कापूस विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी आहे त्या भावात कापसाची विक्री करीत आहेत.

घरात पैसा नाही, कापसाला भाव नाहीशेतक-यांना कापसाचे उत्पादन म्हणजे नगदी पीक समजले जाते. कापूस विकून झालेल्या उत्पादनातून मुला-मुलींचे लग्न दिवाळीनंतर जुळवाजुळव करून फेब्रुवारी ते मे महिन्यात उरकून घेतली जातात; परंतु घरात पैसा नाही, कापसाला भाव नाही. यामुळे मुला-मुलींचे लग्न सोहळे पुढील वर्षापर्यंत ढकलण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

टॅग्स :cottonकापूस