शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

कपाशीचे भाव कोसळले; शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 20:41 IST

परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे.

लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे. यामुळे ऐन लग्नसराईत मुला-मुलींचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

लाडसावंगी परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला आहे. यामुळे खरीप पिकावर शेतक-यांनी केलेला खर्चही निघाला नाही. पुरेसा पाऊस नसल्याने २०१२ नंतर पुन्हा यंदा दुष्काळाचे तोंड शेतक-यांना पाहावे लागत आहे. त्यातच रबीचे पीक ही पाण्याअभावी शेतक-यांना घेता आले नाही. जेमतेम झालेल्या पावसावर आलेल्या कापसाला शेतक-याने मकर संक्रांतीनंतर विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शेतक-यांनी आतापर्यंत कापूस जपून ठेवला होता. मात्र, संक्रांत होऊन पाच दिवस झाले तरी कापसाचे भाव वाढले नाहीत, उलट सहाशे ते आठशे रुपयांने कमी झाले आहेत. यामुळे बळीराजा पार संकटात सापडला असून, यंदाच्या वर्षी पकडलेली मुला-मुलींची लग्न पुढे ढकलण्याची वेळ बळीराजावर आली आहे. 

व्यापा-यांकडून शेतक-यांची लूटशासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केलेली नसल्याने व्यापारी संगनमत करून शेतक-यांना लुटत आहेत. व्यापारी कापूस खराब असल्याचे सांगत शेतक-यांकडून कमी दराने कापसाची खरेदी करीत आहेत. त्यातच शेतमालासाठी उसने घेतलेले पैसे परत वसुलीसाठी दुकानदार, सावकार तगादा लावत आहेत. यामुळे बळीराजाला कापूस विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी आहे त्या भावात कापसाची विक्री करीत आहेत.

घरात पैसा नाही, कापसाला भाव नाहीशेतक-यांना कापसाचे उत्पादन म्हणजे नगदी पीक समजले जाते. कापूस विकून झालेल्या उत्पादनातून मुला-मुलींचे लग्न दिवाळीनंतर जुळवाजुळव करून फेब्रुवारी ते मे महिन्यात उरकून घेतली जातात; परंतु घरात पैसा नाही, कापसाला भाव नाही. यामुळे मुला-मुलींचे लग्न सोहळे पुढील वर्षापर्यंत ढकलण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

टॅग्स :cottonकापूस