शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कापसाची आवक वाढली

By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST

जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत.

जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत. जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची संख्या कापूस साठविण्यासाठी कमी पडू लागल्याने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवसेंदिवस मुक्काम ठोकावा लागत आहे. जिल्ह्यात ५ फेबु्रवारीपर्यंत सीसीआय केंद्रांवर ४ लाख ३१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. ३९५० रुपये दराने ही खरेदी होत आहे. सीसीआयने १५ नोव्हेंबर २०१५ पासून ही खरेदी केंद्रे सुरू केली. यामध्ये मुलचंद फुलचंद, गायत्री जिनिंग, किल्ला जीन, बन्सल जिनिंग, एनसीसी फायबर, वृषभ कॉटन आणि मराठवाडा जिनिंग या ठिकाणी ही खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात या सातही केंद्रांवर अडीच महिन्यांच्या काळात कापूस खरेदीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. जिनिंग कारखान्यांवर कापूस ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे २४ जानेवारी ते १ फेबु्रवारी या काळात खरेदी बंद ठेवावी लागली. २ तारखेपासून खरेदी सुरू झाली, परंतु चार दिवसात ५८ हजार क्विंटल खरेदी झाल्याने ६ तारखेपासून ही खरेदी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आली.जालना २२ हजार, भोकरदन व परतूर प्रत्येकी १ लाख ६० हजार क्विंटल, मंठा १ लाख तर अंबड येथे ८० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद अजुनही सुरूच असून बाजार समिती कार्यालयात पावती फाडण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. (प्रतिनिधी)काजळा ता. बदनापूर येथील शेतकरी सखाराम जाधव म्हणाले, शुक्रवारपासून आपण कापसाचा माल घेऊन बाजार समितीच्या आवारात आलो, मात्र अद्याप नंबर लागला नाही. एक-दोन दिवसात खरेदी सुरू होईल, असे सांगितल्याने मी वाहनासह येथेच थांबलो आहे. जालना बाजार समितीचे सचिव गणेशराव चौगुले म्हणाले, सीसीआयच्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कापसाची आवक वाढल्याने सातही जिनिंगवर सध्या कापूस ठेवायला जागा नाही. मात्र सोमवारी ही केंद्रे पूर्ववत सुरू होतील.