शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची आवक वाढली

By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST

जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत.

जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत. जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची संख्या कापूस साठविण्यासाठी कमी पडू लागल्याने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवसेंदिवस मुक्काम ठोकावा लागत आहे. जिल्ह्यात ५ फेबु्रवारीपर्यंत सीसीआय केंद्रांवर ४ लाख ३१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. ३९५० रुपये दराने ही खरेदी होत आहे. सीसीआयने १५ नोव्हेंबर २०१५ पासून ही खरेदी केंद्रे सुरू केली. यामध्ये मुलचंद फुलचंद, गायत्री जिनिंग, किल्ला जीन, बन्सल जिनिंग, एनसीसी फायबर, वृषभ कॉटन आणि मराठवाडा जिनिंग या ठिकाणी ही खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात या सातही केंद्रांवर अडीच महिन्यांच्या काळात कापूस खरेदीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. जिनिंग कारखान्यांवर कापूस ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे २४ जानेवारी ते १ फेबु्रवारी या काळात खरेदी बंद ठेवावी लागली. २ तारखेपासून खरेदी सुरू झाली, परंतु चार दिवसात ५८ हजार क्विंटल खरेदी झाल्याने ६ तारखेपासून ही खरेदी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आली.जालना २२ हजार, भोकरदन व परतूर प्रत्येकी १ लाख ६० हजार क्विंटल, मंठा १ लाख तर अंबड येथे ८० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद अजुनही सुरूच असून बाजार समिती कार्यालयात पावती फाडण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. (प्रतिनिधी)काजळा ता. बदनापूर येथील शेतकरी सखाराम जाधव म्हणाले, शुक्रवारपासून आपण कापसाचा माल घेऊन बाजार समितीच्या आवारात आलो, मात्र अद्याप नंबर लागला नाही. एक-दोन दिवसात खरेदी सुरू होईल, असे सांगितल्याने मी वाहनासह येथेच थांबलो आहे. जालना बाजार समितीचे सचिव गणेशराव चौगुले म्हणाले, सीसीआयच्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कापसाची आवक वाढल्याने सातही जिनिंगवर सध्या कापूस ठेवायला जागा नाही. मात्र सोमवारी ही केंद्रे पूर्ववत सुरू होतील.