शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कापसाची आवक वाढली

By admin | Updated: February 9, 2015 00:43 IST

जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत.

जालना : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत सुरू असलेले जिल्ह्यातील सात कापूस खरेदी केंद्रे चार दिवसांमध्ये पुन्हा बंद पडली आहेत. जिल्ह्यातील खरेदी केंद्रांची संख्या कापूस साठविण्यासाठी कमी पडू लागल्याने शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवसेंदिवस मुक्काम ठोकावा लागत आहे. जिल्ह्यात ५ फेबु्रवारीपर्यंत सीसीआय केंद्रांवर ४ लाख ३१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. ३९५० रुपये दराने ही खरेदी होत आहे. सीसीआयने १५ नोव्हेंबर २०१५ पासून ही खरेदी केंद्रे सुरू केली. यामध्ये मुलचंद फुलचंद, गायत्री जिनिंग, किल्ला जीन, बन्सल जिनिंग, एनसीसी फायबर, वृषभ कॉटन आणि मराठवाडा जिनिंग या ठिकाणी ही खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात या सातही केंद्रांवर अडीच महिन्यांच्या काळात कापूस खरेदीला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. जिनिंग कारखान्यांवर कापूस ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे २४ जानेवारी ते १ फेबु्रवारी या काळात खरेदी बंद ठेवावी लागली. २ तारखेपासून खरेदी सुरू झाली, परंतु चार दिवसात ५८ हजार क्विंटल खरेदी झाल्याने ६ तारखेपासून ही खरेदी तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आली.जालना २२ हजार, भोकरदन व परतूर प्रत्येकी १ लाख ६० हजार क्विंटल, मंठा १ लाख तर अंबड येथे ८० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद अजुनही सुरूच असून बाजार समिती कार्यालयात पावती फाडण्यासाठी आलेल्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. (प्रतिनिधी)काजळा ता. बदनापूर येथील शेतकरी सखाराम जाधव म्हणाले, शुक्रवारपासून आपण कापसाचा माल घेऊन बाजार समितीच्या आवारात आलो, मात्र अद्याप नंबर लागला नाही. एक-दोन दिवसात खरेदी सुरू होईल, असे सांगितल्याने मी वाहनासह येथेच थांबलो आहे. जालना बाजार समितीचे सचिव गणेशराव चौगुले म्हणाले, सीसीआयच्या कापूस खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कापसाची आवक वाढल्याने सातही जिनिंगवर सध्या कापूस ठेवायला जागा नाही. मात्र सोमवारी ही केंद्रे पूर्ववत सुरू होतील.