शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

महामार्गावर वेग वाढविल्याची किंमत तब्बल ८४ लाख ८१ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:02 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : महामार्गावर वाहने सुसाट पळविणे आता चांगलेच अंगलट येऊ शकते. महामार्ग सुरक्षा पोलीस विविध ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : महामार्गावर वाहने सुसाट पळविणे आता चांगलेच अंगलट येऊ शकते. महामार्ग सुरक्षा पोलीस विविध रस्त्यावर स्पीड गन यंत्राद्वारे धावत्या वाहनांचा वेग मोजून सुसाट वाहनचालकांना ऑनलाइन ई-चालान पाठवीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ हजार ६८३ वाहनचालकांना वेगमर्यादेचे पालन न केल्याची किंमत म्हणून ८४ लाख ८१ हजार रुपये शासनाला भरावे लागणार आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीतील ही कारवाई असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

दरवर्षी औरंगाबाद जिल्ह्यात रस्ता अपघातात सरासरी ६०० हून अधिक नागरिकांचा बळी जातो. विशेषत: महामार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने अपघाताचा धोका वाढतो. महामार्गावरील बहुतेक अपघात वाहनांच्या वेगामुळे झाल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा निश्चित केली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर इंटरसेप्टर स्पीड गनद्वारे कारवाई केली जाते. औरंगाबाद जिल्ह्यात महामार्ग पोलिसांकडून यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत वेगमर्यादा न पाळणाऱ्या ८ हजार ६८३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून त्यांच्याकडून तडजोड रक्कम म्हणून ८४ लाख ८१ हजार रुपये आकारण्यात आओ. ई-चालान पद्धतीने आकारण्यात आलेला हा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात येतो.

अशी झाली कारवाई

महिना- वाहनांची संख्या- -----तडजोड रक्कम(दंड)

जानेवारी-------- ८१९-------------७७ लाख ६००० रुपये

फेब्रुवारी-

मार्च-

एप्रिल-

मे-

जून-

जुलै-

ऑगस्ट-८१९-------------७७ लाख ६००० रुपये-------------------

चौकट

धावत्या वाहनांचा मोजला जातो वेग

महामार्गावर वेगमर्यादा न पाळणाऱ्या धावत्या वाहनांचा वेग मोजला जातो. मर्यादेपेक्षा अधिक वेगात असलेल्या वाहनांवर महामार्ग सुरक्षा पोलीस इंटरसेप्टर वाहनांतील स्पीड गन यंत्राद्वारे कारवाई करतात. धावत्या वाहनांचा वेग ३०० मीटर अंतरावरून या यंत्राद्वारे मोजला जातो. अशा वाहनाला पोलीस न थांबविता ऑनलाइन चालान करतात, अशी माहिती महामार्गच्या पोलीस निरीक्षक नंदिनी चांदपूरकर यांनी दिली.

-------------------

कारवाईचा मेसेज येतो मोबाइलवर

वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर ऑनलाइन कारवाई होताच या कारवाईचा मेसेज वाहनमालकाच्या मोबाइलवर पाठविला जातो. पोलिसांनी ऑनलाइन कारवाई केल्याचा मेसेज प्राप्त झाल्यावर आपल्या वाहनाने वेगमर्यादा पाळली नसल्याचे वाहनचालकाच्या लक्षात येते.