शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू

By admin | Updated: May 22, 2014 00:17 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात नवीन जालना भागास घाणेवाडी जलाशयातून तर जायकवाडी - जालना योजनेद्वारे जुना जालना भागास पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, दोन्ही योजनेतील काही अडचणींमुळ ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार होत आहेत. मंगळवारी सकाळी घाणेवाडीची जलवाहिनी कन्हैय्यानगर भागाजवळ जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. जालना शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी घाणेवाडी येथून दोन जलवाहिन्या आहेत. यापैकी एक निजाम कालीन तर ३० वर्षे जुनी आहे. घाणेवाडीतून पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर दोन पैकी एक जलवाहिनी नादुरुस्त आढळून आली होती. तिची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. निजाम कालीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरु होता. मंगळवारी ही जलवाहिनीही नादुरुस्त झाली. तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी नगर पालिकेने हाती घेतले. मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी जलवाहिनीची पाहणी केली. (प्रतिनिधी) बुधवारी पालिकेच्या दुरुस्ती पथकाने घाणेवाडीतून येणारे पाणी थांबवून दुरुस्ती चालू केली. नागरिकांनी जलवाहिनी फोडल्याने तसेच काही पाईप्स जीर्ण झाल्याने जलवाहिनी फुटत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने गळती रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. परंतु सध्या हे पथक कुठे गेले, हे कळेनासे झाले आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामांबाबतही पालिकेने लवकरच सुरूवात करावी, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.