शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

...सुधरा, अन्यथा तुमचाही ‘सीआर’ खराब करीन

By admin | Updated: December 20, 2015 23:54 IST

औरंगाबाद : राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात आम्ही कमी पडलो, तर त्याचा ठपका माझ्या ‘सीआर’वर दिसेल, अशी धमकीच मला शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

औरंगाबाद : राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात आम्ही कमी पडलो, तर त्याचा ठपका माझ्या ‘सीआर’वर दिसेल, अशी धमकीच मला शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे माझा ‘सीआर’ खराब झाला, तर मी तुमचाही ‘सीआर’ खराब करीन. एकालाही सोडणार नाही, असा इशारा आज शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षण संचालकांपासून ते थेट शिक्षकांपर्यंत सर्व यंत्रणेला दिला. शाळबाह्य मुलांच्या पुनर्सर्वेक्षणाबाबत आज रविवारी औरंगाबादेत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवायची जबाबदारी प्रधान सचिवांपासून ते थेट सर्वात शेवटचा घटक असलेल्या शिक्षकांपर्यंत सर्वांची आहे. यासंदर्भात सर्वांना वारंवार सूचना दिल्या आहेत. कार्यशाळांच्या माध्यमातून प्रोग्राम निश्चित केले आहेत. आता अंमलबजावणी करायची आहे. एप्रिल २०१६ ही रिझल्ट दाखविण्याची ‘डेड लाईन’ असेल. प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुले मोठ्या प्रमाणात अप्रगत आहेत. या शाळांतील मुले शिकली पाहिजेत. त्यांना लिहायला- वाचायला आले पाहिजे. यासाठी ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती अमलात आणली आहे. राज्यातील १८ हजार शाळांमध्ये या शिक्षण पद्धतीमार्फत मुलांना प्रगत करण्याचा आमचा संकल्प आहे. शिक्षण विभागाचे दोन संचालक, आयुक्त यांच्यापासून शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत शाळा दत्तक देण्यात आलेल्या आहेत. अधिकाऱ्यांनी रिझल्ट दाखवावा. यात आम्ही कमी पडलो, तर सर्वात अगोदर माझा ‘सीआर’ खराब होईल. माझा ‘सीआर’ खराब झाला, तर मी खालच्या सर्वांचा ‘सीआर’ खराब करीन. राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये. एकही मूल शाळाबाह्य राहू नये, हे आमचे ‘टार्गेट’आहे. ४ जुलै रोजी राज्यात एकाच वेळी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ते बरोबर झालेले नाही, अशी ओरड काही जणांनी केली होती. आता त्यांनाच सोबत घेऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयीन ‘एनएसएस’चे विद्यार्थ्यांमार्फत पुनर्सर्वेक्षण केले जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार लवकरच पुनर्सर्वेक्षणाची तारीख निश्चित केली जाईल. यावेळी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपसचिव सुवर्णा खरात, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख आदींची उपस्थिती होती.