शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

पक्षश्रेष्ठीविरुद्ध नगरसेवकांचे बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:28 IST

महानगरपालिकेत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत सदस्यांची नावे पक्षश्रेष्ठींनी सूचविल्यानंतर या नावाला विरोध करीत स्थानिक नगरसेवकांनी बंड पुकारले असून शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेत हे नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत सदस्यांची नावे पक्षश्रेष्ठींनी सूचविल्यानंतर या नावाला विरोध करीत स्थानिक नगरसेवकांनी बंड पुकारले असून शुक्रवारी होणाºया सर्वसाधारण सभेत हे नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.परभणी महानगरपालिकेत संख्यीय बळानुसार व लॉटरी पद्धतीत मिळालेल्या संधीनुसार काँग्रेस पक्षाच्या वाट्याला तीन स्वीकृत सदस्यपदे आली आहेत. १५ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या वेळी काँग्रेसमध्ये या पदासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाल्याने ही पदे रिक्त ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता ३ नोव्हेंबर रोजी या संदर्भात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून या संदर्भातील प्रक्रिया गतीमान झाली. काँग्रेसच्या नेत्यांनी रविवार व सोमवार त्यानंतर गुरुवारी असे तीन दिवस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची नांदेड येथे भेट घेतली. प्रत्येक गटाने आपली नावे त्यांच्याकडे सोपविली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी अंतिम नावे अर्ज दाखल करण्याच्या दिवशी जिल्हा प्रभारींकडून कळविण्यात येतील, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी ११ ते २ या वेळात काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेल्या तीन व भाजपाच्या वाट्याला आलेल्या १ अशा चार सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. तत्पूर्वी दुपारी १.४५ वाजता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, प्रदेश सरचिटणीस लियाकत अली अन्सारी व उपमहापौर माजूलाला समर्थक मेहराज कुरेशी या तिघांची नावे स्वीकृत सदस्यपदासाठी गटनेते भगवान वाघमारे यांच्याकडे मेलच्या माध्यमातून पाठविली. त्यानंतर एकच गजहब झाला. कारण, काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी दिलेल्या नावांपैकी काही नावे ही अनपेक्षित असल्याने नगरसेवकांमध्ये चलबीचल सुरु झाली. अशातच या तीन सदस्यांचे अर्ज प्रशासनाकडे दाखल करु नयेत, यासाठीही प्रयत्न सुरु झाले. परंतु, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार भगवान वाघमारे यांनी तिन्ही सदस्यांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करुन वेळेत आयुक्तांकडे दाखल केले. त्यानंतर प्रारंभी बी.रघुनाथ सभागृह परिसरात व त्यानंतर मनपात महापौर मीनाताई वरपूडकर, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख यांच्या कक्षामध्ये नाराजांच्या बैठकांचा रतीब सुरु झाला. काही नगरसेवकांनी स्थानिक नेत्यांना विचारात न घेता नावे जाहीर केली. त्यामुळे नगरसेवकपदाचा राजीनामा देऊत, अशी भूमिका घेतली. पक्षाचे मनपातील सर्वच्या सर्व म्हणजे ३२ नगरसेवक राजीनामा देतील, असेही यावेळी सांगण्यात आले. तर काही नगरसेवकांनी राजीनामे देण्याऐवजी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेस गैरहजर राहण्याचा मुद्दा मांडला. त्यालाही काहींनी होकार दिला. याबाबत पक्षश्रेष्ठींना तातडीने पत्र पाठवूत, अशीही चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र कोणतेही पत्र पक्षश्रेष्ठींना पाठविले गेले नाही. परंतु, नगरसेवकांची नाराजी मात्र वरिष्ठांपर्यंत कळविण्यात आली. सायंकाळी ५.३० पर्यंत या बैठका चालल्या. त्यानंतर सर्वच नगरसेवक व पदाधिकारी मनपातून निघून गेले.दरम्यान, दुपारनंतर मनपात घडलेल्या घडामोडींमुळे शुक्रवारची सर्वसाधारण सभा होणार का? व या सर्वसाधारण सभेत पक्षश्रेष्ठींनी सूचविलेल्या नावावर शिक्कामोर्तब होते की पक्षश्रेष्ठींविरुद्ध पुकारलेले नगरसेवकांचे बंड यशस्वी होते, याविषयी राजकीय वर्तूळात प्रचंड उत्सुकता लागली आहे. मनपा निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली असली तरी तीन स्वीकृत सदस्यांवरुन थेट पक्षश्रेष्ठींना विरोध करण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतल्यामुळे काँग्रेसमधील बंडाळी समोर आली आहे. स्थानिक नगरसेवकांना डावलून पक्षश्रेष्ठींनी नावे सूचविली असतील तर त्यामागे कोण आहे, याविषयीदेखील चर्चा होऊ लागली आहे. दुसरीकडे स्थानिक नगरसेवकांनी तीनपैकी ज्या नावांना विरोध दर्शविला आहे, त्याचे कारण काय? ते इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आली की त्यांचे पक्षासाठी योगदानच नाही की इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करुन त्यांची नावे पुढे करण्यात आली, असे अनेक प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडले आहेत.