शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांत मतभेद

By admin | Updated: May 29, 2014 00:51 IST

किनवट : किनवट नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा प्रभारी कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत दुधारे यांची बदली देगलूर येथे झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी ६ नगरसेवकांनी केली आहे़

किनवट : किनवट नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा प्रभारी कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत दुधारे यांची बदली देगलूर येथे झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी ६ नगरसेवकांनी केली आहे़ तर झालेली बदली तूर्त रद्द करण्याची मागणी अन्य ९ नगरसेवकांनी केली आहे़ पाच महिन्यांपूर्वी सर्व नगरसेवकांनी एकजुट होवून तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या बदलीची मागणी केली होती़ आता कर्मचारी दुधारे यांच्या बदली प्रकरणावरून उठलेल्या वादंगाने एकजुट तुटल्याचे दिसून येत आहे़ एका कर्मचार्‍याच्या बदलीप्रकरणी नगरसेवकांनी घेतलेली हटाव-बचावची भूमिका या मागचे रहस्य काय? याची उकल झालेली नाही़ ऩप़चा स्वच्छता निरीक्षकाचा कार्यभार पाहणारे चंद्र्रकांत दुधारे यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षकाचा कारभार देण्यात आला़ दरम्यानच्या काळात दुधारे यांची बदली इतरत्र झाली, मात्र मुळातच नगरपालिकेत कर्मचार्‍यांची वाणवा असल्याने नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांना सामोरे जाण्याची वेळ येवू नये म्हणून कार्यमुक्त केले नाही़ अशातच दुधारे यांना कार्यमुक्त करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे ऩप़तील काँग्रेसचे गटनेते माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार यांच्यासह शिवसेनेचे गटनेते माजी नगराध्यक्ष सुनील पाटील व बांधकाम सभापती सुरज सातुरवार, नगरसेविका प्रियंका तुम्मलवार, पुष्पा मच्छेवार व अपक्ष नगरसेविका रमा नेम्मीनवार अश सहा नगरसेवकांनी सर्व संबंधितांकडे केली आहे़ तोच दुसर्‍या दिवशी नगराध्यक्ष इंदुताई कनाके, उपनगराध्यक्ष साजीदखान, नगरसेवक इस्तारी माडपेल्लीवार, करूणा आळणे, गजानन बोलचेट्टीवार, अंजली दोनपेल्लीवार, अभय महाजन, प्रियंका राठोड, अनाफा बेगम एस़ अली अशा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नगरसेवकांनी कर्मचारी दुधारे यांची झालेली बदली तूर्त रद्द करण्याची मागणी केली आहे़ राष्ट्रवादीच्या एक नगरसेविका मात्र तटस्थ आहेत़ डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन मुख्याधिकार्‍यांची बदलीसाठी सर्व नगरसेवक एक झाले होते़ आता मात्र हटाव-बचावमुळे उभी फूट पडल्याचे दिसून येते़ (वार्ताहर)किनवट नगरपालिकेत नगररचनांची दोन पदे, लेखापाल लेखापरीक्षणची दोन पदे व कर निर्धारकाची ६ पदे रिक्त आहेत़ आदिवासी तालुक्यातील नगरपालिकेत राज्य संवर्गातील कर्मचार्‍यांची रिक्त पदे असल्याने श्रेणी चार (शिपाई संवर्गातील) कर्मचार्‍यांकडून काम करवून घेतले जात आहे़ अनुभवी संवर्गातील केवळ तीनच कर्मचारी कार्यरत आहेत, परिणामी अनेक समस्या उद्भवू लागल्या तरी शिपाई संवर्गातील कर्मचार्‍यांवर भागवत नगरपालिकेचा कारभार सुरू आहे़