शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

coronavirus : औरंगाबादेत 'वर्क फ्रॉम होम' वाढले;‘आयटी’सह उद्योगांतील पाच हजार कर्मचारी करतात घरी बसून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:08 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकारात्मक पावले

ठळक मुद्देसोमवारपासून आणखी वाढ ५० टक्के कर्मचारी घरी बसून काम करतीलकामावर असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी घरी बसतील

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादेतील उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढील किमान सात दिवस तरी ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी केल्यास धोका टळू शकतो. सध्या ‘आयटी’ आणि उद्योगांतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार कर्मचारी घरी बसून काम करीत असून, सोमवारपासून यामध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास औरंगाबादेतील उद्योजकांनी केला आहे. 

यासंदर्भात शहरातील काही प्रथितयश उद्योजकांसोबत चर्चा केली असता त्यांनी कंपन्यांतील उत्पादनापेक्षा कोरोनासारख्या महामारीला रोख लावण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीनुसार ५० टक्के कर्मचारी घरी बसून काम करतील, तर कामावर असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी घरी बसतील, ही पद्धत आम्ही प्रभावीपणे राबवत आहोत. सध्या तरी केवळ ‘आयटी’ कंपन्या आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांमध्ये घरी बसून काम करण्याची पद्धत बऱ्यापैकी राबविण्यात येत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्लोबल एक्स्पर्ट या कंपनीचे प्रमुख प्रशांत देशपांडे यांनी सांगितले की, औरंगाबादेत लहान-मोठ्या मिळून ५० हून अधिक ‘आयटी’ कंपन्या आहेत. या कंपन्या आणि त्यांच्याशी निगडित सेवा देणाऱ्या उद्योगांमध्ये किमान ४ हजार कर्मचारी काम करीत आहेत. यापैकी २ हजार कर्मचारी सध्या घरी बसून काम करीत आहेत. अन्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘आयटी’ व अकाऊंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही घरी बसून काम करण्यास सुरुवात केली आहे. 

उद्योजक मानसिंग पवार यांनी सांगितले की, औरंगाबादेत जवळपास ४ हजार उद्योग असून, त्यामध्ये अडीच ते तीन लाख कामगार काम करीत आहेत. यामध्ये कार्यालयीन कामकाज करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास १५ ते २० हजार एवढी आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा पुणे- मुंबई- दिल्ली येथील प्रवास शंभर टक्के बंद केला आहे. सोशल डिस्टंस् राखण्यासाठी वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती उत्तम आहे. अनेक उद्योगांमध्ये ही कार्यपद्धत सुरू करण्यात आली आहे.

उद्योगांसमोरचे हे आव्हानउद्योगपती ऋषी बागला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘वर्क फ्रॉम होम’ हे उद्योगांसमोर मोठे आव्हान असले, तरी ते पेलण्यासाठी सर्वच उद्योग तयार झाले आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी कमीत कमी कामगार- कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून कारखाने सुरू ठेवावे लागतील. तसाही या सात दिवसांत काही फरक पडणार नाही. आज शुक्रवार व उद्या शनिवारची उद्योगांना सुटीच असते. रविवारी पंतप्रधानांनी ‘जनता क र्फ्यू’ जाहीर केला आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सोमवारपासून मोठ्या प्रमाणात होईल. सध्या काही उद्योगांनी ते सुरू केले आहे. सात दिवसांनंतर आढावा घेऊन पुढे काय करायचे त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस