शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

coronavirus : औरंगाबादेत 'वर्क फ्रॉम होम' वाढले;‘आयटी’सह उद्योगांतील पाच हजार कर्मचारी करतात घरी बसून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:08 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकारात्मक पावले

ठळक मुद्देसोमवारपासून आणखी वाढ ५० टक्के कर्मचारी घरी बसून काम करतीलकामावर असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी घरी बसतील

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादेतील उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढील किमान सात दिवस तरी ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी केल्यास धोका टळू शकतो. सध्या ‘आयटी’ आणि उद्योगांतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार कर्मचारी घरी बसून काम करीत असून, सोमवारपासून यामध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास औरंगाबादेतील उद्योजकांनी केला आहे. 

यासंदर्भात शहरातील काही प्रथितयश उद्योजकांसोबत चर्चा केली असता त्यांनी कंपन्यांतील उत्पादनापेक्षा कोरोनासारख्या महामारीला रोख लावण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीनुसार ५० टक्के कर्मचारी घरी बसून काम करतील, तर कामावर असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी घरी बसतील, ही पद्धत आम्ही प्रभावीपणे राबवत आहोत. सध्या तरी केवळ ‘आयटी’ कंपन्या आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांमध्ये घरी बसून काम करण्याची पद्धत बऱ्यापैकी राबविण्यात येत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्लोबल एक्स्पर्ट या कंपनीचे प्रमुख प्रशांत देशपांडे यांनी सांगितले की, औरंगाबादेत लहान-मोठ्या मिळून ५० हून अधिक ‘आयटी’ कंपन्या आहेत. या कंपन्या आणि त्यांच्याशी निगडित सेवा देणाऱ्या उद्योगांमध्ये किमान ४ हजार कर्मचारी काम करीत आहेत. यापैकी २ हजार कर्मचारी सध्या घरी बसून काम करीत आहेत. अन्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘आयटी’ व अकाऊंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही घरी बसून काम करण्यास सुरुवात केली आहे. 

उद्योजक मानसिंग पवार यांनी सांगितले की, औरंगाबादेत जवळपास ४ हजार उद्योग असून, त्यामध्ये अडीच ते तीन लाख कामगार काम करीत आहेत. यामध्ये कार्यालयीन कामकाज करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास १५ ते २० हजार एवढी आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा पुणे- मुंबई- दिल्ली येथील प्रवास शंभर टक्के बंद केला आहे. सोशल डिस्टंस् राखण्यासाठी वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती उत्तम आहे. अनेक उद्योगांमध्ये ही कार्यपद्धत सुरू करण्यात आली आहे.

उद्योगांसमोरचे हे आव्हानउद्योगपती ऋषी बागला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘वर्क फ्रॉम होम’ हे उद्योगांसमोर मोठे आव्हान असले, तरी ते पेलण्यासाठी सर्वच उद्योग तयार झाले आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी कमीत कमी कामगार- कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून कारखाने सुरू ठेवावे लागतील. तसाही या सात दिवसांत काही फरक पडणार नाही. आज शुक्रवार व उद्या शनिवारची उद्योगांना सुटीच असते. रविवारी पंतप्रधानांनी ‘जनता क र्फ्यू’ जाहीर केला आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सोमवारपासून मोठ्या प्रमाणात होईल. सध्या काही उद्योगांनी ते सुरू केले आहे. सात दिवसांनंतर आढावा घेऊन पुढे काय करायचे त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस