शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

coronavirus : औरंगाबादेत 'वर्क फ्रॉम होम' वाढले;‘आयटी’सह उद्योगांतील पाच हजार कर्मचारी करतात घरी बसून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:08 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकारात्मक पावले

ठळक मुद्देसोमवारपासून आणखी वाढ ५० टक्के कर्मचारी घरी बसून काम करतीलकामावर असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी घरी बसतील

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादेतील उद्योजकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढील किमान सात दिवस तरी ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी केल्यास धोका टळू शकतो. सध्या ‘आयटी’ आणि उद्योगांतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार कर्मचारी घरी बसून काम करीत असून, सोमवारपासून यामध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वास औरंगाबादेतील उद्योजकांनी केला आहे. 

यासंदर्भात शहरातील काही प्रथितयश उद्योजकांसोबत चर्चा केली असता त्यांनी कंपन्यांतील उत्पादनापेक्षा कोरोनासारख्या महामारीला रोख लावण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीनुसार ५० टक्के कर्मचारी घरी बसून काम करतील, तर कामावर असलेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी घरी बसतील, ही पद्धत आम्ही प्रभावीपणे राबवत आहोत. सध्या तरी केवळ ‘आयटी’ कंपन्या आणि त्यावर अवलंबून असलेल्या उद्योगांमध्ये घरी बसून काम करण्याची पद्धत बऱ्यापैकी राबविण्यात येत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्लोबल एक्स्पर्ट या कंपनीचे प्रमुख प्रशांत देशपांडे यांनी सांगितले की, औरंगाबादेत लहान-मोठ्या मिळून ५० हून अधिक ‘आयटी’ कंपन्या आहेत. या कंपन्या आणि त्यांच्याशी निगडित सेवा देणाऱ्या उद्योगांमध्ये किमान ४ हजार कर्मचारी काम करीत आहेत. यापैकी २ हजार कर्मचारी सध्या घरी बसून काम करीत आहेत. अन्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘आयटी’ व अकाऊंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही घरी बसून काम करण्यास सुरुवात केली आहे. 

उद्योजक मानसिंग पवार यांनी सांगितले की, औरंगाबादेत जवळपास ४ हजार उद्योग असून, त्यामध्ये अडीच ते तीन लाख कामगार काम करीत आहेत. यामध्ये कार्यालयीन कामकाज करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास १५ ते २० हजार एवढी आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यालयीन कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा पुणे- मुंबई- दिल्ली येथील प्रवास शंभर टक्के बंद केला आहे. सोशल डिस्टंस् राखण्यासाठी वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती उत्तम आहे. अनेक उद्योगांमध्ये ही कार्यपद्धत सुरू करण्यात आली आहे.

उद्योगांसमोरचे हे आव्हानउद्योगपती ऋषी बागला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘वर्क फ्रॉम होम’ हे उद्योगांसमोर मोठे आव्हान असले, तरी ते पेलण्यासाठी सर्वच उद्योग तयार झाले आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी कमीत कमी कामगार- कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून कारखाने सुरू ठेवावे लागतील. तसाही या सात दिवसांत काही फरक पडणार नाही. आज शुक्रवार व उद्या शनिवारची उद्योगांना सुटीच असते. रविवारी पंतप्रधानांनी ‘जनता क र्फ्यू’ जाहीर केला आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सोमवारपासून मोठ्या प्रमाणात होईल. सध्या काही उद्योगांनी ते सुरू केले आहे. सात दिवसांनंतर आढावा घेऊन पुढे काय करायचे त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस