शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

CoronaVirus : 'आमच्याकडे आता काही उरले नाही'; पैठणमधून ४० मजुर पायी निघाले मध्यप्रदेशकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:43 IST

हाताला काम व पोटाला अन्न उरले नाही

ठळक मुद्दे२० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर प्रशासनाने रोखलेसर्व व्यवस्था करतो याची हमी दिल्यानंतर परतले

पैठण : हाताला काम व पोटासाठी अन्न उरले नाही म्हणून पैठण औद्योगिक वसाहतीतून पायी मध्यप्रदेशकडे निघालेल्या मजुरांना चितेगाव येथून पुन्हा परत फिरावे लागले आहे.धनगाव ते चितेगाव असा २० किमी  पायी प्रवास केल्यानंतर चितेगाव येथून रस्त्याने जात असलेला ४० मजुरांंचा जथ्था पाहून एका दक्ष नागरिकांने या बाबत तहसील प्रशासनास माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने कारवाई करून  तहसील प्रशासनाने मजुरांना  धनगाव येथे परत आणले. आमच्या जवळ आता काही राहिले नाही, आम्हाला जाऊ द्या अशी विनवणी मजुर करत होते. तुमची सर्व व्यवस्था करू, तुम्ही परत फिरा असा विश्वास प्रशासनाने दिल्यानंतर मजुर परत येण्यास तयार झाले.

मध्यप्रदेश राज्यातील शेंदवा जिल्हा बडवाणी येथील ४० मजुर परिवारासह डिसेंबर २०१९ मध्ये पैठण तालुक्यातील  धनगाव येथील भंडारी प्राईम कॉटन ईंडस्ट्रीज अँड ऑईल मील मध्ये कामासाठी आले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम बंद पडले व मजुरांना लॉकडाऊन परिस्थितीत मीलमध्येच रहावे लागले. लॉकडाऊन उठल्यानंतर आम्ही  आमच्या गावाकडे जाणार होतो, परंतु, लॉकडाऊन वाढल्याने आम्ही खचलो आहोत, असे या मजुरांचा प्रमुख असलेल्या मोहन मेहता याने सांगितले. लॉकडाऊन वाढले, जवळचा पैसा थोडाच शिल्लक राहिला, कुणी मदत करेल ही आशा लोप पावली. शेवटी आम्ही दि १२ रोजी पाठिवर संसार घेऊन पायी मध्यप्रदेश मध्ये जाण्यास निघालो होतो असे मोहन मेहता यांनी सांगितले. 

चितेगाव परिसरात रस्त्याने पायी जात असलेल्या  महिला, पुरूष व बालके यांना पाहून चितेगावचे दक्ष नागरिक निलेश राजापुरे यांनी पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना या बाबत माहिती दिली. तहसीलदार शेळके यांनी चितेगावचे मंडळ अधिकारी संभाजी थोटे व तलाठी श्रीधर जमादार यांना तातडीने घटनास्थळी पाठवून सर्व मजुरांना परत आनण्याच्या सूचना दिल्या. मंडळ अधिकारी थोटे, तलाठी जमादार यांनी सर्व मजुरांना कोरोना बाबतीत माहिती देवून एका वाहनाने परत धनगाव येथील भंडारी मील मध्ये आणले. या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. लॉकडाऊन संपल्यानंतर  आपल्या राज्यात आपल्या गावी परत जाऊ या आशेवर तग धरून बसलेल्या परप्रांतीय मजुरात लॉकडाऊन वाढल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे. 

अडचण असल्यास मला कळवादरम्यान, मजुरांना परत आणल्या नंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मजुरांची भेट घेऊन काही अडचण असेल तर मला कळवा असे सांगत त्यांना स्वतः चा मोबाईल क्रमांक दिला. या मजुरांच्या अडचणी सोडविण्यात येतील असे तहसीलदार  यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद