शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

CoronaVirus : 'आमच्याकडे आता काही उरले नाही'; पैठणमधून ४० मजुर पायी निघाले मध्यप्रदेशकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:43 IST

हाताला काम व पोटाला अन्न उरले नाही

ठळक मुद्दे२० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर प्रशासनाने रोखलेसर्व व्यवस्था करतो याची हमी दिल्यानंतर परतले

पैठण : हाताला काम व पोटासाठी अन्न उरले नाही म्हणून पैठण औद्योगिक वसाहतीतून पायी मध्यप्रदेशकडे निघालेल्या मजुरांना चितेगाव येथून पुन्हा परत फिरावे लागले आहे.धनगाव ते चितेगाव असा २० किमी  पायी प्रवास केल्यानंतर चितेगाव येथून रस्त्याने जात असलेला ४० मजुरांंचा जथ्था पाहून एका दक्ष नागरिकांने या बाबत तहसील प्रशासनास माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने कारवाई करून  तहसील प्रशासनाने मजुरांना  धनगाव येथे परत आणले. आमच्या जवळ आता काही राहिले नाही, आम्हाला जाऊ द्या अशी विनवणी मजुर करत होते. तुमची सर्व व्यवस्था करू, तुम्ही परत फिरा असा विश्वास प्रशासनाने दिल्यानंतर मजुर परत येण्यास तयार झाले.

मध्यप्रदेश राज्यातील शेंदवा जिल्हा बडवाणी येथील ४० मजुर परिवारासह डिसेंबर २०१९ मध्ये पैठण तालुक्यातील  धनगाव येथील भंडारी प्राईम कॉटन ईंडस्ट्रीज अँड ऑईल मील मध्ये कामासाठी आले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम बंद पडले व मजुरांना लॉकडाऊन परिस्थितीत मीलमध्येच रहावे लागले. लॉकडाऊन उठल्यानंतर आम्ही  आमच्या गावाकडे जाणार होतो, परंतु, लॉकडाऊन वाढल्याने आम्ही खचलो आहोत, असे या मजुरांचा प्रमुख असलेल्या मोहन मेहता याने सांगितले. लॉकडाऊन वाढले, जवळचा पैसा थोडाच शिल्लक राहिला, कुणी मदत करेल ही आशा लोप पावली. शेवटी आम्ही दि १२ रोजी पाठिवर संसार घेऊन पायी मध्यप्रदेश मध्ये जाण्यास निघालो होतो असे मोहन मेहता यांनी सांगितले. 

चितेगाव परिसरात रस्त्याने पायी जात असलेल्या  महिला, पुरूष व बालके यांना पाहून चितेगावचे दक्ष नागरिक निलेश राजापुरे यांनी पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना या बाबत माहिती दिली. तहसीलदार शेळके यांनी चितेगावचे मंडळ अधिकारी संभाजी थोटे व तलाठी श्रीधर जमादार यांना तातडीने घटनास्थळी पाठवून सर्व मजुरांना परत आनण्याच्या सूचना दिल्या. मंडळ अधिकारी थोटे, तलाठी जमादार यांनी सर्व मजुरांना कोरोना बाबतीत माहिती देवून एका वाहनाने परत धनगाव येथील भंडारी मील मध्ये आणले. या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. लॉकडाऊन संपल्यानंतर  आपल्या राज्यात आपल्या गावी परत जाऊ या आशेवर तग धरून बसलेल्या परप्रांतीय मजुरात लॉकडाऊन वाढल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे. 

अडचण असल्यास मला कळवादरम्यान, मजुरांना परत आणल्या नंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मजुरांची भेट घेऊन काही अडचण असेल तर मला कळवा असे सांगत त्यांना स्वतः चा मोबाईल क्रमांक दिला. या मजुरांच्या अडचणी सोडविण्यात येतील असे तहसीलदार  यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद