शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

CoronaVirus : 'आमच्याकडे आता काही उरले नाही'; पैठणमधून ४० मजुर पायी निघाले मध्यप्रदेशकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:43 IST

हाताला काम व पोटाला अन्न उरले नाही

ठळक मुद्दे२० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर प्रशासनाने रोखलेसर्व व्यवस्था करतो याची हमी दिल्यानंतर परतले

पैठण : हाताला काम व पोटासाठी अन्न उरले नाही म्हणून पैठण औद्योगिक वसाहतीतून पायी मध्यप्रदेशकडे निघालेल्या मजुरांना चितेगाव येथून पुन्हा परत फिरावे लागले आहे.धनगाव ते चितेगाव असा २० किमी  पायी प्रवास केल्यानंतर चितेगाव येथून रस्त्याने जात असलेला ४० मजुरांंचा जथ्था पाहून एका दक्ष नागरिकांने या बाबत तहसील प्रशासनास माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने कारवाई करून  तहसील प्रशासनाने मजुरांना  धनगाव येथे परत आणले. आमच्या जवळ आता काही राहिले नाही, आम्हाला जाऊ द्या अशी विनवणी मजुर करत होते. तुमची सर्व व्यवस्था करू, तुम्ही परत फिरा असा विश्वास प्रशासनाने दिल्यानंतर मजुर परत येण्यास तयार झाले.

मध्यप्रदेश राज्यातील शेंदवा जिल्हा बडवाणी येथील ४० मजुर परिवारासह डिसेंबर २०१९ मध्ये पैठण तालुक्यातील  धनगाव येथील भंडारी प्राईम कॉटन ईंडस्ट्रीज अँड ऑईल मील मध्ये कामासाठी आले होते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम बंद पडले व मजुरांना लॉकडाऊन परिस्थितीत मीलमध्येच रहावे लागले. लॉकडाऊन उठल्यानंतर आम्ही  आमच्या गावाकडे जाणार होतो, परंतु, लॉकडाऊन वाढल्याने आम्ही खचलो आहोत, असे या मजुरांचा प्रमुख असलेल्या मोहन मेहता याने सांगितले. लॉकडाऊन वाढले, जवळचा पैसा थोडाच शिल्लक राहिला, कुणी मदत करेल ही आशा लोप पावली. शेवटी आम्ही दि १२ रोजी पाठिवर संसार घेऊन पायी मध्यप्रदेश मध्ये जाण्यास निघालो होतो असे मोहन मेहता यांनी सांगितले. 

चितेगाव परिसरात रस्त्याने पायी जात असलेल्या  महिला, पुरूष व बालके यांना पाहून चितेगावचे दक्ष नागरिक निलेश राजापुरे यांनी पैठण तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना या बाबत माहिती दिली. तहसीलदार शेळके यांनी चितेगावचे मंडळ अधिकारी संभाजी थोटे व तलाठी श्रीधर जमादार यांना तातडीने घटनास्थळी पाठवून सर्व मजुरांना परत आनण्याच्या सूचना दिल्या. मंडळ अधिकारी थोटे, तलाठी जमादार यांनी सर्व मजुरांना कोरोना बाबतीत माहिती देवून एका वाहनाने परत धनगाव येथील भंडारी मील मध्ये आणले. या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. लॉकडाऊन संपल्यानंतर  आपल्या राज्यात आपल्या गावी परत जाऊ या आशेवर तग धरून बसलेल्या परप्रांतीय मजुरात लॉकडाऊन वाढल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे. 

अडचण असल्यास मला कळवादरम्यान, मजुरांना परत आणल्या नंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मजुरांची भेट घेऊन काही अडचण असेल तर मला कळवा असे सांगत त्यांना स्वतः चा मोबाईल क्रमांक दिला. या मजुरांच्या अडचणी सोडविण्यात येतील असे तहसीलदार  यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद