शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

CoronaVirus : '...हा काळही निघून जाईल'; आईमनाचा माणूस घेतोय विद्यार्थ्यांची काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:21 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्याविभागाचे माजी प्रमुख प्रा. सुरेश पुरी यांना जनसंपर्कतज्ज्ञ म्हणून सर्व जण ओळखतात. त्यांचा विद्यार्थी परिवार देशभर पसरलेला आहे.

ठळक मुद्देपुरी सरांचा विद्यार्थ्यांसोबत रोज दोन तास फोनवर संवादआस्थेवाईकपणे विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला

औरंगाबाद : हॅलो.. मी सुरेश पुरी बोलतोय. समोरून विद्यार्थी नमस्कार सर. कसं काय फोन केला. असा प्रश्न विचारतो. त्यावर सर सांगतात... ‘अरे बाबा सध्या कोरोनात आम्ही घरी बसलोत. फिल्डवर तुम्ही काम करता. तुमची काळजी वाटते म्हणून फोन केला. कुटुंबासह स्वत:ची काळजी घेऊन काम करा... हा काळही निघून जाईल. पुन्हा पहिल्यासारखे दिवस येतील’, असे  मायेचे शब्द बोलून हा आईमनाचा माणूस फोन ठेवतो. हा उपक्रम मागील काही दिवसांपासून दररोज सकाळ- संध्याकाळ  दोन तास सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्याविभागाचे माजी प्रमुख प्रा. सुरेश पुरी यांना जनसंपर्कतज्ज्ञ म्हणून सर्व जण ओळखतात. त्यांचा विद्यार्थी परिवार देशभर पसरलेला आहे. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावलेला असल्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांना बापाच्या स्थानी मानतात.१९८१ साली विद्यापीठातील वृत्तपत्र विभागात रुजू झाल्यापासून ३१ मे २०१० रोजी निवृत्त होईपर्यंत ३० वर्षांच्या कालखंडात पत्रकारितेच्या शेकडो विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे त्यांनी प्रेम दिले.पत्रकारिता विभागात शिक्षण घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आवडते, लाडके शिक्षक प्रा. सुरेश पुरी होत. विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थी हे अतिशय गरीब कुटुंबातील असतात. या विद्यार्थ्यांना कधी पैसे कमी पडतात, कधी जेवणाचे वांधे होते. तेव्हा विद्यार्थी हक्काने  पुरी सरांकडे जाऊन समस्या सांगत आणि पुरी सर त्याचे पालकत्व स्वीकारत. शिक्षण पूर्ण होईपर्यंत मदत करत. विद्यापीठातील सराच्या क्वॉर्टरमध्ये सकाळी चहा- नाष्टा आणि दैनिके वाचण्यासाठी हॉल भरलेला असे. ३१ मे २०१० रोजी प्रा. पुरी सर सेवानिवृत्त झाल्यानंतर बीड बायपास परिसरात राहण्यासाठी गेले. त्याठिकाणीही विद्यार्थी जात. सरांनी सेवानिवृत्तीनंतर हिंदी भाषिक सभेचे काम सुरू केल्यामुळे हैदराबादलाच मुक्काम हलवला होता.

मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच सर औरंगाबादेत पोहोचले. या लॉकडाऊनमध्ये  प्रा. पुरी सरांचे पत्रकारितेत कार्यरत असलेले शेकडो विद्यार्थी फिल्डवर राहून बातम्या देण्याचे काम करीत आहेत.सर्व जण घरात असताना त्यांचा विद्यार्थी रस्त्यावर काम करीत असल्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास फोन करून सर विचारपूस करतात. काळजी घ्या, कुटुंबाला जपा आणि व्यवस्थित कामही करा, असा सल्ला देतात. काही अडचण असल्यास सांगा, हे विचारायलाही प्रा. पुरी सर विसरत नाहीत. अशा बाप मनाच्या माणसाचा फोन आल्यानंतर विद्यार्थीही भारावून जात आहेत.

सरांचे विद्यार्थी दिल्ली ते हैदराबादप्रा. सुरेश पुरी सरांचे विद्यार्थी गल्ली ते दिल्लीपर्यंत पत्रकारितेत कार्यरत आहेत. दिल्ली, हरियाणा, गोवा, हैदराबाद, तेलंगणा, मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, वर्धा, बुलडाणा अशा विविध शहरांमध्ये प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना फोन केले आहेत. सुरुवातीला प्रा.पुरी यांनी त्यांचे गुरू, मित्रमंडळी आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना फोन लावले. औरंगाबाद शहराबाहेरील त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांचे फोन लावून झाले असून, मागील दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरातील विद्यार्थ्यांना फोन लावत असल्याचे प्रा. पुरी सर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीProfessorप्राध्यापक