शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : गंभीर कोरोना रुग्ण पुण्याहून थेट औरंगाबादेत; राज्यातील अनेक शहरांतील रुग्णांवरही शहरात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:57 IST

coronavirus: औरंगाबादेतील आरोग्य यंत्रणा ही केवळ जिल्ह्यातील रुग्णांवर नव्हे तर राज्यभरातील कोरोना रुग्णांवर उपचाराची जबाबदारी पार पडत आहे.

ठळक मुद्देशहरात अहमदनगरहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापुढे आता पुण्यातील रुग्णही शहरात दाखल होत आहे. रुग्णालयाने उपचार शक्य नसल्याचे म्हटल्याने रुग्णास पुण्याहून औरंगाबादेत दाखल केल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

औरंगाबाद : राज्यातील अनेक शहरांत कोरोना रुग्णांना उपचारासाठी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातुलनेत औरंगाबादची परिस्थिती अनेक पटीने चांगली आहे. त्यामुळेच मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांतील रुग्ण औरंगाबादेत धाव घेत आहेत. आता तर कोरोना रुग्ण थेट पुण्याहून शहरात दाखल होत असल्याची स्थिती पहायला मिळत आहे.

औरंगाबादेतील आरोग्य यंत्रणा ही केवळ जिल्ह्यातील रुग्णांवर नव्हे तर राज्यभरातील कोरोना रुग्णांवर उपचाराची जबाबदारी पार पडत आहे. घाटी, जिल्हा रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयांत मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील कोरोना रुग्ण भरती होत आहे. एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर रेफर केले जाते, तर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होईल, या आशेने काही जण उपचारासाठी औरंगाबादला येत आहेत. पण औरंगाबादेत अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या बहुतांश रुग्णांची प्रकृती गंभीर राहत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. शहरात अहमदनगरहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापुढे आता पुण्यातील रुग्णही शहरात दाखल होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. मुंबई पेक्षाही सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पुण्यात आढळून आले. रुग्णालयाने उपचार शक्य नसल्याचे म्हटल्याने रुग्णास पुण्याहून औरंगाबादेत दाखल केल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

रुग्णालय म्हणते, कुठेही घेऊन जापुण्यातील रुग्णालयाने आमच्याकडे उपचार होणार नाही, कुठेही घेऊन जा, असे सांगितले. त्यामुळे भावाला औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयातील आयसीयूत दाखल केले. इथे दोन दिवसांत त्याची प्रकृती सुधारली. आम्ही आशाच सोडून दिली होती, पण भाऊ सुखरुपपणे घरी परतला. डाॅक्टरांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.- रेवती सोनार, रुग्णाची बहीण

गंभीर अवस्थेत दाखलआमच्याकडे उपचार होत नाही, असे म्हटलेले पुण्याच्या रुग्णालयातील कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. गंभीर अवस्थेतील काहींची ऑक्सिजन पातळी ४० ते ५० होती. आतापर्यंत पुण्यातील ३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली. सध्या एका रुग्णावर उपचार सुरु आहे.- डाॅ. उज्ज्वला दहिफळे

रुग्ण कुठलाही असला तरी उपचाररुग्ण कोणत्याही जिल्ह्यातील असला तरी त्यास उपचारासाठी दाखल करून घेण्यास प्राधान्य दिले जाते. रेमडेसिविर लागत असेल तर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करता येईल. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहे.- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद