शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

coronavirus : कोणताही आजार नाही, वय कमी, तरीही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:47 IST

औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत १ ते ४० या वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या होती.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान रोज होणाऱ्या मृत्यूमुळे नागरिकांकडून चिंता

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यामध्ये जून महिन्यापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांत ज्येष्ठ नागरिकांची आणि हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी होती; परंतु आता कमी वयात आणि कोणताही आजार नसतानाही रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत १ ते ४० या वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. मार्च ते जून  या तीन महिन्यांत ६० टक्के रुग्ण या वयोगटातील होते. मात्र, सर्वाधिक रुग्णसंख्या असूनही, या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी होते. यादरम्यान ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. कारण वयाच्या पन्नाशीनंतर आणि वृद्धापकाळात अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांमुळे कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती गंभीर होते. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यू ओढवत असल्याची परिस्थिती दिसून आली.

कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात होते, पण ज्येष्ठांबरोबर आता कमी वयातील म्हणजे ५० वर्षांखालील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातही इतर कोणताही आजार नसतानाही रुग्णांची प्रकृती गंभीर होऊन मृत्यू ओढावत आहे. एक, दोघांपुरता हा प्रकार झालेला नसून, कमी वयात आणि कोणतेही आजार नसताना अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. मात्र, रोज होणाऱ्या मृत्यूमुळे शहरातील नागरिकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. 

मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्नमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण भागांत सर्वेक्षणाचे काम चालू आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती यावर सर्व अवलंबून असते.  कमी वयात मृत्यूचे प्रमाण सध्यातरी कमी आहे.

काही रुग्णांची स्थिती१ सप्टेंबर रोजी दाखल के लेल्या हिमायतबागमधील २८ वर्षीय पुरुषाचा २ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या रुग्णास कोणतीही सहविकृती नव्हती. आसेगाव-गंगापूर येथील ३३ वर्षीय पुरुषाचाही २ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यालाही इतर कोणते आजार नव्हते. अशीच स्थिती ग्रामीण आणि शहरात अनेकांच्या बाबतीत पाहायला मिळाली.

ग्रामीण भागातील मृत्यूची परिस्थितीवय    रुग्णसंख्या१ -१०    १११-२०     ०२१-३०    ७३१-४०    १४१-५०    २१५१-६०    ३१६१-७०    ४२७१-८०    २६८० वर्षांवरील     ८एकूण    १३७ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद