शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

coronavirus : कोणताही आजार नाही, वय कमी, तरीही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:47 IST

औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत १ ते ४० या वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या होती.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान रोज होणाऱ्या मृत्यूमुळे नागरिकांकडून चिंता

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : जिल्ह्यामध्ये जून महिन्यापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांत ज्येष्ठ नागरिकांची आणि हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी होती; परंतु आता कमी वयात आणि कोणताही आजार नसतानाही रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत १ ते ४० या वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. मार्च ते जून  या तीन महिन्यांत ६० टक्के रुग्ण या वयोगटातील होते. मात्र, सर्वाधिक रुग्णसंख्या असूनही, या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी होते. यादरम्यान ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. कारण वयाच्या पन्नाशीनंतर आणि वृद्धापकाळात अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांमुळे कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती गंभीर होते. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यू ओढवत असल्याची परिस्थिती दिसून आली.

कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात होते, पण ज्येष्ठांबरोबर आता कमी वयातील म्हणजे ५० वर्षांखालील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातही इतर कोणताही आजार नसतानाही रुग्णांची प्रकृती गंभीर होऊन मृत्यू ओढावत आहे. एक, दोघांपुरता हा प्रकार झालेला नसून, कमी वयात आणि कोणतेही आजार नसताना अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. मात्र, रोज होणाऱ्या मृत्यूमुळे शहरातील नागरिकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. 

मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्नमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण भागांत सर्वेक्षणाचे काम चालू आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती यावर सर्व अवलंबून असते.  कमी वयात मृत्यूचे प्रमाण सध्यातरी कमी आहे.

काही रुग्णांची स्थिती१ सप्टेंबर रोजी दाखल के लेल्या हिमायतबागमधील २८ वर्षीय पुरुषाचा २ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या रुग्णास कोणतीही सहविकृती नव्हती. आसेगाव-गंगापूर येथील ३३ वर्षीय पुरुषाचाही २ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यालाही इतर कोणते आजार नव्हते. अशीच स्थिती ग्रामीण आणि शहरात अनेकांच्या बाबतीत पाहायला मिळाली.

ग्रामीण भागातील मृत्यूची परिस्थितीवय    रुग्णसंख्या१ -१०    १११-२०     ०२१-३०    ७३१-४०    १४१-५०    २१५१-६०    ३१६१-७०    ४२७१-८०    २६८० वर्षांवरील     ८एकूण    १३७ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद