शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

coronavirus lockdown : किर्गिस्तानात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुलांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:48 IST

 परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. 

ठळक मुद्देविमान लँडिंगची परवानगी नाही अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांची व्यवस्था

औरंगाबाद : किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथील इंटरनॅशनल स्कूल आॅफ मेडिसिन (आयएसएम)मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे औरंगाबादसह राज्यभरातील अनेक विद्यार्थी कोरोनामुळे अडकून पडले आहेत. देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी परतत आहेत; परंतु विमानसेवेअभावी महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. 

महाराष्ट्र राज्यात विमान उतरण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे दिल्लीतील अधिकारी पालकांना सांगत आहेत. त्यामुळे मुलांच्या चिंतेने पालक लोकप्रतिनिधींकडे मदत मागत आहेत. परंतु आश्वासन आणि दिल्लीकडे बोट दाखविण्यापलीकडे काहीही होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलांच्या काळजीने पालक वारंवार विदेश मंत्रालयास संपर्क साधत आहेत. परंतु त्यांच्याकडून महाराष्ट्राकडे बोट दाखविले जात आहे. महाराष्ट्रामध्ये विमान उतरण्यास परवानगी दिली जात नसल्याचेच विदेश मंत्रालयाकडून पालकांना सांगितले जात आहे. कोरोनाच्या काळात अनेक प्रकारची मदत केली जात असल्याचे दावे सरकारकडून केले जात आहेत; परंतु परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. 

बिश्केक येथील आयएसएममध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून वसतिगृह आणि फ्लॅटमध्ये अडकून पडलेले आहेत. ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी वसतिगृहात आणि पुढील वर्षातील विद्यार्थी फ्लॅटमध्ये राहतात. येथील लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना जेवणासह अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे.हताश झालेले विद्यार्थी पालकांशी संपर्क साधत आहेत. घरी येण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २५ विद्यार्थी तेथे असल्याचे सांगितले जात आहे. राज्यभरातील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती आहे. त्यांचे पालक लोकप्रतिनिधींसह शासनाचे लक्ष वेधत आहेत. राज्य सरकारसह भारत सरकारकडे त्वरित प्रयत्न करण्याची मागणी हे पालक सतत करीत आहेत. 

महाराष्ट्रासाठी एकही विमान नाहीकिर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथून १३ जूनपर्यंत भारतासाठी विमान सोडण्यात येणार आहे; परंतु यात महाराष्ट्रासाठी एकही विमान नाही. अन्य राज्यांच्या विमानात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेण्यात येणार नाही. शहरातील आणि राज्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावा. - डॉ. अनिल पाटील चिकटगावकर, विद्यार्थ्याचे पालक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी