शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

coronavirus lockdown : किर्गिस्तानात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुलांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:48 IST

 परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. 

ठळक मुद्देविमान लँडिंगची परवानगी नाही अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांची व्यवस्था

औरंगाबाद : किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथील इंटरनॅशनल स्कूल आॅफ मेडिसिन (आयएसएम)मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे औरंगाबादसह राज्यभरातील अनेक विद्यार्थी कोरोनामुळे अडकून पडले आहेत. देशभरातील विविध राज्यांतील विद्यार्थी परतत आहेत; परंतु विमानसेवेअभावी महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. 

महाराष्ट्र राज्यात विमान उतरण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे दिल्लीतील अधिकारी पालकांना सांगत आहेत. त्यामुळे मुलांच्या चिंतेने पालक लोकप्रतिनिधींकडे मदत मागत आहेत. परंतु आश्वासन आणि दिल्लीकडे बोट दाखविण्यापलीकडे काहीही होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलांच्या काळजीने पालक वारंवार विदेश मंत्रालयास संपर्क साधत आहेत. परंतु त्यांच्याकडून महाराष्ट्राकडे बोट दाखविले जात आहे. महाराष्ट्रामध्ये विमान उतरण्यास परवानगी दिली जात नसल्याचेच विदेश मंत्रालयाकडून पालकांना सांगितले जात आहे. कोरोनाच्या काळात अनेक प्रकारची मदत केली जात असल्याचे दावे सरकारकडून केले जात आहेत; परंतु परदेशात अडकलेले विद्यार्थी घरी येतील, यासाठी ठोस प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत नसल्याची टीका पालकांकडून होत आहे. 

बिश्केक येथील आयएसएममध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून वसतिगृह आणि फ्लॅटमध्ये अडकून पडलेले आहेत. ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी वसतिगृहात आणि पुढील वर्षातील विद्यार्थी फ्लॅटमध्ये राहतात. येथील लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना जेवणासह अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे.हताश झालेले विद्यार्थी पालकांशी संपर्क साधत आहेत. घरी येण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २५ विद्यार्थी तेथे असल्याचे सांगितले जात आहे. राज्यभरातील दीड हजारांहून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती आहे. त्यांचे पालक लोकप्रतिनिधींसह शासनाचे लक्ष वेधत आहेत. राज्य सरकारसह भारत सरकारकडे त्वरित प्रयत्न करण्याची मागणी हे पालक सतत करीत आहेत. 

महाराष्ट्रासाठी एकही विमान नाहीकिर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथून १३ जूनपर्यंत भारतासाठी विमान सोडण्यात येणार आहे; परंतु यात महाराष्ट्रासाठी एकही विमान नाही. अन्य राज्यांच्या विमानात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना घेण्यात येणार नाही. शहरातील आणि राज्यातील लोकप्रतिनिधींशी संपर्क केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावा. - डॉ. अनिल पाटील चिकटगावकर, विद्यार्थ्याचे पालक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी