शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे तोंडालाच 'लॉक'; अख्खी रामपूरवाडी भागवतेय पाण्यावर भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 10:12 IST

घराबाहेर पडू नका सांगतात,जेवलात का अस कोणी विचारत नाही

ठळक मुद्देतीन दिवसात संपले अन्नधान्यलहान मुलांना मक्याची कणसे देऊन भूक शमवतातकधी कधी मिळतो रानमेवा

सोयगाव : हातांना काम नाही, आठवडा घरातच बसून निघून गेला, यात घरात होता तेवढा किराणा संपल्यावर मात्र तीन दिवसापासून चक्क पाण्यावर भूक भागविण्याची वेळ सोयगाव तालुक्यातील रामपूरवाडी गावावर आली आहे. यामुळे येथील  आदिवासी ग्रामस्थ एकमेकांच्या तोंडाकडे पाहत केवळ पाणी पिऊन झोपी जात आहेत. गावात शासनाची लोक बाहेर पडू नका म्हणून येतात मात्र जेवलात का असे कोणी विचारात नसल्याची खंत ग्रामस्थ बोलून दाखवतात. 

कोरोनामुळे शासनाची संचारबंदी आणि जनजागृती उल्लेखनीय आहे.परंतु लॉकडाऊनच्या फटक्यात मात्र आदिवासी रामपूरवाडीच्या ग्रामस्थांचे पोट रिकामे आहे त्याचे काय ? आत आम्हाला मरण द्या हीच मागणी असल्याचे ग्रामस्थांनी निराशेने सांगितले .सोयगाव तालुक्यातील या आदिवासी गावात भयावह स्थिती निर्माण झाली आहे.घरात एकवेळचा किराणा भुसार नाही,पहाटे उठल्यावर केवळ तोंड धुवून हात बांधून बसावे लागते। कारण त्यांच्याकडे एकवेळचं चहाचे सुद्धा साहित्य उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४०० ते ५०० लोकवस्तीचे हे गाव सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गाला लागुनच आहे.या मार्गावरून जिल्हा पातळीवरील अनेक विभागाचे अधिकारी कोरोना संसर्गाच्या उपाय योजनेसाठी जातात मात्र या गावात मात्र अद्याप कोणीही निरखून पाहिलेले नाही. गैरसोयी तर दूरच परंतु या आदिवासी ग्रामस्थांना पोटासाठी तुकडा सुद्धा मिळत नसल्याने ग्रामस्थ शासनाच्या संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या विळख्यात मरणाच्या दारात उभे आहेत .रविवारी लोकमत प्रतिनिधीने येथे भेट दिली. तेव्हा घरात भाकरीचे पीठही नसल्याचे वास्तव समोर आले होते, त्यामुळे चुलीच पेटलेल्या नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. लोकमतने या गावाचा जवळून आढावा घेतला असता,गावातील आदिवासींच्या चुली तीन दिवसापासून पेटलेल्या नव्हत्या आणि शेजारील एका शेतातून अवकाळी पावसात नुकसान होवून आडव्या झालेल्या मक्याच्या कणीस भाजून काही लहान बालकांना या गावातील ग्रामस्थांनी खाऊ घालून झोपी घातले असल्याचे सांगितले.  हंडाभर पाण्यावर कुटुंब भागावातेय भूकपाण्यावर तहान भागविली हे आपण ऐकले असेल,परंतु चक्क पाण्यावर भूक भागवावी लागते हे ऐकल्यावर तुमच्या अंगाला काटाच उभा राहील,हि सत्य परिस्थिती आहे.आदिवासी रामपूर वाडी गावाची दिवसभर हंडाभर पाणी जवळ घेवून अख्खे कुटुंब लहान बालकांसह या पाण्यावर भूक भागवीत आहे जंगलात रानमोळा घेण्यासाठी जाता येत नाही आणि घरात साहित्याचा तुटवडा त्यामुळे अन्ना विना या ग्रामस्थांना राहावे लागत आहे.

कधीकधी मिळतो रानमेवापोटात अन्नाचा कण नसलेल्या गावातील तरुण मंडळी मात्र रानात दुपारच्या सुमारास जावून रानमेवा गोळा करून आणतात व त्यावर काही कुटुंब आणि लहान बालकांची गुजराण चालू आहे.परंतु रानातही किती दिवस रानमेवा भेटणार याचीच चिंता काहींना लागून आहे.

मायबापांन्नो ह्यों कोणता रोग आणलाय आम्हाला भाकर भेटेना हा रोग होण्याच्या आधी मला मरण आले पाहिजे तीन दिवसापासून अन्न कसे असते हे या पोटाने पाहिलेले नाही.सगळे पोऱ्ह,बाया पाणी पिवून झोपता रे - सुंदराबाई सोनवणे

दुकाने बंद झाली...पोलीस गावात येतात पण फिरू नका म्हणतात पण जेवालिका हे कोणीच पुसत नाही रे भाऊ.......दोन दिवसात मी मरणारच आहे.पण माझ्या या लेकरांकडे लक्ष ठेवा म्हणजे झाल - सयाबाई सोनवणे

पहाटे उठल्यावर चहाबी भेटत नाही साहेब परवाच्या रात्रीला भाकरीचा तुकडा खाल्ला अजीनही तशीच आहे.....कोणता रोग आणलाय आणि आमची भाकरच बंद झाली भाऊ - - म्हाळसाबाई पवार

घरात कोणालाच कामे नाही काय खायचे त्यामुळे घरातच उपाशी पोटी बसून आहे.....शनिवारी सकाळी जेवण केले अजून पोटात अन्नाचा कण नाही किती दिवस असा ठेवणार.- सीताबाई सोनवणे

निराधार पगार मिळत होता त्यावर मी एकटी उदरनिर्वाह करत होती पण आता त्योबी भेटेना दुकानदार उधार सामान देत नाही काय करावे.- जयवंताबाई ठाकरे

तात्काळ मदत करूतालुक्यात मार्च अखेरीसचा धान्य साठा शंभर टक्के वितरीत करण्यात आल आहे.त्यामुळे धान्याची चणचण अशी तक्रार अद्याप पावेतो प्राप्त नाही.रामपूर वाडी बाबत आजच माहिती मिळाली या गावाला सोमवारी प्रत्यक्ष भेट देवून येथील नागरिकांना उधारीवर किराणा सामान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शासनाने कोरोना बाबत जाहीर केलेल्या पॅकेज मधून किराणा सामानाचे देयके दुकानदाराला देण्यात येईल या गावात निराधार योजनेच्या लाभार्थी असेल तर त्याची माहिती घेवून तातडीने या लाभार्थ्यांना संचार बंदीत स्वतंत्रपणे तातडीने मदत म्हणून निधी वितरण करू.- प्रवीण पांडे,तहसीलदार सोयगाव 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद