शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाची साखळी तुटतेय; पॉझिटिव्ह रुग्णांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 19:04 IST

शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरल्याने कोरोनाचा विळखा कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्दे १०० टक्के लॉकडाऊननंतर रुग्णांचा आलेख घसरला

औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने १५ ते २० मेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊन पाळण्यात आले. हे ६ दिवस कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतर शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरल्याने कोरोनाचा विळखा कमी होताना दिसत आहे.

औरंगाबादेत २७ एप्रिल रोजी  २९ रुग्णांचे निदान झाले आणि एकच खळबळ उडाली. एका दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ होती; परंतु या दिवसापासून रोजच वाढते रुग्ण निदान होण्यास सुरुवात झाली. निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. एका दिवशी १०० रुग्णांचे निदानही शहरात झाले. त्यामुळे कोरोनाचा विळखा घट्ट होत गेला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. लॉकडाऊन कडक करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली.  ३ ते १४ मेदरम्यान विषम तारखेला शहर शंभर टक्के लॉकडाऊन,  तर सम तारखेला केवळ सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर १५ ते २० मेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. हा आकडा शून्यावर केव्हा येतो याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

असा झाला फायदा : १०० टक्के लॉकडाऊनमुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात अन्य व्यक्ती येण्याचे टळले. तसेच बाधित व्यक्ती या घरातच राहिल्या. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची म्हणजे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. सम-विषम तारखेच्या लॉकडाऊनच्या कालावधीत आणि सध्याही नागरिकांना काही मोजके तासच मुभा देण्यात आली. तेही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयोगी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज निदान होणाऱ्या रुगणांच्या संख्येत घट होत आहे. विशेषत: १०० टक्के लॉकडाऊननंतर रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. हीच स्थिती राहिल्यास शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद