शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाची साखळी तुटतेय; पॉझिटिव्ह रुग्णांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 19:04 IST

शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरल्याने कोरोनाचा विळखा कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्दे १०० टक्के लॉकडाऊननंतर रुग्णांचा आलेख घसरला

औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने १५ ते २० मेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊन पाळण्यात आले. हे ६ दिवस कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतर शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरल्याने कोरोनाचा विळखा कमी होताना दिसत आहे.

औरंगाबादेत २७ एप्रिल रोजी  २९ रुग्णांचे निदान झाले आणि एकच खळबळ उडाली. एका दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ होती; परंतु या दिवसापासून रोजच वाढते रुग्ण निदान होण्यास सुरुवात झाली. निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. एका दिवशी १०० रुग्णांचे निदानही शहरात झाले. त्यामुळे कोरोनाचा विळखा घट्ट होत गेला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. लॉकडाऊन कडक करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली.  ३ ते १४ मेदरम्यान विषम तारखेला शहर शंभर टक्के लॉकडाऊन,  तर सम तारखेला केवळ सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर १५ ते २० मेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. हा आकडा शून्यावर केव्हा येतो याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

असा झाला फायदा : १०० टक्के लॉकडाऊनमुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात अन्य व्यक्ती येण्याचे टळले. तसेच बाधित व्यक्ती या घरातच राहिल्या. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची म्हणजे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. सम-विषम तारखेच्या लॉकडाऊनच्या कालावधीत आणि सध्याही नागरिकांना काही मोजके तासच मुभा देण्यात आली. तेही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयोगी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज निदान होणाऱ्या रुगणांच्या संख्येत घट होत आहे. विशेषत: १०० टक्के लॉकडाऊननंतर रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. हीच स्थिती राहिल्यास शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद