शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Aurangabad : ग्रामीण भागात रेड अलर्ट; आठवडाभरात कोरोना शिरला ५९ नव्या गावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:27 IST

CoronaVirus in Aurangabad : कोरोनाचे संक्रमण गेल्या १५ दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्तीच्या वाटेवरील ११ गावांत पुन्हा संक्रमण सक्रिय रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या वाढून झाली ६९५

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढतच आहे. गेल्या आठवडाभरात ५९ नव्या गावांत कोरोना विषाणूचे संक्रमण शिरले आहे. २५ एप्रिलला सक्रिय रुग्ण ६३३ गावांत होते. त्यात २ मेपर्यंत ६२ गावांची भर पडून आता ६९५ गावांतील सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर २८ दिवसांपासून रुग्ण न आढळलेल्या म्हणजेच कोरोनामुक्तीच्या वाटेवरील गावांची संख्या १३३ वरून ११ ने घटून १२२ झाली.

कोरोनाचे संक्रमण गेल्या १५ दिवसांपासून शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत आहे. त्यात कोरोनाची चाचणी गेल्या आठवड्याच्या शेवटी घटलेली पहायला मिळाल्याने बाधितांचा आकडा पाचशेच्या आत दिसून आला. मात्र, नव्या गावांत आणि कोरोनामुक्तीच्या वाटेवरील गावांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव हे चिंताजनक असून आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेनेही त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सध्या ग्रामीण भागातील मृत्यूचा दर वाढलेला आहे. तसेच गंभीर रुग्ण शेवटच्या क्षणी उपचारासाठी दाखल होत असल्याचेही निरीक्षण घाटीच्या तज्ज्ञांनी नोंदवल्याने कोरोना रुग्णांचा शोध व ट्रेसिंग वाढवण्यावर भर तसेच ग्राम दक्षता समित्यांकडून तपासणीला आणखी सहकार्य अपेक्षित आहे.

४२ गावांत १०० पेक्षा अधिक रुग्णजिल्ह्यात १३६८ गावांपैकी ११५३ गावांत कोरोनाचा शिरकाव आतापर्यंत झाला, तर २ मे रोजी ६९५ गावांत सक्रिय रुग्ण आहेत. ४७६ गावांत २५ पेक्षा कमी, १२१ गावांत २५ ते ५० दरम्यान रुग्ण आहेत, तर ५० ते १०० दरम्यान ५६ तर १०० पेक्षा अधिक ४२ गावांत रुग्ण आहेत.

२ मेची स्थितीतालुका -बाधित गावांची संख्याऔरंगाबाद -९६फुलंब्री -४५गंगापूर -१०२कन्नड -१०२खुलताबाद -२३पैठण -११०सिल्लोड -७७सोयगाव -१०४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद