शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Coronavirus In Aurangabad : लॉकडाऊन काळात शहरात हजार कोटींचा व्यापार होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:06 IST

कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार दोन वर्षे पाठीमागे गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकामगारांचे वेतन, वीज बिल, दुकान भाडे भरण्याचाही  निर्माण होईल प्रश्न पुन्हा लॉकडाऊनमुळे छोटे व्यापारी येणार अडचणीत  

औरंगाबाद : शहरात १० ते १८ जुलैदरम्यान शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने या ९ दिवसांच्या काळात शहरातील व्यापाऱ्यांचा सुमारे  ८०० ते एक हजार कोटी रुपयांचा व्यापार ठप्प होणार आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार दोन वर्षे पाठीमागे गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

शहरात किराणा दुकाने वगळता अन्य व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक छोटे व्यापारी दुकानांचे भाडेही भरू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. अनलॉकमध्ये दुकाने सुरू झाली. मात्र, पी-वन, पी-टूच्या नियमांचा फटका बसला. या परिस्थितीतही व्यापारी आपला व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न करीत असतानाच आता १० जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने त्याचा व्यापारी व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. कामगार, शेतकरी ते उद्योजकापर्यंत सर्वांना सवलती दिल्या गेल्या; पण व्यापाऱ्यांना सवलत जाहीर न झाल्याने त्यांच्यात  संताप व्यक्त करण्यात येत आहे. १८ जुलैनंतर व्यापार सुरळीत सुरू होण्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, तर काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, मोठे व्यापारी तग धरून राहतील; पण लहान व्यापाऱ्यांना मात्र घरखर्च भागवणे कठीण जाणार आहे. बँकेचे कर्ज, दुकान भाडे, वीज बिल, कर्मचाऱ्यांचा पगार देणे कठीण जाईल. त्यांच्यासमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण होईल. व्यापारी महसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बाजारपेठ बंद राहणार असल्याने ९ दिवसांत ८०० ते एक हजार कोटींची उलाढाल ठप्प राहील. 

व्यापारी संघटनांचे पदाधिकारी म्हणतात...९ दिवसांच्या लॉकडाऊनचा पुढील १५ दिवस जाणवेल परिणामअनलॉकनंतर व्यवहार सुरळीत सुरू होण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. आता कुठे कार व दुचाकीची विक्री वाढू लागली होती; पण पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार आहे. ९ दिवस व्यवहार बंद राहणार आहे. पुन्हा व्यवहार पूर्ववत सुरू होण्यासाठी १५ दिवस लागतील. महिन्याची एकूण उलाढाल ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. - राहुल पगरिया, अध्यक्ष, चेंबर आॅफ अर्थोराईज आटोमोबाईल डीलर्स असोसिएशन

व्यापाऱ्यांचे नुकसान होणार; पण भविष्याचेही नियोजन व्हावेमागील तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने विलगीकरण कक्ष वाढवणे, व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे, अपेक्षित होते. मात्र, नियोजन न झाल्याने त्याचा परिणाम शहरला भोगावा लागला, तसेच पोलिसांनी सुरुवातीच्या काळात कडक पाऊल उचलले नाही. या चुका टाळता आल्या असत्या; पण आता प्रशासनाला ९ दिवसांचा वेळ मिळत आहे. या काळात भविष्यातील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन नियोजन करावे. -लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

मोंढा, जाधववाडीत ८० कोटींचे नुकसान९ दिवसांत मोंढा व जाधववाडी धान्याची बाजारपेठ मिळून ७० ते ८० कोटींचे नुकसान होणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी परराज्यातील धान्याच्या आॅर्डरी रद्द करणे सुरू केले आहे. जे मालट्रक ९ तारखेच्या आत येतील त्यातील माल उतरवून घेण्यात येणार आहे. -नीलेश सेठी, अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन

हॉटेल, लॉजिंग बंद असल्याने परिणाम नाहीचहॉटेल, लॉजिंग बंदच आहे. आता सरकारने लॉजिंगला परवानगी दिली; पण विमानसेवा बंद, पर्यटनस्थळे बंद आहेत. कोरोनामुळे कोणी शहरात येण्यास तयार नाही. यामुळे पुन्हा लॉकडाऊन केले तरी हॉटेल, लॉजिंगवर विशेष परिणाम होणार नाही. - शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशन

यापुढे लॉकडाऊन करणे परवडणार नाहीतीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही आता पुन्हा ९ दिवसांचा लॉकडाऊन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे आम्ही व्यावसायिक उलाढालीत दोन वर्षे मागे पडलो आहोत. पुन्हा भरारी घेण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल. यामुळे यापुढे लॉकडाऊन करणे व्यापाऱ्यांना परवडणार नाही. -आनंद भारुका, अध्यक्ष, सिटीचौक, सराफा असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद