शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Aurangabad : औरंगाबादचे दिल्ली कनेक्शन; धार्मिक कार्यक्रमात सहभागी भाविक होम क्वारंटाईनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 09:35 IST

कोरोनाच्या संशयावरून आरोग्य विभाग, मनपा, पोलिसांनी घेतला शोध

ठळक मुद्देभाविकांना येऊन १४ दिवस उलटले,२९ भाविकांचा समावेश,घाबरण्याचे कारण नाही

औरंगाबाद : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल २९ भाविक सहभागी झाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आणि आरोग्य विभाग, मनपाची झोप उडाली. ही बाब चिंताजनक असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला.

दिल्लीत १३ ते १५ मार्चदरम्यान हा धार्मिक कार्यक्रम झाला होता. यात परदेशातून आणि देशभरातून भाविक सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्याना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आणि दिल्लीत एकच खळबळ उडाली. याच धार्मिक कार्यक्रमाचे आता औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २९ भाविक याठिकाणी गेले होते. यासंदर्भात आरोग्य विभाग, महापालिका,जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनापर्यंत माहिती येऊन धडकली. या सर्व २९ जणांचा शोध घेण्यात आला. यात १४ जण शहरात आणि ८ ग्रामीण भागातील आहेत. तर ७ जण दिल्लीसह अन्य शहरात आहेत.

भाविक जिल्ह्यात परत येऊन १४ दिवस उलटले आहे. कोरोनाची लक्षणे १४ दिवसात समोर येतात. त्यामुळे फारसे घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. तरीही खबरदारी घेतली जात आहे. सर्वांशी फोनवर संपर्क झाला आहे. काहींच्या घरी भेटी देण्यात आल्या. जिल्हा रुग्णालयात काहींची तपासणीही झाली. कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. शहरातील भाविकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे, सर्वांची पुन्हा तपासणी केली जाईल, असे मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

फोनवर संपर्क, घरांना भेटी

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या २९ पैकी १४ जण शहरातील, ८ जण ग्रामीण भागातील आहेत. तर ७ जण औरंगाबादबाहेर आहेत. हे ७ जण दिल्ली, गुजरात, पंजाब, बुलढाणा येथे आहेत. त्यांनी औरंगाबादचा पत्ता दिलेला आहे. बहुतांश जणांशी फोनवर सम्पर्क झाला आहे. शहरातील १४ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सर्वांची प्रकृती ठीक आहे, घरांना भेटीही दिल्या, अशी माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

भाविकांची यादी मिळाली दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले होते. त्यांची यादी प्राप्त झाली असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले.

दिल्लीत महिनाभर राहिलेले ६ जण नेले तपासणीसाठी

दिल्लीत लग्नसमारंभासाठी गेलेले ६ जण एका भागात परत आल्याची माहिती मंगळवारी फोनवरून क्रांतिचौक पोलिसांना मिळाली. यावरून या ६ जनासह अन्य एका व्यक्तीस पोलिसांनी तपासणीसाठी रुग्णालयात नेले. या घटनेने याभागातील नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असल्याची चर्चा परिसरात होती. पोलिसांनी मात्र त्यास नकार दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद