शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

CoronaVirus In Aurangabad : औरंगाबादचे दिल्ली कनेक्शन; धार्मिक कार्यक्रमात सहभागी भाविक होम क्वारंटाईनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 09:35 IST

कोरोनाच्या संशयावरून आरोग्य विभाग, मनपा, पोलिसांनी घेतला शोध

ठळक मुद्देभाविकांना येऊन १४ दिवस उलटले,२९ भाविकांचा समावेश,घाबरण्याचे कारण नाही

औरंगाबाद : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल २९ भाविक सहभागी झाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आणि आरोग्य विभाग, मनपाची झोप उडाली. ही बाब चिंताजनक असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला.

दिल्लीत १३ ते १५ मार्चदरम्यान हा धार्मिक कार्यक्रम झाला होता. यात परदेशातून आणि देशभरातून भाविक सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्याना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आणि दिल्लीत एकच खळबळ उडाली. याच धार्मिक कार्यक्रमाचे आता औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २९ भाविक याठिकाणी गेले होते. यासंदर्भात आरोग्य विभाग, महापालिका,जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनापर्यंत माहिती येऊन धडकली. या सर्व २९ जणांचा शोध घेण्यात आला. यात १४ जण शहरात आणि ८ ग्रामीण भागातील आहेत. तर ७ जण दिल्लीसह अन्य शहरात आहेत.

भाविक जिल्ह्यात परत येऊन १४ दिवस उलटले आहे. कोरोनाची लक्षणे १४ दिवसात समोर येतात. त्यामुळे फारसे घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. तरीही खबरदारी घेतली जात आहे. सर्वांशी फोनवर संपर्क झाला आहे. काहींच्या घरी भेटी देण्यात आल्या. जिल्हा रुग्णालयात काहींची तपासणीही झाली. कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. शहरातील भाविकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे, सर्वांची पुन्हा तपासणी केली जाईल, असे मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

फोनवर संपर्क, घरांना भेटी

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या २९ पैकी १४ जण शहरातील, ८ जण ग्रामीण भागातील आहेत. तर ७ जण औरंगाबादबाहेर आहेत. हे ७ जण दिल्ली, गुजरात, पंजाब, बुलढाणा येथे आहेत. त्यांनी औरंगाबादचा पत्ता दिलेला आहे. बहुतांश जणांशी फोनवर सम्पर्क झाला आहे. शहरातील १४ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सर्वांची प्रकृती ठीक आहे, घरांना भेटीही दिल्या, अशी माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

भाविकांची यादी मिळाली दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले होते. त्यांची यादी प्राप्त झाली असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले.

दिल्लीत महिनाभर राहिलेले ६ जण नेले तपासणीसाठी

दिल्लीत लग्नसमारंभासाठी गेलेले ६ जण एका भागात परत आल्याची माहिती मंगळवारी फोनवरून क्रांतिचौक पोलिसांना मिळाली. यावरून या ६ जनासह अन्य एका व्यक्तीस पोलिसांनी तपासणीसाठी रुग्णालयात नेले. या घटनेने याभागातील नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असल्याची चर्चा परिसरात होती. पोलिसांनी मात्र त्यास नकार दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद