शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

coronavirus : १७ मेपर्यंत औरंगाबाद पूर्ण बंद; सम-विषमची शिथिलता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:11 IST

अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस सर्व काही राहणार बंद

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचा आदेश शहरासाठी ७२ तास महत्त्वाचे

औरंगाबाद : लॉकडाऊनसाठी १७ मेपर्यंत असलेली सम-विषम शिथिलतेची सूट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा रद्द करीत १७ मेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा आदेश काढल्याचे विभागाकडून कळविण्यात आले. 

१ मेपासून सम-विषम तारखांना बाजारपेठा चालू-बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या निर्णयात सम तारखांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत होती. या सवलतीत नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी पडू लागली. परिणामी, १०० रुग्णांच्या आत असलेली कोरोना रुग्णसंख्या सध्या ७५०पर्यंत पोहोचली आहे. गर्दीमुळे संसर्ग वाढत गेला; परंतु सम-विषम तारखांचा लॉकडाऊन नियम काही बदलला गेला नाही. 

सर्व प्रकारचे पास रद्द केंद्रेकर यांनी येणाऱ्या तीन दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. साफसफाई, वीज, पाणीपुरवठा, हॉस्पिटल, मेडिकल सेवा सुरू राहील. ज्यांना शहरात फिरण्यासाठी सवलतीचे पास दिले आहेत, ते पासदेखील रद्द करण्यात आले आहेत. सध्यातरी पुढील ७२ तासांसाठी शहरात १०० टक्के संचारबंदी असणार आहे. १७ मेनंतर याबाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय होतील. 

पोलीस करणार गुन्हे दाखल

लॉकडाऊन तीन अंतिम टप्प्यावर आहे.  संचारबंदी नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. आयुक्त म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये तीन दिवस पूर्ण संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.  शहरामध्ये सम आणि विषम तारखांचा निर्णय रद्द झाला आहे. उद्या १५ मेपासून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे वाहन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल. शिवाय लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी   सर्व पोलीस स्टेशनचे  अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद