शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : १७ मेपर्यंत औरंगाबाद पूर्ण बंद; सम-विषमची शिथिलता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:11 IST

अत्यावश्यक सेवा वगळता तीन दिवस सर्व काही राहणार बंद

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचा आदेश शहरासाठी ७२ तास महत्त्वाचे

औरंगाबाद : लॉकडाऊनसाठी १७ मेपर्यंत असलेली सम-विषम शिथिलतेची सूट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा रद्द करीत १७ मेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा आदेश काढल्याचे विभागाकडून कळविण्यात आले. 

१ मेपासून सम-विषम तारखांना बाजारपेठा चालू-बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतला होता. या निर्णयात सम तारखांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत होती. या सवलतीत नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी पडू लागली. परिणामी, १०० रुग्णांच्या आत असलेली कोरोना रुग्णसंख्या सध्या ७५०पर्यंत पोहोचली आहे. गर्दीमुळे संसर्ग वाढत गेला; परंतु सम-विषम तारखांचा लॉकडाऊन नियम काही बदलला गेला नाही. 

सर्व प्रकारचे पास रद्द केंद्रेकर यांनी येणाऱ्या तीन दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. साफसफाई, वीज, पाणीपुरवठा, हॉस्पिटल, मेडिकल सेवा सुरू राहील. ज्यांना शहरात फिरण्यासाठी सवलतीचे पास दिले आहेत, ते पासदेखील रद्द करण्यात आले आहेत. सध्यातरी पुढील ७२ तासांसाठी शहरात १०० टक्के संचारबंदी असणार आहे. १७ मेनंतर याबाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय होतील. 

पोलीस करणार गुन्हे दाखल

लॉकडाऊन तीन अंतिम टप्प्यावर आहे.  संचारबंदी नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. आयुक्त म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद शहरामध्ये तीन दिवस पूर्ण संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.  शहरामध्ये सम आणि विषम तारखांचा निर्णय रद्द झाला आहे. उद्या १५ मेपासून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे वाहन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल. शिवाय लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी   सर्व पोलीस स्टेशनचे  अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद