शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

Coronavirus In Aurangabad : शहरात आता अँटिबॉडी टेस्ट होणार; महापालिकेचे नियोजन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 17:13 IST

शनिवारी केंद्रीय पथक शहरात पाहणीसाठी आले होते. या पथकाने महापालिकेला अँटिबॉडी टेस्ट करण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्देमहापालिका शहरात दहा हजार टेस्ट करणारएका टेस्टसाठी तीन हजार रुपये खर्च तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक 

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहरात कोरोनाचे संक्रमण किती वाढले आहे, याची माहिती मिळविण्यासाठी महापालिका दहा हजार नागरिकांची अँटिबॉडी टेस्ट करणार आहे. केंद्रीय पथकाने शनिवारी महापालिकेला निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका नागरिकाच्या टेस्टसाठी साधारण तीन हजार रुपये खर्च येणार आहे. दहा हजार तपासण्यांचा खर्च तीन कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अँटिबॉडी टेस्टला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद शहरात महापालिकेने सर्वप्रथम लाळेचे नमुने घेऊन तपासणी करण्याचे तंत्र अवलंबले. एका व्यक्तीसाठी साधारण तीन हजार रुपये, असा या तपासणीचा खर्च आहे. त्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी अँटिजन टेस्टचा निर्णय घेतला. मागील तीन आठवड्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अँटिजन टेस्ट करण्यात येत आहेत. शहरात महापालिकेने ९० हजारांहून अधिक नागरिकांची टेस्ट केली. त्यात साडेबारा हजारांहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले. 

शनिवारी केंद्रीय पथक शहरात पाहणीसाठी आले होते. या पथकाने महापालिकेला अँटिबॉडी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. यानंतर लगेचच महापालिकेने नियोजन सुरू केले. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शंभर नागरिकांचा ग्रुप करून तपासणी करण्यात येईल. या तपासणीत घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यावरून साधारणत: अडीच तासांमध्ये अहवाल प्राप्त होतो. घाटी रुग्णालयात अँटिबॉडी तपासणीची व्यवस्था आहे. 

अँटिबॉडी टेस्ट म्हणजे काय?एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरस आल्यानंतर शरीरात आपोआप त्या व्हायरससोबत लढण्यासाठी अँटिबॉडीज तयार होतात. अँटिबॉडी तपासणीसंबंधित व्यक्तीला कोरोना झाला होता का, तसेच त्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची सूक्ष्म माहिती मिळेल. ज्यांच्या शरीरात व्हायरस दिसणार नाही त्यांना कोरोनाची भीती अधिक असेल. एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेलेला असेल तरी दोन आठवड्यांनंतर त्याचा शोध लावता येऊ शकतो. मात्र, अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर टेस्टमध्ये काहीही कळत नाही. 

प्लाझ्मा थेरपीसाठी फायदा एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये अँटिबॉडीज मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या असतील, तर प्लाझ्मा थेरपीसाठी अशा व्यक्तीचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असेही महापालिकेतील सूत्रांनी नमूद केले. शहरात किमान एक टक्का नागरिकांची तपासणी करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.  

नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही अँटिबॉडी टेस्टमध्ये ज्या नागरिकाच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतात त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यासंदर्भात घाबरण्याचे कोणतेही कारण नसते. पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या शरीरात कोरोनाचे व्हायरस किती प्रमाणात आहेत किंवा त्याला कोरोना कधी झाला होता, हे कळेल. टेस्ट घेतलेल्या नागरिकाला किंवा  त्यांच्या नातेवाईकांना जबरदस्तीने मनपा उपचारासाठी नेणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद