शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

CoronaVirus : औरंगाबादकरांची चिंता वाढली; कोरोनाच्या वाढलेल्या रुग्ण संख्येने शहर ‘रेड झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:45 IST

१५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्याने समावेश

ठळक मुद्देलॉकडाऊन अधिक कडक होण्याचे संकेत सध्या २४ कोरोना रुग्ण शहरात उपचार घेत आहेत

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश ‘रेड झोन’मध्ये झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र,रेड झोनमध्ये जिल्ह्याचा समावेश झाल्याने आता निर्बंध अधिक कठोर होतील. त्यातून कोरोनाला आळा बसण्यास निश्चितच मदत होईल,अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची रेड, आॅरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवरून ही विभागणी करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तो जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. १५ पेक्षा कमी रुग्ण आहे, त्या जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये आहे. तर १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये गेलेल्या जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत आहे. त्यामुळे औरंगाबादेतही निर्बंध आता आणखी कठोर होण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रेड झोनमुळे किमान यापुढे तरी नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद का गेले रेड झोनमध्ये?ज्या जिल्ह्यांत १५ पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये झाला. दहा दिवसांतच बदलली परिस्थिती औरंगाबादेत १ एप्रिलपर्यंत केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होती. हा रुग्णही उपचारामुळे निगेटिव्ह झाला आहे. परंतु २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत १९ पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. यात एका रुग्णांचा मृत्यूही झाला. ही विभागणी १ एप्रिल रोजी झाली असती तर औरंगाबाद निश्चित आॅरेंज झोनमध्ये असते. 

जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले...१५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्याने औरंगाबाद रेड झोनमध्ये आले आहे. यामुळे औरंगाबादेत लॉकडाऊन ३० तारखेपर्यंत राहिल. जिल्ह्याची सिमा बंदच राहिल. कोणाला प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा रुग्णालयात दाखल सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद