शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

CoronaVirus : औरंगाबादकरांची चिंता वाढली; कोरोनाच्या वाढलेल्या रुग्ण संख्येने शहर ‘रेड झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:45 IST

१५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्याने समावेश

ठळक मुद्देलॉकडाऊन अधिक कडक होण्याचे संकेत सध्या २४ कोरोना रुग्ण शहरात उपचार घेत आहेत

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश ‘रेड झोन’मध्ये झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र,रेड झोनमध्ये जिल्ह्याचा समावेश झाल्याने आता निर्बंध अधिक कठोर होतील. त्यातून कोरोनाला आळा बसण्यास निश्चितच मदत होईल,अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची रेड, आॅरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवरून ही विभागणी करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तो जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. १५ पेक्षा कमी रुग्ण आहे, त्या जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये आहे. तर १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये गेलेल्या जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत आहे. त्यामुळे औरंगाबादेतही निर्बंध आता आणखी कठोर होण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रेड झोनमुळे किमान यापुढे तरी नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद का गेले रेड झोनमध्ये?ज्या जिल्ह्यांत १५ पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये झाला. दहा दिवसांतच बदलली परिस्थिती औरंगाबादेत १ एप्रिलपर्यंत केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होती. हा रुग्णही उपचारामुळे निगेटिव्ह झाला आहे. परंतु २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत १९ पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. यात एका रुग्णांचा मृत्यूही झाला. ही विभागणी १ एप्रिल रोजी झाली असती तर औरंगाबाद निश्चित आॅरेंज झोनमध्ये असते. 

जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले...१५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्याने औरंगाबाद रेड झोनमध्ये आले आहे. यामुळे औरंगाबादेत लॉकडाऊन ३० तारखेपर्यंत राहिल. जिल्ह्याची सिमा बंदच राहिल. कोणाला प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा रुग्णालयात दाखल सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद