शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : औरंगाबादकरांची चिंता वाढली; कोरोनाच्या वाढलेल्या रुग्ण संख्येने शहर ‘रेड झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:45 IST

१५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्याने समावेश

ठळक मुद्देलॉकडाऊन अधिक कडक होण्याचे संकेत सध्या २४ कोरोना रुग्ण शहरात उपचार घेत आहेत

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश ‘रेड झोन’मध्ये झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र,रेड झोनमध्ये जिल्ह्याचा समावेश झाल्याने आता निर्बंध अधिक कठोर होतील. त्यातून कोरोनाला आळा बसण्यास निश्चितच मदत होईल,अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची रेड, आॅरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवरून ही विभागणी करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तो जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. १५ पेक्षा कमी रुग्ण आहे, त्या जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये आहे. तर १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये गेलेल्या जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत आहे. त्यामुळे औरंगाबादेतही निर्बंध आता आणखी कठोर होण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रेड झोनमुळे किमान यापुढे तरी नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद का गेले रेड झोनमध्ये?ज्या जिल्ह्यांत १५ पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये झाला. दहा दिवसांतच बदलली परिस्थिती औरंगाबादेत १ एप्रिलपर्यंत केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होती. हा रुग्णही उपचारामुळे निगेटिव्ह झाला आहे. परंतु २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत १९ पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. यात एका रुग्णांचा मृत्यूही झाला. ही विभागणी १ एप्रिल रोजी झाली असती तर औरंगाबाद निश्चित आॅरेंज झोनमध्ये असते. 

जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले...१५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्याने औरंगाबाद रेड झोनमध्ये आले आहे. यामुळे औरंगाबादेत लॉकडाऊन ३० तारखेपर्यंत राहिल. जिल्ह्याची सिमा बंदच राहिल. कोणाला प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा रुग्णालयात दाखल सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद