शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : दूध, वर्तमानपत्र वगळता सर्व बंद; रस्त्यावर पायी जाणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:02 IST

संचारबंदीच्या नागरिक अजिबात घराबाहेर पडणार नाहीत याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे पोलिसांसोबत महापालिका यंत्रणा उभी राहणारअत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांनाच इंधन मिळेल.

औरंगाबाद : शहरात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. या काळामध्ये सकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये नागरिकांना दूध आणि वर्तमापत्र उपलब्ध होईल. याशिवाय कोणत्याही जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. यादृष्टीने विचारविमर्श सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. संचारबंदीच्या काळामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दोन शिफ्टमध्ये पोलिसांना सहकार्य करणार आहेत.

संचारबंदीच्या नागरिक अजिबात घराबाहेर पडणार नाहीत याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. मागील शहर पोलिसांना संचारबंदीत महापालिकेचे दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी दोन शिफ्टमध्ये मदत करणार आहेत. २० पॉइंटवर लॉकडाऊन सहायक, लॉकडाऊन सुपरवायझर, ५० ठिकाणी सेक्टर आॅफिसर यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी काही आॅब्झर्व्हर नेमण्यात येणार आहेत. शासकीय पेट्रोल पंप वगळता काही पंप चालू ठेवण्यासंदर्भात इतर पेट्रोल  पंपचालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांनाच इंधन मिळेल.

रस्त्यावर पायी जाणाऱ्यांवरही गुन्हे : संचारबंदीच्या काळात रस्त्यावर पायी चालणाऱ्यांविरुद्धही यावेळी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पाण्डेय यांनी स्पष्ट केले. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात विविध कारणांनी लोक पायी फिरत होते.

मोटारसायकल जप्त होणार : संचारबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारचे दुचाकी किंवा इतर वाहन रस्त्यावर आल्यास ते जप्त केले जाणार आहे. शिवाय वाहनधारकांचा परवाना जप्त करून त्यांच्यावर गुन्हेही दाखल होणार आहेत. यासाठी महापालिकेतर्फे ठिकठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची टेस्टसंचारबंदीच्या काळामध्ये नागरिकांनी शहरात येण्याचे टाळावे. विविध  प्रमुख मार्गांवर महापालिका मोबाईल टीम उभी करणार आहे. शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची जागेवरच कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

वर्तमानपत्रांकडून यादी मागवणार : संचारबंदीच्या काळामध्ये शहरातील प्रमुख वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगून आम्ही यादी मागून घेणार आहोत. वर्तमानपत्रांकडून आलेल्या यादीनुसार संबंधितांना पास देण्यात येतील. पास नसलेल्या पत्रकारांना बाहेर पडता येणार नाही. सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वर्तमानपत्र वितरणास परवानगी असेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद