शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

coronavirus : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत १३ विद्युत, गॅसदाहिनी; स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 17:53 IST

coronavirus : नांदेडमध्ये ३, लातूरमध्ये २, उदगीरमध्ये १, हिंगोली १, जालन्यात १, औरंगाबादमध्ये ४ आणि बीडमध्ये १ अशा १३ विद्युत व गॅसदाहिन्या होतील.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे.विभागात दररोज १०० ते १५० बाधितांचा मृत्यू होत आहे. उद्योजक आणि औरंगाबाद फर्स्टचे सहकार्य मिळणार

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे दररोज शंभराहून अधिक मृत्यू होत असल्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. मृतदेहाची अवहेलना होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्युतदाहिनी सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उस्मानाबाद, परभणी वगळता उर्वरित औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये महिनाभरात दाहिन्या कार्यान्वित होणार आहेत.

नांदेडमध्ये ३, लातूरमध्ये २, उदगीरमध्ये १, हिंगोली १, जालन्यात १, औरंगाबादमध्ये ४ आणि बीडमध्ये १ अशा १३ विद्युत व गॅसदाहिन्या होतील. परभणी आणि उस्मानाबादसाठी लवकरच निर्णय होणार आहे. बीडमध्ये तांत्रिक अडचण आहे, ती पूर्ण होईल. बाकीच्या जिल्ह्यात लवकरच काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. एका रुग्णवाहिकेत एकावर एक रचून अनेक मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले होते. या प्रकारानंतर प्रशासकीय यंत्रणेने विद्युत, गॅसदाहिनी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त जगदीश मिनीयार, औरंगाबाद फर्स्टचे प्रीतीश चटर्जी, मसिआचे अभय हंचनाळ, सीएमआयएचे सतीश लोणीकर, सीआयआय रमण अजगांवकर उपस्थित होते. वर्षभरापासून कोरोना महामारी सुरू असून, चार महिन्यांपासून दुसऱ्या लाटेने रौद्ररूप धारण केले आहे. या लाटेत रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, विभागात दररोज १०० ते १५० बाधितांचा मृत्यू होत आहे. औरंगाबाद, नांदेडसारख्या जिल्ह्यांत दिवसाला २५ ते ३० रुग्ण दगावत आहेत.

स्मशानभूमीत सगळे कुटुंब राबतेकोरोनाने दगावलेल्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे थेट स्मशानभूमीत नेला जातो. बऱ्याच ठिकाणी कुटुंबातील सदस्य अंत्यविधीला नसतात. स्मशानभूमीत मृतदेह येत असल्याने जागेअभावी अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. शिवाय स्मशानजोगींचे पूर्ण कुटुंब दिवसरात्र काम करीत आहे. महिला, मुलेदेखील मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी परिश्रम घेतात. या सगळ्या परिस्थितीवर गॅस आणि विद्युतदाहिनी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद