शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

कोरोनाचा कहर ! १० ते १९ जुलैपर्यंत औरंगाबादेत संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 08:38 IST

पुढील आठ दिवस शहरावर राहणार प्रशासनाचे बारीक लक्ष

ठळक मुद्दे४ जुलैपासून वाळूज परिसरात कडक संचारबंदीआता नाही तर कधीच नाही

औरंगाबाद : दररोज दोनशेच्या संख्येने वाढणाऱ्या 'कोरोना'ला रोखण्यासाठी महापालिका हद्दीत १० ते १९ जुलैपर्यंत अत्यंत कडक संचारबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

२ ते ९ जुलैपर्यंत शहरातील वाढती रुग्णसंख्या, नागरिक नियमांचे किती पालन करतात यावर प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. या काळात परिस्थितीत सुधारणा झाल्यास संचारबंदी बाबत पुन्हा विचार केला जाऊ शकतो. मात्र, परिस्थिती सुधारली नाही तर १० पासून संचारबंदी लावण्यात येईल. बुधवारी एका बैठकीत हा निर्णय झाला. या काळात कोणतेही कारण देऊन नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. शहरात राहणाऱ्या एमआयडीसीच्या कामगारांना पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

आता नाही तर कधीच नाहीकोरोना आजाराची साखळी तोडण्याची संधी प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. औरंगाबादकरांनी या उपक्रमाला १०० % साथ दिली तर कोरोना प्रसाराची साखळी सहज तोडता येईल असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. आता नाही केले तर नंतर कधीच नाही असेही सूत्रांनी नमूद केले.

काय राहणार उघडे,काय बंद ?मेडिकल आणि दुधाची दुकाने काही तास उघडी ठेवण्यात येणार आहेत . किराणा दुकान उघडी ठेवण्यावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले नाही. काही अधिकाऱ्यांनी एकदिवस आड काही तास किराणा दुकान सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आठही दिवस किराणा दुकान बंद करण्याचा विचार सुरू आहे. 

४ जुलैपासून वाळूज परिसरात संचारबंदी४ जुलैपासून वाळूज औद्योगिक वसाहत आणि परिसरात कडक संचारबंदी लावण्यात येणार आहे. १ जूनपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत आहेत.  बजाजनगर आणि आसपासच्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका