शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona Virus : औरंगाबादमध्ये सहा लाख नागरिक झाले ‘लसवंत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 14:01 IST

Corona Virus in Aurangabad : दुसरा डोस घेण्यासाठी ४५ हजार नागरिकांना लसींची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या डोससाठी अनेकांची प्रतीक्षा ५ लाख ७७ हजार जणांचे लसीकरण बाकी

औरंगाबाद: कोरोना प्रतिबंधक लस घेऊन शहरात ६ लाख नागरिक ‘लसवंत’ झाले आहेत. मात्र दुसरा डोस घेण्यासाठी ४५ हजार नागरिकांना लसींची प्रतीक्षा कायम आहे. आणखी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण होणे बाकी असल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

१८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याने लाखांचा टप्पा पूर्ण होत आहे. ४ ऑगस्टपर्यंत ५ लाख ९९ हजार २०४ नागरिकांचे लसीकरण मनपाने पूर्ण केले आहे. त्यात ४ लाख २४ हजार १४४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून १ लाख ७५ हजार ६०० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सहा लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी ८०० नागरिकांच्या लसीकरणाची गरज होती. गुरुवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसीकरणामुळे १,९१२ नागरिकांचे लसीकरण झाल्याने महापालिका हद्दीतील ६ लाख १ हजार ११६ नागरिक लसवंत झाले आहेत. शहरासाठी लसीकरणाचे ११ लाख ७६ हजार ९९९ उद्दिष्ट आहे. त्यापैकी ५ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण बाकी आहे.

आज लसीकरण बंद: तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन मिळणारमनपाला मिळालेले साडेसात हजार लस डोस संपले आहेत. लस पुरवठा होणार नसल्याने शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. फक्त कोव्हॅक्सिन लस तीन केंद्रांवर उपलब्ध असेल. क्रांती चौक, राजनगर आणि सिडको एन-४ मधील एमआयटी हॉस्पिटल येथे सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद