शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

corona virus : दररोज रात्री ७ ते ११ वाजेदरम्यान पोलीस रस्त्यावर; शहरात संचारबंदीची कठोर अमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 18:52 IST

corona virus in aurangabad शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यानी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देशहरातील काही कॉलनीत व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळतो तर काही व्यापारी रात्री ८ वाजल्याशिवाय शटर खाली करीत नाहीत.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात रात्री ८ ते सकाळी ६ या कालावधीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची काटेकोरपणे अमलबजावणी सर्व ठाण्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्री ७ ते ११ वाजेपर्यंत रस्त्यावर उभे राहून नाकाबंदी आणि गस्त करीत असल्याचे दिसून आले. याविषयी स्पष्ट आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिले होते.

शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यानी कंबर कसली आहे. रात्री ८ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी आणि शनिवारी, रविवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे कोरोनाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर हे शक्य आहे. असे असूनही नागरिक रात्री ८ वाजेनंतर संचारबंदीचे उल्लंघन करून फिरताना दिसतात. रात्री ८ वाजता दुकाने बंद केल्यावर घरी जाण्यासाठी ते गर्दी करतात. यामुळे आठ वाजता रस्त्यावर गर्दी पाहायला मिळते. ही बाब समोर आल्यावर रात्री साडेसात अथवा त्यापूर्वी दुकाने बंद करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यास सांगितले जात आहे. 

शहरातील काही कॉलनीत व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळतो तर काही व्यापारी रात्री ८ वाजल्याशिवाय शटर खाली करीत नाहीत. परिणामी पोलिसांना दंडुका दाखवून दुकाने बंद करावे लागत आहे. गुरुवारी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील हे स्वतः गुलमंडी, शहागंज, टिळकपथ आणि शहरात गस्तीवर होते. प्रत्येक पोलीस ठाण्यातील ३३ टक्के अधिकारी-कर्मचारी यांना रोज रात्री ७ ते ११ पर्यंत बंदोबस्ताचे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद