शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

संपूर्ण शहरात नाही; कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास जेथे गर्दी, जास्त रुग्ण, तेथेच लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 13:21 IST

corona virus शहराच्या ज्या भागात गर्दी जास्त आहे आणि बाधितांची संख्या देखील जास्त आहे, त्या भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांचा इशारा सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना लॉकडाऊनची भीती वाटत आहे.

औरंगाबाद : शहरात ३०० ते ३५० रुग्ण आढळून आले तर विदर्भातील जिल्ह्याप्रमाणे औरंगाबादेत सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. ज्या भागात नागरिकांची सर्वाधिक गर्दी होत आहे, ज्या ठिकाणी रुग्णमोठ्या संख्येने आढळून येत आहेत, तेथे संचारबंदी लावण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना लॉकडाऊनची भीती वाटत आहे. या संदर्भात पत्रकारांनी पाण्डेय यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संपूर्ण शहर लॉकडाऊन केले पाहिजे असे नाही. शहराच्या एका भागात देखील लॉकडाऊन केले जाऊ शकते. त्यामुळे शहराच्या ज्या भागात गर्दी जास्त आहे आणि बाधितांची संख्या देखील जास्त आहे, त्या भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

कठोर निर्णय हिताचे ठरत आहेतशहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे, ही बाब लक्षात घेऊन शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगल कार्यालयांवर कडक निर्बंध घातले आहेत, त्यामुळ‌े कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. १९ फेब्रुवारी रोजी १४३ कोरोनाबाधित होते. २० फेब्रुवारी रोजी ही संख्या १२० होती. २२ फेब्रुवारी रोजी २१३, तर २३ फेब्रुवारी रोजी २१९ रुग्ण आढळले होते. त्यामुळे आता विनामास्क फिरणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षी या आजाराला वैश्विक महामारीचे स्वरूप होते. आता तसे स्वरूप राहिलेले नसले तरी हा आजार गंभीर स्वरूपाचा आहे हे मात्र निश्चित. लसीकरणाच्या नंतर २०२२ मध्ये हा आजार सामान्य होईल असेही ते म्हणाले.

शहरात किमान ३० लसीकरण केंद्रेज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे असे लक्षात येईल, त्या भागात लसीकरणाचे केंद्र सुरू केले जाईल. येत्या काही दिवसांत शहरात किमान ३० ठिकाणी लसीकरणाचे केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती पाण्डेय यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद