शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

Corona Virus in Aurangabad : हुश्श... अडीच महिन्यांनंतर कोरोना मृत्यू ११ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 12:17 IST

Corona Virus in Aurangabad : सध्या ३,४७० रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देसोमवारी २१६ नव्या रुग्णांची वाढ 

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २१६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ८६, तर ग्रामीण भागातील १३० रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. तब्बल अडीच महिन्यांनंतर मृत्यूचा आकडा ११ वर आला आहे. आतापर्यंत रोज यापेक्षा अधिक मृत्यू होत होते. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णाचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३ हजार ४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात २१ मार्च रोजी ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मृत्युदर हा वाढत गेला. आता काहीसा कमी झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ७३२ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार ५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४३ आणि ग्रामीण भागातील ३२७, अशा ४७० रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना सिल्लोड येथील ५५ वर्षीय महिला, नंदनवन काॅलनीतील ६७ वर्षीय पुरुष, तारू पिंपळवाडी, पैठण येथील ६५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ४० वर्षीय महिला, पळशी येथील ६५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ४५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, पिंप्री, सिल्लोड येथील ३५ वर्षीय पुरुष, बंजारा काॅलनीतील ७५ वर्षीय महिला, एन-१२ येथील ३७ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णअंबर हिल १, पुंडलिकनगर १, ज्योतीनगर १, सिडको, एन-५ येथे १, देवळाई, म्हाडा कॉलनी १, जालाननगर १, नवयुग कॉलनी २, पडेगाव, पोलीस कॉलनी १, भीमनगर, भावसिंगपुरा २, दक्षिण विहार, कांचनवाडी १, हायकोर्ट कॉलनी २, शहानगर ३, सातारा परिसर १, बीड बायपास ३, पैठण रोड १, जिजामातानगर १, अन्य ६३.

ग्रामीण भागातील रुग्णसमतानगर, ता. सिल्लोड १, वाळूज महानगर १, अन्य १२८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद