शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus In Aurangabad : हॅलो, माझ्या लाळेचे नमुने घ्या, भिती वाटत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 12:34 IST

समुपदेशक साधतात रोज संवाद, समुपदेशनातून दूर करतात अनाहूत भिती दूर

ठळक मुद्देहोम क्वारंटाईनमधील नागरिकांशी संवाद क्वारंटाईनमधील नागरिकांशी फोनवरून दररोज पथक संपर्क करते

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय, अप्रोन घातले आणि मास्क बांधलेले काही जण फोनवर फोन करीत होते. हॅलो म्हणत समोरच्या व्यक्तिला तब्येत कशी आहे, घरचे कसे आहेत, अशी आपुलकीने विचारणा करीत होते. समोरचा व्यक्ती काहीही त्रास नसल्याचे सांगून फोन ठेवत होता, तर एखादा व्यक्ती 'मला त्रास होत आहे, भिती वाटत आहे, माझा लाळेचा नमुना तपासणीसाठी घ्या' असे म्हणत होता.

कोरोनाच्या संशयामुळे सध्या होम क्वारंटाईनमधील लोकांशी दररोज संपर्क केल्यानंतर असा संवाद घडत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा समुपदेशक तेजस्विनी तुपसागर, समाजसेवा अधीक्षक साहेबराव केळोदे, समुपदेशक डॉ. महेश मरकड, योगेश सोळुंके, दत्ता बढे, नीता आगे, शीतल बागुल, सीताराम विधाते हे सर्व जण सध्या दररोज होम क्वारंटाईनमधील लोकांशी फोनरून संवाद साधत आहे. होम क्वारंटाईनमधील लोकांशी दररोज संवाद साधनाऱ्या या पथकाच्या कामाविषयी ग्राऊंड रिपोर्टिंगमधून जाणून घेण्यात आले.

जिल्हा रुगणलायात ६ मार्चपासून तपासणीसाठी आलेल्या तब्बल ६०५ होम क्वारंटाईनमधील नागरिकांशी सलग १४ दिवस फोनवर संवाद साधून त्यांची प्रकृती जाणून घेण्याची जबाबदारी हे पथक पार पाडत आहेत. सोमवारी सकाळी रुग्णालयात आल्यानंतर पथकातील प्रत्येक जण स्वतःकडे असलेल्या यादीतील लोकांशी संपर्क करून संवाद साधण्यात मग्न होता. होम क्वारंटाईनच्या पहिल्या दिवशी संशयित व्यक्तीला तो कुठे गेला होता, कोणाच्या संपर्कात आला होता, याची विचारणा केली जात होती. ज्यांचा दुसरा, तिसरा आणि पुढील दिवस होता, त्यांना 'सर्दी, खोकला आहे का, घसा दुखत आहे का, कुटुंबातील इतर सदस्यांना काही त्रास जाणवत आहे अशी विचारणा केली जात होती. काही संशयितांचे फोन लागत नव्हते, त्यांच्याशी पुन्हा पुन्हा संपर्क केला जात होता. संपर्क साधल्यानंतर काही जणांकडून अनाहूत भीती व्यक्त केली जात होती. त्यांना धीर दिला जात होता, समुपदेशन केले जात होते. काही त्रास होत असेल तर योग्य खबरदारी घेऊन रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला जात होता.

 तिसऱ्यांदा स्वब घेण्याची विनंती

कोरोनाच्या संशयाने एका महिलेचा दोनदा स्वब घेण्यात आला, दोन्ही वेळेस हे अहवाल निगेटिव्ह आले. होम क्वारंटाईनचा कालावधी संपला. तरीही त्रास होत असल्याचे म्हणत तिसऱ्यांदा स्वब घेण्याची विनंती महिलेने केली. तिचे समुपदेशन करण्यात आले. २१९ जनांचा १४ दिवस पाठपुरावा होम क्वारंटाईनमधील ६०५ पैकी २१९ जणांचा १४ दिवस पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, असे समाजसेवा अधीक्षक साहेबराव केळोदे यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा, डॉ. पद्मा बकाल, डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करीत आहेत.             

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद