शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

Corona Virus In Aurangabad : हॅलो, माझ्या लाळेचे नमुने घ्या, भिती वाटत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 12:34 IST

समुपदेशक साधतात रोज संवाद, समुपदेशनातून दूर करतात अनाहूत भिती दूर

ठळक मुद्देहोम क्वारंटाईनमधील नागरिकांशी संवाद क्वारंटाईनमधील नागरिकांशी फोनवरून दररोज पथक संपर्क करते

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय, अप्रोन घातले आणि मास्क बांधलेले काही जण फोनवर फोन करीत होते. हॅलो म्हणत समोरच्या व्यक्तिला तब्येत कशी आहे, घरचे कसे आहेत, अशी आपुलकीने विचारणा करीत होते. समोरचा व्यक्ती काहीही त्रास नसल्याचे सांगून फोन ठेवत होता, तर एखादा व्यक्ती 'मला त्रास होत आहे, भिती वाटत आहे, माझा लाळेचा नमुना तपासणीसाठी घ्या' असे म्हणत होता.

कोरोनाच्या संशयामुळे सध्या होम क्वारंटाईनमधील लोकांशी दररोज संपर्क केल्यानंतर असा संवाद घडत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा समुपदेशक तेजस्विनी तुपसागर, समाजसेवा अधीक्षक साहेबराव केळोदे, समुपदेशक डॉ. महेश मरकड, योगेश सोळुंके, दत्ता बढे, नीता आगे, शीतल बागुल, सीताराम विधाते हे सर्व जण सध्या दररोज होम क्वारंटाईनमधील लोकांशी फोनरून संवाद साधत आहे. होम क्वारंटाईनमधील लोकांशी दररोज संवाद साधनाऱ्या या पथकाच्या कामाविषयी ग्राऊंड रिपोर्टिंगमधून जाणून घेण्यात आले.

जिल्हा रुगणलायात ६ मार्चपासून तपासणीसाठी आलेल्या तब्बल ६०५ होम क्वारंटाईनमधील नागरिकांशी सलग १४ दिवस फोनवर संवाद साधून त्यांची प्रकृती जाणून घेण्याची जबाबदारी हे पथक पार पाडत आहेत. सोमवारी सकाळी रुग्णालयात आल्यानंतर पथकातील प्रत्येक जण स्वतःकडे असलेल्या यादीतील लोकांशी संपर्क करून संवाद साधण्यात मग्न होता. होम क्वारंटाईनच्या पहिल्या दिवशी संशयित व्यक्तीला तो कुठे गेला होता, कोणाच्या संपर्कात आला होता, याची विचारणा केली जात होती. ज्यांचा दुसरा, तिसरा आणि पुढील दिवस होता, त्यांना 'सर्दी, खोकला आहे का, घसा दुखत आहे का, कुटुंबातील इतर सदस्यांना काही त्रास जाणवत आहे अशी विचारणा केली जात होती. काही संशयितांचे फोन लागत नव्हते, त्यांच्याशी पुन्हा पुन्हा संपर्क केला जात होता. संपर्क साधल्यानंतर काही जणांकडून अनाहूत भीती व्यक्त केली जात होती. त्यांना धीर दिला जात होता, समुपदेशन केले जात होते. काही त्रास होत असेल तर योग्य खबरदारी घेऊन रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला जात होता.

 तिसऱ्यांदा स्वब घेण्याची विनंती

कोरोनाच्या संशयाने एका महिलेचा दोनदा स्वब घेण्यात आला, दोन्ही वेळेस हे अहवाल निगेटिव्ह आले. होम क्वारंटाईनचा कालावधी संपला. तरीही त्रास होत असल्याचे म्हणत तिसऱ्यांदा स्वब घेण्याची विनंती महिलेने केली. तिचे समुपदेशन करण्यात आले. २१९ जनांचा १४ दिवस पाठपुरावा होम क्वारंटाईनमधील ६०५ पैकी २१९ जणांचा १४ दिवस पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, असे समाजसेवा अधीक्षक साहेबराव केळोदे यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा, डॉ. पद्मा बकाल, डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करीत आहेत.             

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद