शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

Corona Virus In Aurangabad : हॅलो, माझ्या लाळेचे नमुने घ्या, भिती वाटत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 12:34 IST

समुपदेशक साधतात रोज संवाद, समुपदेशनातून दूर करतात अनाहूत भिती दूर

ठळक मुद्देहोम क्वारंटाईनमधील नागरिकांशी संवाद क्वारंटाईनमधील नागरिकांशी फोनवरून दररोज पथक संपर्क करते

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय, अप्रोन घातले आणि मास्क बांधलेले काही जण फोनवर फोन करीत होते. हॅलो म्हणत समोरच्या व्यक्तिला तब्येत कशी आहे, घरचे कसे आहेत, अशी आपुलकीने विचारणा करीत होते. समोरचा व्यक्ती काहीही त्रास नसल्याचे सांगून फोन ठेवत होता, तर एखादा व्यक्ती 'मला त्रास होत आहे, भिती वाटत आहे, माझा लाळेचा नमुना तपासणीसाठी घ्या' असे म्हणत होता.

कोरोनाच्या संशयामुळे सध्या होम क्वारंटाईनमधील लोकांशी दररोज संपर्क केल्यानंतर असा संवाद घडत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा समुपदेशक तेजस्विनी तुपसागर, समाजसेवा अधीक्षक साहेबराव केळोदे, समुपदेशक डॉ. महेश मरकड, योगेश सोळुंके, दत्ता बढे, नीता आगे, शीतल बागुल, सीताराम विधाते हे सर्व जण सध्या दररोज होम क्वारंटाईनमधील लोकांशी फोनरून संवाद साधत आहे. होम क्वारंटाईनमधील लोकांशी दररोज संवाद साधनाऱ्या या पथकाच्या कामाविषयी ग्राऊंड रिपोर्टिंगमधून जाणून घेण्यात आले.

जिल्हा रुगणलायात ६ मार्चपासून तपासणीसाठी आलेल्या तब्बल ६०५ होम क्वारंटाईनमधील नागरिकांशी सलग १४ दिवस फोनवर संवाद साधून त्यांची प्रकृती जाणून घेण्याची जबाबदारी हे पथक पार पाडत आहेत. सोमवारी सकाळी रुग्णालयात आल्यानंतर पथकातील प्रत्येक जण स्वतःकडे असलेल्या यादीतील लोकांशी संपर्क करून संवाद साधण्यात मग्न होता. होम क्वारंटाईनच्या पहिल्या दिवशी संशयित व्यक्तीला तो कुठे गेला होता, कोणाच्या संपर्कात आला होता, याची विचारणा केली जात होती. ज्यांचा दुसरा, तिसरा आणि पुढील दिवस होता, त्यांना 'सर्दी, खोकला आहे का, घसा दुखत आहे का, कुटुंबातील इतर सदस्यांना काही त्रास जाणवत आहे अशी विचारणा केली जात होती. काही संशयितांचे फोन लागत नव्हते, त्यांच्याशी पुन्हा पुन्हा संपर्क केला जात होता. संपर्क साधल्यानंतर काही जणांकडून अनाहूत भीती व्यक्त केली जात होती. त्यांना धीर दिला जात होता, समुपदेशन केले जात होते. काही त्रास होत असेल तर योग्य खबरदारी घेऊन रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला जात होता.

 तिसऱ्यांदा स्वब घेण्याची विनंती

कोरोनाच्या संशयाने एका महिलेचा दोनदा स्वब घेण्यात आला, दोन्ही वेळेस हे अहवाल निगेटिव्ह आले. होम क्वारंटाईनचा कालावधी संपला. तरीही त्रास होत असल्याचे म्हणत तिसऱ्यांदा स्वब घेण्याची विनंती महिलेने केली. तिचे समुपदेशन करण्यात आले. २१९ जनांचा १४ दिवस पाठपुरावा होम क्वारंटाईनमधील ६०५ पैकी २१९ जणांचा १४ दिवस पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, असे समाजसेवा अधीक्षक साहेबराव केळोदे यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा, डॉ. पद्मा बकाल, डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक काम करीत आहेत.             

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद