शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

corona virus : औरंगाबादच्या सीमा बंद; ई- पास शिवाय कुणालाही परजिल्ह्यात जाता-येता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 15:34 IST

corona virus : e-pass require for travelling लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार कोणत्याही नागरिकांना विना परवानगी (अधिकृत पास) परजिल्ह्यात अथवा परराज्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावेआवश्यकता नसेल तर प्रवास टाळावा,पोलीस आयुक्तांचे आवाहन

औरंगाबाद : राज्यात गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू झाल्यामुळे नागरिकांना विना पास परजिल्ह्यात अथवा परराज्यांत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक प्रकरणात शहर पोलीस आयुक्तालयाकडून लवकरच ई पास सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार कोणत्याही नागरिकांना विना परवानगी (अधिकृत पास) परजिल्ह्यात अथवा परराज्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत नागरिकांना महत्त्वाच्या कारणासाठी परजिल्ह्यात जाण्यासाठी ई पास उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गतवर्षीप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून ई पासची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सांगितले. या करिता काही निकष असतील. विशिष्ट कारणासाठीच नागरिकांना परजिल्ह्यात जाण्याची परवानगी असेल. आयुक्त म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ; मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे, अथवा आवश्यकता नसेल तर प्रवास टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

असा करा ई-पाससाठी अर्ज अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. आपल्या ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद