शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona Virus: एकाच दिवशी ४१० रुग्ण, शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 14:51 IST

शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १९.७५ पर्यंत गेला असून दिवसभरात २,११६ टेस्ट करण्यात येत आहेत

औरंगाबाद : मागील दहा दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत होती. बुधवारी बाधित रुग्णांचा अचानक विस्फोट झाला. दिवसभरात तब्बल ४१० बाधित आढळल्याने शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल १९.७५ पर्यंत गेला. यामुळे शहरात निर्बंध आणखी वाढू शकतात.

महाराष्ट्र शासनाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रात्रीची संचारबंदी सुरू केली. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. दिवसा जमावबंदी आदेश लागू केला. मात्र याचा किंचितही परिणाम झालेला नाही. शहरात कोरोना रुग्णांची संख्या १ जानेवारीपासून वाढतच चालली आहे. बुधवारी महापालिकेने फक्त २,११६ संशयित नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये ४१० जण बाधित आढळून आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. बाधित आढळून आलेल्या रुग्णांपैकी ३१५ जणांनी होम आयसोलेशनचा मार्ग पत्करला. १५ रुग्ण घाटीत दाखल झाले. ४० जणांनी खाजगी रुग्णालय गाठले. महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ४० जणांना भरती करण्यात आले.

शहरात सक्रिय रुग्णांचा आकडा आता १,४९८ पर्यंत पोहोचला आहे. त्यातील १,१०८ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. १० जानेवारी रोजी शहरात २७६ बाधित रुग्ण आढळून आले होते. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ११.१२ होता. ११ रोजी २८५ बाधित तर पॉझिटिव्हिटी रेट १२.६९ होता. बुधवारी अचानक रुग्ण संख्या ४१० पर्यंत पोहोचल्याने पॉझिटिव्हिटी रेटने उच्चांक गाठला. १९.७५ एवढा पॉझिटिव्हिटी रेट नोंदविण्यात आला.

महापालिकेकडून जोरदार तयारीमहापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दोन दिवसांपूर्वीच नमूद केले होते की शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढणार आहे. दररोज दोन हजारांपर्यंत रुग्णसंख्या जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने महापालिकेने कोविड सेंटर आणि ऑक्सिजन असलेले बेड तयार ठेवलेले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद